शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

अजूनही तिथे क्षारयुक्त पाण्याचा शाप मिटेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 13:46 IST

आरोग्य धोक्यातः शुद्ध पाणी मिळणार कधी?

लोकमत न्यूज नेटवर्कपळसगाव : उन्हाळा असो की पावसाळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या आजही न सुटण्यासारखे कोडे आहे. गावोगावी शासनाने कूपनलिका खोदल्या आहेत; पण त्यामधून येणारे पाणी काही ठिकाणी क्षारयुक्त तर कुठे खारे आहे. त्यामुळे ग्रामस्थांना विविध आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर क्षारयुक्त पाण्याचा शाप कधी मिटेल ? हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव हे अंदाजे ३१०० लोकसंख्येचे गाव आहे. या गावात शासनाने मागणीनुसार प्रत्येक ठिकाणी पाण्यासाठी कूपनलिका खोदल्या आहेत; पण त्या कूपनलिकांमधील पाणी हे पिण्यासाठी अयोग्य असल्याने कुणीच त्याचा वापर करताना दिसत नाही. फक्त गावातील एकाच बोअरिंगवर सूर्य उगवल्यापासून ते मावळेपर्यंत अफाट गर्दी असते.

एकाच बोअरिंगचे शुद्ध पाणी पिण्यास योग्य असल्याने संपूर्ण गावाची धाव आता फक्त त्याच पाण्याकडे आहे; पण त्या पाण्यात असलेले क्षार कितपत आपल्या पोटात जात असतील, हे कुणाला माहिती नाही. कारण पाण्याची चव ही गोड असली तरी काही प्रमाणात क्षार पोटात मात्र प्रवेश करतातच.

कोट्यवधी रुपयांचा निधी सामान्य जनतेला शुद्ध पाणी मिळावे म्हणून खर्च केला जातो. त्यासाठी पाण्याच्या टाक्या उभारल्या गेल्या, घरोघरी पाइपलाइन टाकण्यात आली; मात्र पाणी कधी मिळेल, याची गॅरंटी कोणी देत नाही. 

निधी खर्च होऊनही पाणी मिळेना !पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असते; पण त्या पैशांनी सामान्य नागरिकांची पाण्याची समस्या आजही सुटत नसल्याचे वास्तव आहे. शुद्ध पाणी पिण्यासाठी आजही नागरिकांना वाटच बघावी लागत आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणwater scarcityपाणी टंचाईwater transportजलवाहतूकchandrapur-acचंद्रपूर