शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

भाव पडल्याने सोयाबीन उत्पादन अडचणीत

By admin | Updated: October 25, 2014 22:37 IST

सर्वत्र दिवाळीचे फटाके आणि गोडधोड पदार्थांची मेजवानी सुरू असताना शेतकऱ्यांची दिवाळी यंदाही अंधारातच साजरी होत असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांच्या

लखमापूर : सर्वत्र दिवाळीचे फटाके आणि गोडधोड पदार्थांची मेजवानी सुरू असताना शेतकऱ्यांची दिवाळी यंदाही अंधारातच साजरी होत असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची वाढ खुंटली. यातच दरवर्षी दिवाळी सणाआधी कापूस व सोयाबिन पिकाने घर भरुन दिसायची मात्र यावर्षी शेतकऱ्यांची घरे रिकामी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. काही सिंचनाखालील जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे उत्पादन निघाले आहे. मात्र दरवर्षीच्या तुलनेत उत्पादनक्षमता कमालिची घसरली आहे. बाजारात संध्या कापसाला ३७०० रुपये तर सोयाबिनला २२०० ते २८०० रुपये भाव आहे. नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कवडीमोल भावात मालाची विक्री करावी लागत आहे.गेल्या दोन वर्षापासून कधी पावसाने तर कधी पुराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आणि यावर्षी पाऊसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. यात ओलिताची सुविधा असणारे शेतकरी पाणीपुरवठा करीत आहेत. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. दरवर्षी शेतीपयोगी खताच्या बियाण्यांच्या आणि किटकनाशकाच्या किंमतीत झपाट्याने वाढ होताना दिसते. त्यामुळे एकरी उत्पादन खर्च १५ ते २० हजारांपर्यंत जात आहे. शेतात काम करणाऱ्या गडीमाणसाचे वार्षिक संकट ७० ते ८० हजार तर कुठे एक लाखापर्यंत आहे. मजुरांच्या मजुरीतही कमालीची वाढ झाली आहे. या तुलनेत शेतकऱ्यांच्या मालाची भाववाढ ठप्प आहे. त्यामुळे ‘अच्छे दिन केव्हा येणार असाही सूर आता शेतकऱ्यांमध्ये आळवला जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज घेऊन हंगामाची सुरुवात केली. दुबार -तिबार पेरणीला सामोरे जावे लागले. आता पीक घरात नसल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. पाऊसच नसल्याने व जमिनीतील पावसाची पातळी कमी होत असल्याने ओलीत करणारा शेतकरी चिंतेत सापडला आहे. पाण्याअभावी झाडांना फळधारणा अत्यल्प दिसत आहे. याचा परिणाम निश्चितच उत्पादनावर मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यात काही मोठ्या प्रमाणात पिकविला जातो. यात कोरपना तालुक्यातील कापूस खरेदी डबघाईला आली आहे. त्यामुळे यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांना कापसाची खरेदी विक्री करावी लागणार आहे. उत्पादन कमी असल्याने वाहन खर्च करणे शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरणार असल्याचे दिसते. दिवाळी अंधारात जात असतानाच शेतकऱ्यांचे दिवाळेही निघण्याची वेळ आली आहे. शासन शेतकऱ्यांसाठी योजनांचा काय पाऊस पाडते हे येणारा काळच ठरवेल. (वार्ताहर)