शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अजूनही तिथे क्षारयुक्त पाण्याचा शाप मिटेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 13:46 IST

आरोग्य धोक्यातः शुद्ध पाणी मिळणार कधी?

लोकमत न्यूज नेटवर्कपळसगाव : उन्हाळा असो की पावसाळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या आजही न सुटण्यासारखे कोडे आहे. गावोगावी शासनाने कूपनलिका खोदल्या आहेत; पण त्यामधून येणारे पाणी काही ठिकाणी क्षारयुक्त तर कुठे खारे आहे. त्यामुळे ग्रामस्थांना विविध आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर क्षारयुक्त पाण्याचा शाप कधी मिटेल ? हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव हे अंदाजे ३१०० लोकसंख्येचे गाव आहे. या गावात शासनाने मागणीनुसार प्रत्येक ठिकाणी पाण्यासाठी कूपनलिका खोदल्या आहेत; पण त्या कूपनलिकांमधील पाणी हे पिण्यासाठी अयोग्य असल्याने कुणीच त्याचा वापर करताना दिसत नाही. फक्त गावातील एकाच बोअरिंगवर सूर्य उगवल्यापासून ते मावळेपर्यंत अफाट गर्दी असते.

एकाच बोअरिंगचे शुद्ध पाणी पिण्यास योग्य असल्याने संपूर्ण गावाची धाव आता फक्त त्याच पाण्याकडे आहे; पण त्या पाण्यात असलेले क्षार कितपत आपल्या पोटात जात असतील, हे कुणाला माहिती नाही. कारण पाण्याची चव ही गोड असली तरी काही प्रमाणात क्षार पोटात मात्र प्रवेश करतातच.

कोट्यवधी रुपयांचा निधी सामान्य जनतेला शुद्ध पाणी मिळावे म्हणून खर्च केला जातो. त्यासाठी पाण्याच्या टाक्या उभारल्या गेल्या, घरोघरी पाइपलाइन टाकण्यात आली; मात्र पाणी कधी मिळेल, याची गॅरंटी कोणी देत नाही. 

निधी खर्च होऊनही पाणी मिळेना !पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असते; पण त्या पैशांनी सामान्य नागरिकांची पाण्याची समस्या आजही सुटत नसल्याचे वास्तव आहे. शुद्ध पाणी पिण्यासाठी आजही नागरिकांना वाटच बघावी लागत आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणwater scarcityपाणी टंचाईwater transportजलवाहतूकchandrapur-acचंद्रपूर