शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

रेशीम शेतीला विदर्भात वाव; मात्र शेतकऱ्यासह कृषी विभाग उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 2:40 PM

विदर्भात रेशीम शेतीला भरपूर वाव आहे, असे कृषीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र अनेक शेतकरी या शेतीपासून अनभिज्ञ आहेत. या शेतीविषयी माहिती देण्यात कृषी विभागही अपयशी ठरत आहे.

ठळक मुद्देजनजागृतीचा अभाव मार्गदर्शन करण्यात कृषी विभाग अपयशी

प्रवीण खिरटकर

लोकमत न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर: विदर्भात रेशीम शेतीला भरपूर वाव आहे, असे कृषीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र अनेक शेतकरी या शेतीपासून अनभिज्ञ आहेत. या शेतीविषयी माहिती देण्यात कृषी विभागही अपयशी ठरत आहे. जिल्ह्याचे ठिकाण गाठून रेशीम संचालनालय कार्यालयात गेल्यावरच शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन मिळते. त्यामुळे तयारी असूनही शेतकरी रेशीम शेतीबाबत उदासीनता बाळगून आहे.शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन या पारंपारिक शेतीसोबतच शेतीमध्ये जोडधंदे करावे. यासोबतच रेशीम शेती केल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल. रेशीम शेतीकरिता विदर्भातील वातावरण योग्य असल्याचे मत कृषी तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. रेशीमला वस्त्रउद्योगात मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने शेतकऱ्यांना भावही अधिक मिळण्याची शक्यता आहे. तरीही विदर्भात रेशीम शेती नगण्य असल्याचे दिसून येते. रेशीम शेती करण्याकरिता जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रेशीम संचालनालय कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. तालुकास्तरावर शेतकऱ्यांना रेशीम शेतीविषयी माहिती मिळण्यात अडचणी येत असल्याने शेतकरी रेशीम शेतीच्या माहितीपासून अनभिज्ञ राहत आहेत. प्रारंभी कुठलेही पीक नव्याने शेतात घेत असताना शेतकऱ्यांना वारंवार मार्गदर्शनाची आवश्यकता असते. जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय असल्याने आपल्याला वेळोवेळी रेशीम शेती करताना मार्गदर्शन मिळेल काय, अशी शंका शेतकऱ्यांना आहे.तालुका स्तरावर कार्यालय नाही. रेशीम संचालन कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. रेशीम शेती सदर कार्यालयाशी संलग्न आहे. अशा प्रकारचे कार्यालय तालुका स्तरावर शासनाने सुरू केल्यास त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होऊन शेतकरी रेशीम शेतीकडे वळू शकतो.तालुका कृषी विभागाकडून प्रस्तावरेशीम शेती करावयाची असल्यास प्रस्ताव जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रेशीम संचालनालयाकडे द्यावा लागतो. जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे त्रासदायक ठरत असल्याने तालुका कृषी विभागाकडे रेशीम शेतीचा प्रस्ताव दिल्यास तो रेशीम संचालनयाकडे कृषी विभागाने पाठविणे सुरू केले आहे.कृषी विभागास रेशीम संचालनालय जोडावेबहुतांश शेतीविषयी योजना तालुका कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर रेशीम संचालनालय हे कृषी कार्यालयाशी जोडल्यास रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी उपलब्धी होईल व तालुका स्तरावरील कृषी कार्यालयात जावून वेळोवेळी मार्गदर्शन घेणे रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सोयीचे ठरणार आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती