शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

वरोऱ्यातील शेतकऱ्याने विकसित केले ‘एसबीजी’ सोयाबीन वाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 19:59 IST

वरोरा तालुक्यातील वायगाव (भोयर) येथील शेतकरी सुरेश बापूराव गरमडे यांनी सतत सात वर्षांपासून १५ एकर शेतीमध्ये प्रयोग करून ‘एसबीजी-९९७’ हे सोयाबीन वाण विकसित केले़ आहे़.

ठळक मुद्देसात वर्षांच्या प्रयोगाची फलश्रुतीरोग प्रतिकारशक्ती सर्वोत्तम असल्याचा दावा

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तुटपुंज्या संशोधन साधनांवर मात करून निरीक्षणशक्ती व शेती-माती, हवामान आणि पर्जन्यमानाच्या बारकाव्यांचा अभ्यास करून वरोरा तालुक्यातील वायगाव (भोयर) येथील शेतकरी सुरेश बापूराव गरमडे (शिक्षण इयत्ता नववी) यांनी सतत सात वर्षांपासून १५ एकर शेतीमध्ये प्रयोग करून ‘एसबीजी-९९७’ हे सोयाबीन वाण विकसित केले़ आहे़. हे वाण केसाळ स्वरूपाचे असून १०६ दिवसांत उत्पन्न होते़ पांढरी माशी व मावा तुडतुड्यांचा या वाणाला प्रादुर्भाव होत नाही़ रोगप्रतिकारशक्ती सर्वोत्तम असल्याने आंतरपिकालाही पूरक असल्याचा दावा गरमडे यांनी केला आहे़.ताडोबा व्याघ्र प्रकल्पासून सुमारे दोन हजार फु टांवर सुरेश गरमडे यांची १७ एकर शेती आहे. यामध्ये सात वर्षांपूर्वी पारंपरिक पिके घेतली जात होती. समाधानकारक पीक हाती न आल्याने नाविण्यपूर्व पिकांचा शोध त्यांनी सुरू केला. २०११ च्या खरीप हंगामात त्यांनी सोयाबीनची लागवड केली. दरम्यान, या पिकातील दोन झाडे नाविण्यपूर्व वाटल्याने गरमडे यांनी दुसऱ्या वर्षांपासून त्या बियाण्यांची स्वतंत्र लागवड करणे सुरू केले. अशातच दरवर्षी लागवडीचे क्षेत्र वाढवून त्यावर संशोधन सुरू केले. गावातील अन्य शेतकऱ्यांचे बदलत्या वातावरणामुळे प्रचंड नुकसान होत असताना गरमडे यांच्या उत्पादनात मात्र दरवर्षी भर पडत होती. त्यामुळे १५ ते १७ एकरमध्ये सोयाबीन लागवड सुरू केली. अल्प पाऊस, उष्णता, कीडींचा प्रादुर्भाव या तिन्ही घटकांचा गरमडे यांच्या पिकावर कोणताही अनिष्ट परिणाम झाला नाही. गतवर्षीच्या खरीप हंगामात या वाणाचे अंतिम निष्कर्ष हाती आले. त्यानुसार हे वाण १०६ दिवसांमध्ये पूर्ण विकसीत होवून उत्पन्न हाती येते. एकरी १७ क्विंटल असे उत्पन्नाचे प्रमाण असून मावा तुडतुडे, पांढऱ्या माशीसह सर्व प्रकारच्या किडींचा या वाणावर अनिष्ठ परिणाम होत नाही. विकसित केलेल्या वाणाला त्यांनी ‘एसबीजी-९९७’ म्हणजे ‘सुरेश बापूराव गरमडे-९९७’ हे नाव दिले आहे.‘यलो मोझॅक’ रोगाचा प्रतिकारप्रतिकूल हवामानातही एकरी १७ क्विंटल उत्पन्न देणारे सोयाबीन वाण राज्यातील कोणत्याही कृषी विद्यापीठातील संशोधकांनी अद्याप शोधले नाही. त्यामुळे कृषी विभागातील तालुका ते जिल्हास्तरावरील बहुतेक सर्वच कृषी अधिकाऱ्यांनी सुरेश गरमडे यांच्या शेतीची वारंवार पाहणी केली. ‘यलो मोझॅक’ रोगाचा प्रतिकार व कीडीला बळी न पडणाºया ‘एसबीजी-९९७’ वाणाच्या झाडाची उंची ७५ सेंटीमीटरपर्यंत वाढते. एका झाडाला १४० ते १५० शेंगा लागतात. सलग सात वर्षांपासून एकच निष्कर्ष हाती येत असल्याने कृषी अधिकारीदेखील थक्क झाले आहेत.पेटंटसाठी पाठविला प्रस्तावएचएमटी धानाचे जनक दादाजी खोब्रागडे यांनी धानाच्या वाणांचे संशोधन करूनही प्रशासनातील काही झारीच्या शुक्राचार्यांनी मोठी उपेक्षा केली होती. मात्र, जिल्ह्यातीलच काही कृषी अधिकाऱ्यांनी सुरेश गरमाडे यांच्या संशोधनाला पाठबळ देवून पेटंटसाठी प्रस्ताव करण्यासंदर्भात पाठबळ दिले. मार्गदर्शन केले. परिणामी पीक वाण शेतकरी हक्क कायदा २००१ अंतर्गत महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या पाठपुराव्यातून पुणे येथे स्थापन झालेल्या पेटंट प्राधिकरण कार्यालयात गरमडे यांनी मागील महिन्यात प्रस्ताव दाखल केला. हा प्रस्ताव दिल्ली येथील मुख्य कार्यालयात सादर करण्यात आला आहे. पेटंटसंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना प्राधिकरणाचे उपसचिव डॉ. एस. बी. गुरव म्हणाले, शेतात स्वतंत्र वाढविलेल्या, विकसित केलेल्या तसेच वेगळे गुणधर्म असलेल्या वाणाला मान्यता मिळाल्यास सदर शेतकऱ्यांचा या वाणावरील हक्क १५ वर्षे अबाधित राहणार आहे.- तरच देणार इतरांना बियाणेदादाजी खोब्रागडे यांच्या कार्यापासून जिज्ञासा निर्माण झाली. सध्या उपलब्ध असलेल्या सर्व सोयाबीन वाणांचा सखोल अभ्यास केला. दादाजींच्या धान संशोधनाचा काहींनी गैरफ ायदा घेतला. हा प्रकार घडू नये, यासाठी मी विकसित केलेले सोयाबीन वाण अद्याप कुणालाही दिले नाही. पीक वाण शेतकरी हक्क कायद्यानुसार नोंदणी झाल्यानंतरच हे वाण उपलब्ध करू देणार आहे.- सुरेश गरमडे, वायगाव (भो.)

टॅग्स :agricultureशेती