शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

शाळा सुरू, बस बंद! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 17:25 IST

शाळा सुरू केल्या. मात्र, बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चिमूर आगारातील ग्रामीण भागातून जाणाऱ्या बस मात्र अजूनही बंद आहेत. दररोज भाडे खर्च करून जाणे परवडणारे नसल्याने पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देशासन व बस कर्मचाऱ्यांच्या संघर्षात विद्यार्थ्यांचे नुकसान

विकास खोब्रागडे

चंद्रपूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे ऑफलाइन पद्धतीने शाळा सुरू झाल्या. त्यानंतर शाळा सुरू होऊन महिना होताच विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्या लागल्या. सुट्यानंतर शाळा पूर्ववत सुरू झाल्या. मात्र, जेमतेम महिना होत नाही तर बस कर्मचाऱ्यांनी शासनाने त्यांना शासन सेवेत विलीनीकरण करावे, या मागणीसाठी संप पुकारला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू होऊन महिना उलटला, तरी बरेचसे विद्यार्थी अजूनही घरीच आहेत. एसटीअभावी अनेकांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्राथमिक शिक्षण देण्यासाठी गावागावात शाळा आहेत. मात्र, माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी अनेक गावांमधील विद्यार्थ्यांना आपल्या गावापासून २२ ते २५ किलोमीटर परिसरातील मोठ्या गावात जावे लागते. यासाठी शासनाच्या एसटी सेवेचा वापर विद्यार्थी करतात.

शाळा सुरू केल्या. मात्र, बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चिमूर आगारातील ग्रामीण भागातून जाणाऱ्या बस मात्र अजूनही बंद आहेत. दररोज भाडे खर्च करून जाणे परवडणारे नसल्याने पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत नसल्याचे चित्र आहे. एसटी कर्मचारी आंदोलनावर तोडगा न निघाल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्ग चिंतित आहे. विद्यार्थ्यांना व पालकांनाही एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाविषयी सहानुभूती आहे. त्यामुळे शासनाने त्यांच्या मागण्या मान्य करून संपाला पूर्णविराम द्यावा, अशी मागणी होत आहे.

विद्यार्थिनींची मोठी गैरसोय

सर्वाधिक नुकसान विद्यार्थिनींचे होत आहे. विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने शहरात कधी कधी येतात किंवा गावी जाऊ शकत आहेत. विद्यार्थिनींना मात्र अनेक मर्यादा येत असल्याने आणि पालकही धजावत नसल्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. सामान्य एस.टी.च्या फेऱ्यांसह मानव विकास मिशनच्या विद्यार्थिनींसाठीच्या बसदेखील बंद आहेत. अशा बऱ्याच ठिकाणी एसटी नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अडचणीचे ठरत आहे. काही ठिकाणी खाजगी गाड्यांमधून अतिरिक्त पैसे देऊन मुली व मुले शाळेत पाठविले जात आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीST Strikeएसटी संपPublic Transportसार्वजनिक वाहतूकstate transportएसटी