शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अजूनही तिथे क्षारयुक्त पाण्याचा शाप मिटेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 13:46 IST

आरोग्य धोक्यातः शुद्ध पाणी मिळणार कधी?

लोकमत न्यूज नेटवर्कपळसगाव : उन्हाळा असो की पावसाळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या आजही न सुटण्यासारखे कोडे आहे. गावोगावी शासनाने कूपनलिका खोदल्या आहेत; पण त्यामधून येणारे पाणी काही ठिकाणी क्षारयुक्त तर कुठे खारे आहे. त्यामुळे ग्रामस्थांना विविध आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर क्षारयुक्त पाण्याचा शाप कधी मिटेल ? हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव हे अंदाजे ३१०० लोकसंख्येचे गाव आहे. या गावात शासनाने मागणीनुसार प्रत्येक ठिकाणी पाण्यासाठी कूपनलिका खोदल्या आहेत; पण त्या कूपनलिकांमधील पाणी हे पिण्यासाठी अयोग्य असल्याने कुणीच त्याचा वापर करताना दिसत नाही. फक्त गावातील एकाच बोअरिंगवर सूर्य उगवल्यापासून ते मावळेपर्यंत अफाट गर्दी असते.

एकाच बोअरिंगचे शुद्ध पाणी पिण्यास योग्य असल्याने संपूर्ण गावाची धाव आता फक्त त्याच पाण्याकडे आहे; पण त्या पाण्यात असलेले क्षार कितपत आपल्या पोटात जात असतील, हे कुणाला माहिती नाही. कारण पाण्याची चव ही गोड असली तरी काही प्रमाणात क्षार पोटात मात्र प्रवेश करतातच.

कोट्यवधी रुपयांचा निधी सामान्य जनतेला शुद्ध पाणी मिळावे म्हणून खर्च केला जातो. त्यासाठी पाण्याच्या टाक्या उभारल्या गेल्या, घरोघरी पाइपलाइन टाकण्यात आली; मात्र पाणी कधी मिळेल, याची गॅरंटी कोणी देत नाही. 

निधी खर्च होऊनही पाणी मिळेना !पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असते; पण त्या पैशांनी सामान्य नागरिकांची पाण्याची समस्या आजही सुटत नसल्याचे वास्तव आहे. शुद्ध पाणी पिण्यासाठी आजही नागरिकांना वाटच बघावी लागत आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणwater scarcityपाणी टंचाईwater transportजलवाहतूकchandrapur-acचंद्रपूर