शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

स्कूलबस चालकांना १४ महिन्यांपासून नाही काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:28 IST

चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या संकटामुळे मागील १४ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे स्कूलबस चालकांवर उपासमारीची वेळ आली असून, अनेकांनी ...

चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या संकटामुळे मागील १४ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे स्कूलबस चालकांवर उपासमारीची वेळ आली असून, अनेकांनी भाजीपाला तसेच अन्य छोटे-छोटे काम करून उदरनिर्वाह सुरू केला आहे. विशेष म्हणजे, काही बस या शैक्षणिक संस्थांच्याच आहे. त्यामुळे अनेकांनी त्यांना या काळामध्ये पैसेही दिले नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये नैराश्याचे वातावरण आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये कोरोनाचे संकट धडकले. तेव्हापासून शाळांना सुटी देण्यात आली. मध्यंतरी आठवी ते पुढील वर्गाचे नियमित वर्ग सुरू करण्यात आले. त्यानंतर २७ जानेवारीपासून पाचवीपासूनचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र हे वर्गही काही दिवसांचे ठरले. त्यानंतर पुन्हा कोरोनाने धडक दिल्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या. एवढेच नाही तर यावर्षी परीक्षासुद्धा झाल्या नाहीत. शाळाच बंद असल्यामुळे स्कूल बसही बंद आहे. परिणामी बसचालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. जिल्ह्यातील काही शाळा स्वत:च्या बस घेऊन त्यांचे व्यवस्थापन करतात; तर काही खासगी मालकांकडून भाड्याने बस चालविल्या जातात. मात्र यामध्ये स्कूलबस चालकांना कामच उरले नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. काही शाळांनी मागील वर्षी या चालकांना वेतन दिले. मात्र यावर्षीही कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे फी वसूलच झाली नसल्यानेे या चालकांनाही आता वेतनापासून मुकावे लागत आहे. परिणामी अनेकांनी आता भाजीपाला, फळविक्री तसेच अन्य छोटे-मोठे काम सुरू केले आहे; तर काहींनी शेतावर शेतमजूर म्हणून जाणेही सुरू केले आहे

बाॅक्स

या आहेत मागण्या

शासनाने स्कूलबस चालकांना महिन्याकाठी अनुदान द्यावे

लाॅकडाऊनच्या काळात मोफत रेशन द्यावे.

शाळा व्यवस्थापनाला सांगून किमान मानधन देण्यास लावावे.

ज्या स्कूलबस मालकांनी कर्ज घेऊन स्कूलबस खरेदी केली, त्यांचे लाॅकडाऊनच्या काळातील व्याज माफ करावे

बाॅक्स

रोजंदारीवर काम

स्कूल बसचालकांना काही शाळा प्रशासन नियमित काम देत असले तरी काही रोजंदारीवर कामावर लावतात. त्यामुळे या चालकांना शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही. बहुतांश शाळांना आपल्या स्वत:च्या मालकीच्या बस खरेदी केल्या आहेत. त्यामुळे चालकांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनभत्ते देणे अपेक्षित असतानाही स्कुल बस चालकांची शाळांच्या दप्तरी नोंदसुद्धा राहत नसल्याची माहिती चालकांनी दिली.

कोट

मयूर दुधे, स्कूलबस चालक

न.प.मध्ये घंटागाडी चालवतोय

मागील वर्षीपासून शाळा बंद आहे. त्यामुळे स्कूलबस बंद झाल्या. त्यामुळे हातचे काम गेल्यामुळे बेरोजगार झालो. दरम्यान, नगर परिषदेच्या घंटागाडीवर चालक पाहिजे असल्याची माहिती मिळताच ती गाडी चालवून उदरनिर्वाह सुरू केला आहे.

कोट

महेश मेश्राम, स्कूसबस चालक

सध्या बेरोजगार

शाळा बंद झाल्यामुळे स्कूल बस चालविण्याचे काम गेले. त्यामुळे सद्य:स्थितीत बेरोजगार व्हावे लागते. यावर्षी शाळा सुरू झाल्यास स्कूलबस सुरू होईल आणि काम मिळेल, अशी आशा आहे. मात्र कोरोना संकटामुळे यावर्षीही शाळा सुरू होते की नाही,अद्यापही स्पष्ट झाले नाही.

कोट

अभय तावाडे, स्कूलबस मालक

किराणा दुकान सुरू केले

टूर आणि ट्रॅव्हल्स तसेच स्कूलबसद्वारे व्यवसाय सुरू केला. मागील १३ ते १४ महिन्यांपासून शाळा बंद आहे. त्यामुळे स्कूल बस बंद पडल्या. हा व्यवसाय धोक्यात आल्यामुळे आता उदरनिर्वाहासाठी किराणा दुकान लावले आहे. या माध्यमातून आर्थिक अडचणीवर मात करणे सुरू केले.

कोट

इम्राम शेख, स्कूलबस चालक

व्यवसाय ठप्प, अडचणींचा सामना

कोरोना संकटामुळे प्रत्येकजण अडचणीत आले आहे. शाळेमध्ये स्वत:च्या मालकीची स्कूल बस चालवीत होतो. मात्र शाळा बंद झाल्यामुळे बसही बंद झाली. त्यामुळे सध्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

बाॅक्स

एकण स्कूल बस - ०००

१७०००

मुले दररोज स्कूलबसने प्रवास करायची

१०००

एकूण चालक