शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

मनोधैर्य योजनेचा ३०२ पीडितांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:31 PM

बलात्कार पीडित व अ‍ॅसीड हल्ल्यात जखमी झालेल्या महिलांना मानसिक आधार देण्यासाठी राज्य शासनाने मनोधैर्य योजना सुरू केली आहे.

ठळक मुद्देअत्याचारग्रस्त महिलांचा सन्मान : आतापर्यंत सात कोटी रुपये पीडितांना सुपूर्द

रवी जवळे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बलात्कार पीडित व अ‍ॅसीड हल्ल्यात जखमी झालेल्या महिलांना मानसिक आधार देण्यासाठी राज्य शासनाने मनोधैर्य योजना सुरू केली आहे. या योजनेचा प्रचार-प्रसार पाहिजे तसा होऊ शकला नाही. तरीही पोलीस विभागाकडून काही अत्याचारग्रस्त महिलांची प्रकरणे जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाकडे सोपविण्यात आली आहे. यातील ३०२ पीडितांना या योजनेंतर्गत मदत देऊन स्वाभीमानाने उभे राहण्यासाठी आधार दिला आहे.महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी शासनाने कडक कायदे केले असले तरी अत्याचाराच्या घटना थांबलेल्या नाहीत. शिवाय अशा प्रकारामध्ये न्यायालयीन लढाई लढताना पीडित महिलेला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. बलात्कार पीडित महिलेला मानसिक व शारिरिक आधार देता यावा, तिचे मनोधैर्य वाढावे, तिला आर्थिक पाठबळ मिळावे व पुढचे आयुष्य स्वाभीमानाने जगता यावे, यासाठी राज्य शासनाने २०१३ मध्ये बलात्कार पीडित महिलेला आर्थिक सहाय्य देणारी ‘मनोधैर्य योजना’ अमलात आणली. शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ही योजना राबविण्यात येते.बलात्कार पीडित व अ‍ॅसीड हल्ल्यात जखमी झालेली व बळी पडलेले या योजनेच्या मदतीसाठी पात्र असतात. कोणत्याही वयाची पीडित महिला मदतीसाठी पात्र ठरते. पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर १५ दिवसांत पीडित महिलेला या योजनेंतर्गत मदत देण्यात येते. एक ते तीन लाख रुपये मदतीची यात तरतूद आहे. योजना चांगली असली तरी या योजनेचा प्रचार-प्रसार पाहिजे त्या प्रमाणात होऊ शकला नाही.अनेकांना या योजनेविषयी माहिती नाही. या योजनेतील प्रकरणे मंजूर करण्यासाठी एक समिती असते. जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतात. या समितीने प्रकरणे मंजूर केल्यानंतर शासनाकडून जिल्हा महिला व बालकल्याण विभागाकडे संबंधित प्रकरणातील पीडितांसाठी निधी दिला जातो. ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील ३०२ अत्याचारपीडित महिलांना सात कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. प्रति महिला १ ते ३ लाखापर्यंतची ही मदत आहे. यात आणखी काही प्रकरणे मंजुरीसाठी पाठविण्यात आली असून त्या प्रकरणातील पीडितांनाही लवकरच मदत दिली जाईल, अशी माहिती जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी मरसोदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली, या मदतीमुळे अत्याचारग्रस्त महिलांना स्वाभिमानाने जगण्यासाठी आधार मिळाला आहे.पोलिसांनी उदासीनता बाळगू नयेमहिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. अशा घटनामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. काही जणांनी तर समाजाच्या भीतीपोटी आपले आयुष्यही संपविले आहे. अशा घटनेतील पीडित महिला व युवतींना मानसिक पाठबळ देण्यासाठी मनोधैर्य योजना चांगला पर्याय आहे. मात्र या योजनेसाठी पीडितांची प्रकरणे पोलीस विभागाकडून जिल्हा महिला व बालकल्याण विभागाकडे पाठविली जातात. २०१३ पासून २०१७ पर्यंत जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. मात्र मदत केवळ ३०२ जणांनाच मिळाली आहे. त्यामुळे पोलीस विभाग प्रकरणे योजनेच्या लाभासाठी पाठविण्याबाबत उदासीन तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.पोलीस विभागाकडून मनोधैर्य योजनेसाठी प्रकरणे आल्यानंतर तत्काळ कागदपत्रांची तपासणी करून अहवाल मंजुरीसाठी पाठविला जातो. त्यानंतर पीडितांसाठी शासनाकडून निधी आल्यानंतर तो पीडितांना सुपूर्द केला जातो. आतापर्यंत ३०२ जणांना मदत करण्यात आली आहे.- विलास मरसोदे,जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, चंद्रपूर.