शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

जगण्यासाठी धडपडताना ‘ती’ काळरात्र ठरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 05:00 IST

एखाद्या चित्रपटात घडावे याप्रमाणे घरात सर्वकाही सुरळीत असताना, रात्री ८ वाजताच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. येथूनच नियतीने खेळ सुरू केला. पावसातच  परिसरातील रोहित्रात बिघाड झाला. थोड्या वेळाने वीज येईल, म्हणून डोळ्यात तेल टाकून लष्करे कुटुंबीय रात्री १२ वाजेपर्यंत वाट बघत होते. पण वीज आलीच नाही. कुटुंबप्रमुख या नात्याने रमेश लष्करे हे अस्वस्थ होते.

ठळक मुद्देनववधू आल्यानंतर घरात आनंदाचे वातावरण असताना नियतीने साधला क्रूर डाव

राजेश भोजेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : म्हणतात ना, आयुष्य क्षणभंगूर आहे. कोणीही आयुष्याची हमी देऊ शकत नाही. दुर्गापुरात घडलेली घटना अशीच काहीशी आहे. सोमवारची रात्र जगण्यासाठी धडपडणाऱ्या लष्करे कुटुंबासाठी काळरात्र ठरेल, असा विचार कुणीही केला नव्हता. अखेर नियतीने डाव साधलाच. रमेश लष्करे हे पेटी कंत्राटदार. लहानसहान कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. यामुळे घरची परिस्थिती समाधानकारक होती. घरात आनंदाचे वातावरण. २८ जूनला मोठा मुलगा अजयचा विवाह झाला. नववधू आल्यानंतर घरातला आनंद दि्वगुणीत झाला. पण, या आनंदाला कुणाची नजर लागावी, असेच घडले. अजयची पत्नी माधुरी ही लग्नानंतर माहेरी गेली होती. ती घरात यावी आणि असे घडावे, यात तिचा काय दोष? मोठ्या आनंदात नववधू सोमवारी सासरी आली. हा दिवस तिच्यासाठी पहिला आणि शेवटचा दिवस ठरावा, ही कल्पनाही कोणी करू शकत नाही. मात्र नियतीनेच हा डाव रचला होता. एखाद्या चित्रपटात घडावे याप्रमाणे घरात सर्वकाही सुरळीत असताना, रात्री ८ वाजताच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. येथूनच नियतीने खेळ सुरू केला. पावसातच  परिसरातील रोहित्रात बिघाड झाला. थोड्या वेळाने वीज येईल, म्हणून डोळ्यात तेल टाकून लष्करे कुटुंबीय रात्री १२ वाजेपर्यंत वाट बघत होते. पण वीज आलीच नाही. कुटुंबप्रमुख या नात्याने रमेश लष्करे हे अस्वस्थ होते. कुटुंबातील सदस्यांना निवांत झोपलेले पाहून कोणत्याही कुटुंबप्रमुखाला यापेक्षा दुसरा आनंद नसतो आणि घरात नववधू आलेली असताना, तिला अंधारात ठेवणे हे त्यांना खटकणारे होते. रात्री १२ वाजता त्यांनी अडगळीत पडलेले जनरेटर बाहेर काढले. ते सुरू करण्यासाठी त्यांनी रात्री धडपड करून पेट्रोल आणले. अखेर जनरेटर सुरू झाले. घरातील वीजदिवे प्रकाशमान झाले. पण हा प्रकाशच कुटुंबात कायम अंधार आणणारा ठरला. सर्व कुटुंबीय झोपी गेले. डोळ्यात झोप असल्यामुळे लगेच झोप लागली. अखेर काळाने डाव साधला. सकाळी लवकर उठणारी ही मंडळी, आज कोणीच कसे नाही उठले? म्हणून शेजाऱ्यांनी घरात डोकावून बघितले. पण आतील जे दृष्य दिसले, ते धक्कादायक होते. कुटुंबातील सर्व सदस्य गाढ झोपेत असल्यागत मृत्युमुखी पडलेले होते. रमेश लष्करे यांची पत्नी दासू यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. त्यांना लगेच रुग्णालयात हलविण्यात आले. त्या बेशुद्धावस्थेत होत्या. या घटनेत कुटुंब प्रमुखासह तीन मुले, एक मुलगी आणि मुलाची नववधू यांच्यावर काळाने झडप घातली. या घटनेने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

