शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
4
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
5
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
6
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
7
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
8
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
9
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
10
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
11
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
12
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
13
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
14
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
15
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
16
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
17
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
18
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
19
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
20
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?

कोरोना सुटीमुळे विद्यार्थ्यांचे बिघडले हस्ताक्षर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 18:49 IST

शाळा सुरू झाल्या. मात्र, विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडल्यामुळे शिक्षकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, लातूर जिल्हा परिषदेने हस्ताक्षर सुधार आणि सुलेखन मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम राज्यभर राबविण्याची मागणी आता शिक्षकांकडून केली जात आहे.

ठळक मुद्देलातूर पॅटर्नचा वापर केल्यास हस्ताक्षर सुधारण्यास होणार मदत

चंद्रपूर : मागील दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे शाळांना सुटी होती. काही ठिकाणी ऑनलाईन अभ्यासक्रम घेण्यात आला. मात्र हस्ताक्षर आणि शुद्धलेखनाकडे बहुतांश विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष झाले. आता शाळा सुरू झाल्या. मात्र, विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडल्यामुळे शिक्षकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, लातूर जिल्हा परिषदेने हस्ताक्षर सुधार आणि सुलेखन मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम राज्यभर राबविण्याची मागणी आता शिक्षकांकडून केली जात आहे.

कोरोना निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर आता ग्रामीण तसेच शहरी भागातील शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, जे विद्यार्थी शाळा न बघताच वर्गोन्नत झाले आहेत, अशा अनेक विद्यार्थ्यांना साध्या अक्षराचीही ओळख नाही. दुसरी, तिसरीच्याही विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडले असून त्यांची लिहिण्याची गतीही मंदावली आहे. यामुळे शाळेत शिकविताना शिक्षकांना त्रास होतो आहे. वाचन करतानाही अनेक विद्यार्थी अडखळत आहेत.

विद्यार्थ्यांची ही समस्या लक्षात घेता लातूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने एक पत्र काढून विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष तसेच वळणदार हस्ताक्षर काढण्यावर भर देण्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बघण्यासाठी वेळोवेळी अधिकारी भेट देणार असल्याचेही पत्रात म्हटले आहे. हस्ताक्षराची केवळ लातूरच नाही तर राज्यभरातील विद्यार्थ्यांची समस्या आहे. त्यामुळे लातूर जिल्हा परिषदेसारखी अन्य जिल्ह्यांनीही विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

स्माईल लोगाेचा वापर अनिवार्य

विद्यार्थ्यांचे सुलेखन, हस्ताक्षर सुधारण्यासाठी लातूर जि. प.ने मोहीम सुरू केली आहे. कमी कालावधीत विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर तसेच शुद्धलेखनासाठी सराव करण्यासोबतच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांच्या वहीमध्ये स्माईल लोगो काढावा, असेही पत्रात म्हटले आहे.

दीर्घ सुटीमुळे विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडले आहे. अनेकांना सरळ रेषा तसेच वळणदार अक्षर काढणे कठीण जात आहे. लहान वयातच त्यांचे अक्षर सुधारणे, सुलेखन महत्त्वाचे असते. लातूर पॅटर्ननुसार शिक्षण विभागाने राज्यभरातील शाळांत अशी मोहीम सुरू करणे सध्या अत्यावश्यक आहे.

- जे. डी. पोटे, शिक्षण समिती सदस्य, जिल्हा परिषद चंद्रपूर

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थी