जिल्ह्यात ७१४ वाहनांवर जप्तीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:01 IST2020-04-23T05:00:00+5:302020-04-23T05:01:28+5:30
नागरिकांनी बाहेर जिल्ह्यातील व राज्यातील नागरिकांची माहिती पोलीस ठाण्याला कळवावी, नागरिकांनी संचारबंदीचे पालन करावे, स्वत: व कुटुंबासह सुरक्षित राहा. घराबाहेर पडू नका, सर्दी, ताप, खोकला असल्यास शासकीय रुग्णालयात तपासणी व उपचार करा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. असे असतानाही अनेकजण दुर्लक्ष करीत आहेत.

जिल्ह्यात ७१४ वाहनांवर जप्तीची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत काम नसताना दुचाकीने फिरणाऱ्या ७१४ वाहनांवर पोलीस प्रशासनाने जप्तीची कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसात वाहनधारकांकडून ११ लाख १३ हजार २७० रुपयांचा दंडसुद्धा वसूल करण्यात आला आहे. यामध्ये दुचाकीचा विमा नसणे, आवश्यक कागदपत्रांचा अभाव, परवाना नसणे, आरसीबुक नसणे व सिटबेल्ट नसणाऱ्यांचा समावेश आहे.
नागरिकांनी बाहेर जिल्ह्यातील व राज्यातील नागरिकांची माहिती पोलीस ठाण्याला कळवावी, नागरिकांनी संचारबंदीचे पालन करावे, स्वत: व कुटुंबासह सुरक्षित राहा. घराबाहेर पडू नका, सर्दी, ताप, खोकला असल्यास शासकीय रुग्णालयात तपासणी व उपचार करा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. असे असतानाही अनेकजण दुर्लक्ष करीत आहेत.
संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५८ जणांना अटक
कोरोना संचारबंदीच्या काळात ठरवून दिलेली वेळ संपल्यानंतरही दुकाने सुरु ठेवणारे, विना परवानगी जिल्ह्यात प्रवेश केलेल्या, क्वारंनटाईनचा शिक्का मारल्यावर गावात फिरणारे, चौका- चौकात एकत्र गोळा होऊन गप्पा करणाऱ्या अशा एकूण ५८ जणांना पोलिसांनी आजपर्यंत अटक केली आहे.
वाहन चालकांकडून २ लाख २१ हजार ५०० रुपये वसूल
बल्लारपूर : शहर लॉकडाऊन झाल्यापासून आजघडीला बल्लारपूर पोलिसांनी एका महिन्यात विनाकारण रस्त्यावरून धावणाºया ७५५ वाहन चालान करून ६२ वाहने जप्त केले. दरम्यान, २ लाख २१ हजार ५०० दंड वसूल केला आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज असून नागरिकांना घराबाहेर न निघण्याचे आवाहन करीत आहे. काही नागरिक काम नसताना विनाकारण फिरत असल्याच्या कारणावरून बल्लारपूर शहरातून शहराबाहेर जाणारा गोल पुलीया व आलापल्ली मार्गावर नाकेबंदी करून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाही सुरु केली आहे. १९ एप्रिलपर्यंत ७५५ वाहने चालान करून दंडात्मक कारवाही केली आहे. सदर कारवाही पोलीस निरीक्षक एस.एस.भगत यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे निलेश माळवे यांच्यासह कर्मचारी करीत आहे.