तातडीने रोहित्राची दुरुस्तीदुर्गापूर : वॉर्ड नंबर ३ हा झोपडपट्टीचा भाग आहे. येथे मोलमजुरी करणारे गोरगरीब लोक राहतात. सोमवारी रात्री आठ वाजता रोहित्रामध्ये बिघाड होऊन विद्युत पुरवठा खंडित झाला. रात्रभर वीज पुरवठा सुरूच झाला नाही. यामुळे वीज वितरण विभागाबद्दल नागिरकांमध्ये रोष होता. अशातच सकाळी वीज पुरवठा खंडित असल्याने घरात जनरेटर सुरू करून ठेवल्यामुळे लष्करे कुटुंबातील सहा जणांना दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर वीज वितरण विभागाने तातडीने रोहित्राची दुरुस्ती करून वीज पुरवठा पूर्ववत केला.

खुशहालीऐवजी निधनाचा संदेशमाधुरी ही अजयच्या आत्याचीच मुलगी होती. २८ जूनला कोराडी महादुला येथे या दोघांचा विवाह धुमधडाक्यात पार पडला. २९ जूनला तिची बिदाई करण्यात आली. रिसेप्शन वैगेरे आटोपल्यानंतर ती माहेरी आली. काही दिवस माहेरी राहिल्यानंतर सोमवारी ती सासरी आली. यावेळी घरातील सर्व नातेवाईकांना सासरी गेल्यानंतर फोनवर खुशहाली कळवणार, असे सांगून ती सासरी आली. मात्र सकाळी तिच्या खुशहालीऐवजी मृत्यू झाल्याचा फोन खणखणल्याचे तिच्या नातेवाइकांनी सांगितले.

आक्रोशाने उपस्थितांचे पाणावले डोळेदुर्गापूर येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेतील सहाही मृतदेह शव जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. दरम्यान त्यांचे आप्तेष्ठसुद्धा तेथे पोहचले. यावेळी त्यांनी एकच हंबरडा फोडला. त्यांचा आक्रोश बघून जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या सर्वांचे डोळे आपसुकच पाणावले. दुर्गापूरच्या या घटनेने सर्वच हळहळत होते.

लोकप्रतिनिधी व प्रशासन निष्ठूरदुर्गापूर येथील घटनेने संपूर्ण देश हळहळला. मात्र स्थानिक जनप्रतिनिधीपासून ते आमदार, खासदार यांनी दुपारी १ वाजेपर्यंत लष्करे कुटुंबियांची घरी किंवा रुग्णालयात भेट देऊन साधी विचारपूस केली नाही. तसेच घटनेतील गंभीर असलेल्या व्यक्तीची साधी चौकशीही केली नाही. येथील लोकप्रतिनिधी व प्रशासन निष्ठूर असल्याचा आरोप मृतक नवविवाहित वधूचा मामा अनमनता लष्करे, लक्ष्मण इटकर यांनी केला आहे.

शहर पोलिसांचा बंदोबस्त तैनातमंगळवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस येताच सर्वांना चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी सहा जणांनाही मृत घोषित केले. तर दासू लष्करे (४०) गंभीर असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. त्यामुळे सर्व नातेवाईक जिल्हा सामान्य रुग्णालयात जमा झाले होते. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहर पोलिसांना प्राचारण करण्यात आले.

 

टॅग्स :marriageलग्नDeathमृत्यू