शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

'ती'च्या स्वागताची 'समृद्धी'; जिल्ह्यात पालकांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 4:50 PM

दहा वर्षांपर्यंत उघडता येणार खाते: पोस्टाच्या जमा रकमेवर सर्वाधिक व्याजदर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: मुलींच्या जन्माचा टक्का वाढावा, कुठल्याही परिवारात मुलीचा जन्म झाल्यास तिचे स्वागत व्हावे, या हेतूने शासनाने मुलींच्या आई-वडिलांना लखपती करणारी 'सुकन्या समृद्धी योजना' सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाभरातील पोस्ट कार्यालयात मुलींच्या नावे खाते उघडली जात आहेत. योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत शेकडो मुलींचे खाते उघडण्यात आले असून, एका अर्थाने 'ती'च्या येण्याने आई-वडिलांचे जगणे समृद्ध झाले आहे.

पालकांनी वर्षाला किमान एक हजार रुपये महिना भरले, तरी १५ वर्षांत १ लाख ८० हजार रुपये खात्यावर जमा होतात. त्यानंतर पैसे भरण्याचीदेखील गरज नाही. २० वर्षांनंतर पैसे काढताना मात्र पालकांना परतावा म्हणून ५ लाख ५४ हजार ६१३ रुपये अशी मोठी राशी मिळते. त्यामुळे पालकांना मुलीच्या शिक्षणाची आणि लग्नाचीदेखील चिंता दूर होण्यास मदत होते; परंतु यासाठी मुलीच्या जन्मानंतर सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडून नियमित रक्कम भरण्याची गरज आहे.

असा आहे योजनेचा उद्देशयोजनेचा मुख्य उद्देश स्त्री भ्रूणहत्या रोखणे हा आहे. मुलीच्या जन्मापासून ती दहा वर्षाची होईपर्यंत मुलीच्या नावावर हे खाते उघडता येते.मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर जमा राशीमधून ५० टक्के रक्कम आणि मुलीचे वय २१ वर्षे झाल्यास तसेच मुलीचे लग्न झाल्यास पूर्ण जमा राशी काढता येऊ शकते.

सुकन्या समृद्धी योजनेची वैशिष्ट्येमुलीच्या उच्च शिक्षण, उज्ज्वल भविष्य व लग्नासाठी किमान २५० रुपयांत खाते उघडता येते. वर्षाला जास्तीत जास्त १ लाख ५० हजार रुपये भरता येतात. वयाच्या २१ वर्षांनंतर खाते बंद करता येते. मुलीच्या १८ व्या वर्षी जमा रकमेतून शिक्षणासाठी ५० टक्के रक्कम काढण्याची मुभा आहे. सध्याचा व्याजदर ८.२ टक्के आहे.

'बेटी बचाव - बेटी पढाव' मोहिमेच्या धोरणानुसार सुकन्या समृद्धी योजना शासनाने सुरू केली आहे. या योजनेला जिल्हाभरातून पालकांचा मोठा प्रतिसाद आहे. या योजनेत पालक आपल्या आर्थिक स्थितीनुसार बचत करू शकतो. मुलींचे शिक्षण आणि लग्न या कारणांसाठी रक्कम कामात येते. त्यामुळे पालकांची मुलीच्या भविष्याची चिंता मिटू शकते.

- आर.डी. धानफुले, प्रवर डाकपाल, चंद्रपूर

टॅग्स :government schemeसरकारी योजनाchandrapur-acचंद्रपूर