शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

कोरोना सुटीमुळे विद्यार्थ्यांचे बिघडले हस्ताक्षर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 18:49 IST

शाळा सुरू झाल्या. मात्र, विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडल्यामुळे शिक्षकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, लातूर जिल्हा परिषदेने हस्ताक्षर सुधार आणि सुलेखन मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम राज्यभर राबविण्याची मागणी आता शिक्षकांकडून केली जात आहे.

ठळक मुद्देलातूर पॅटर्नचा वापर केल्यास हस्ताक्षर सुधारण्यास होणार मदत

चंद्रपूर : मागील दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे शाळांना सुटी होती. काही ठिकाणी ऑनलाईन अभ्यासक्रम घेण्यात आला. मात्र हस्ताक्षर आणि शुद्धलेखनाकडे बहुतांश विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष झाले. आता शाळा सुरू झाल्या. मात्र, विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडल्यामुळे शिक्षकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, लातूर जिल्हा परिषदेने हस्ताक्षर सुधार आणि सुलेखन मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम राज्यभर राबविण्याची मागणी आता शिक्षकांकडून केली जात आहे.

कोरोना निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर आता ग्रामीण तसेच शहरी भागातील शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, जे विद्यार्थी शाळा न बघताच वर्गोन्नत झाले आहेत, अशा अनेक विद्यार्थ्यांना साध्या अक्षराचीही ओळख नाही. दुसरी, तिसरीच्याही विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडले असून त्यांची लिहिण्याची गतीही मंदावली आहे. यामुळे शाळेत शिकविताना शिक्षकांना त्रास होतो आहे. वाचन करतानाही अनेक विद्यार्थी अडखळत आहेत.

विद्यार्थ्यांची ही समस्या लक्षात घेता लातूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने एक पत्र काढून विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष तसेच वळणदार हस्ताक्षर काढण्यावर भर देण्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बघण्यासाठी वेळोवेळी अधिकारी भेट देणार असल्याचेही पत्रात म्हटले आहे. हस्ताक्षराची केवळ लातूरच नाही तर राज्यभरातील विद्यार्थ्यांची समस्या आहे. त्यामुळे लातूर जिल्हा परिषदेसारखी अन्य जिल्ह्यांनीही विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

स्माईल लोगाेचा वापर अनिवार्य

विद्यार्थ्यांचे सुलेखन, हस्ताक्षर सुधारण्यासाठी लातूर जि. प.ने मोहीम सुरू केली आहे. कमी कालावधीत विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर तसेच शुद्धलेखनासाठी सराव करण्यासोबतच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांच्या वहीमध्ये स्माईल लोगो काढावा, असेही पत्रात म्हटले आहे.

दीर्घ सुटीमुळे विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडले आहे. अनेकांना सरळ रेषा तसेच वळणदार अक्षर काढणे कठीण जात आहे. लहान वयातच त्यांचे अक्षर सुधारणे, सुलेखन महत्त्वाचे असते. लातूर पॅटर्ननुसार शिक्षण विभागाने राज्यभरातील शाळांत अशी मोहीम सुरू करणे सध्या अत्यावश्यक आहे.

- जे. डी. पोटे, शिक्षण समिती सदस्य, जिल्हा परिषद चंद्रपूर

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थी