शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
2
नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
3
“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका
4
भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध
5
धक्कादायक! भारतात महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ; पुरुष कैद्यांच्या वाढीच्या तुलनेत वेग दुप्पट!
6
काँग्रेसच्या सर्व्हेनेच राहुल गांधींचा दावा खोटा ठरवला! लोकांचा ईव्हीएमवर विश्वास
7
मुलींच्या मेसेजने हैराण झालाय प्रणित मोरे, चाहतीने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला- "तिने मला पत्रिका पाठवली आणि..."
8
बंटी जहागीरदार हत्या: गोळ्या झाडून फरार झालेल्या आरोपींना समृद्धी महामार्गावर अटक, कसे पकडले?
9
'आम्ही तुझ्याबद्दल विचार करतो..', न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचे उमर खालिदला पत्र
10
मी पाकिस्तानी अन् मुस्लिम यामुळे मला...; गंभीर आरोप करत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा...
11
हृदयद्रावक! आईला शेवटचा कॉल, पत्नीला पाठवलं लोकेशन; SBI मॅनेजरने नदीत मारली उडी अन्...
12
पहिल्याच दिवशी १००% नं वधारला 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IPO ला मिळालेला जोरदार प्रतिसाद
13
डिलिव्हरी बॉय बनून घरात शिरला, चाकूचा धाक दाखवून विद्यार्थिनीला लुटलं अन्... अंधेरीतील थरार!
14
एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं! शॅम्पेनची ती पेटती बाटली छताला लागली अन्... प्रत्यक्षदर्शीने सांगितला तो थरार!
15
'पागल हो गया है क्या?', अक्षय खन्ना कास्टिंग डायरेक्टरवर चिडलाच; नक्की काय घडलेलं?
16
"देवाने आनंद दिला, पुन्हा हिरावून घेतला"; १० वर्षांनी नवसाने झालेल्या ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू
17
ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर
18
25 वर्षांचा विक्रम मोडला! एका कारने बदलले कंपनीचे नशीब; इतक्या गाड्यांची विक्री...
19
'IC-814' हायजॅक आणि मसूद अजहरची सुटका; त्या ७० तासांत नेमकं काय घडलं? कुख्यात दहशतवाद्याचा नवा दावा
20
ITC-Godfrey Phillips India Stocks: सरकारच्या एका निर्णयानं 'या' कंपन्यांना जोरदार झटका, दोन दिग्गज कंपन्यांचे शेअर्स आपटले; ६०००० कोटी बुडाले
Daily Top 2Weekly Top 5

रेशनच्या धान्याची किराणा दुकानातून विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 05:00 IST

सन २०१४ मध्ये अन्नसुरक्षा कायदा अंमलात आला. त्यामुळे मोठ्या संख्येने रेशनकार्डधारकांना योजनेत समाविष्ट करण्यात आले. काही वर्षापूर्वी कोरपना तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदारांकडून काळाबाजार सुरू होता. याविरोधात नांदा शहर युवक कॉंग्रेसने व्यापक आंदोलन सुरू केले होते. यामुळे अनेक दुकानाचे निलंबन करण्यात आले होते. यानंतर धान्य वाटपाकरिता शासनाने पाॅस मशिन प्रणाली लागू केली.

लोकमत न्यूज नेटवर्कआवाळपूर : गरज नसलेल्या अनेक कुटुंबीयांना रेशनकॉर्डवर गहू, तांदूळचे वितरण करण्यात येते. मात्र हे कुुटुंबीय हे तांदूळ व गहू खात नसल्याचे या धान्यांची परस्पर गावातीलच दुकानदारांना विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार नांदाफाटा परिसरात उघडकीस येत आहे. त्यामुळे गरजवंतावर अन्याय होत असल्याने श्रीमंत लाभार्थ्यांचे रेशन बंद करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.  सन २०१४ मध्ये अन्नसुरक्षा कायदा अंमलात आला. त्यामुळे मोठ्या संख्येने रेशनकार्डधारकांना योजनेत समाविष्ट करण्यात आले. काही वर्षापूर्वी कोरपना तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदारांकडून काळाबाजार सुरू होता. याविरोधात नांदा शहर युवक कॉंग्रेसने व्यापक आंदोलन सुरू केले होते. यामुळे अनेक दुकानाचे निलंबन करण्यात आले होते. यानंतर धान्य वाटपाकरिता शासनाने पाॅस मशिन प्रणाली लागू केली. यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांकडून होणाऱ्या काळाबाजारीला लगाम बसला. मध्यंतरीच्या काळात अनेक श्रीमंत व कंपन्यांमध्ये शासकीय नोकरीवर असलेल्या नागरिकांनी आपल्या कुटुंबाचे नाव अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करून घेतली. कोरोना काळात आर्थिक परिस्थिती विस्कटल्याने केंद्र शासनाने मोफत धान्य योजना अमलात आणली. यामुळे रेशनकार्डधारकांना आता मुबलक प्रमाणात धान्य मिळत आहे. काही श्रीमंत व नोकरदार वर्ग रेशनचे गहू तांदूळ हलक्या दर्जाचे असल्याने स्वत: खात नाही.रेशनचे धान्य जनावरांना टाकणे, गरजूंना चढ्या दरात विक्री करणे असा गैरप्रकार सुरू झाला आहे. एकीकडे तालुक्यातील अनेक गोरगरीब कुटुंबांना रेशनचे धान्य मिळत नाही. तर इष्टांक नसल्याचे कारण देऊन वर्षभरापासून अनेक शिधापत्रिकाधारकांना पात्र असतानाही धान्य मिळत नसल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे श्रीमंत व नोकरदार वर्गाकडून धान्याची उचल करून त्याची परस्पर दुकानामध्ये विक्री केली जात आहे. नांदा येथील पदाधिकाऱ्यांच्या घरातील सदस्यांनी अंधाराचा वेळ साधत रेशनचे धान्य लगतच्या होलसेल किराणा दुकानात विकल्याने नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

नवीन शिधापत्रिका अन्नसुरक्षा योजनेत घेण्यापूर्वी ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयामध्ये प्रसिद्ध केली जाते. श्रीमंत कुटुंबे असल्यास नागरिकांनी आक्षेप घेणे अपेक्षित आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीचे पदाधिकारीही माहिती देऊ शकतात. श्रीमंत कुटुंबांना लाभ मिळत असल्यास तक्रार द्यावी, कारवाई करता येइल. - राजेश माकोडे पुरवठा विभाग कोरपना 

मागील १८ महिन्यांत रेशनकार्ड सुरू करण्याकरिता दोनदा अर्ज केला. परंतु धान्य मिळत नाही. मोठ्या लोकांना धान्याची गरज नसतानाही धान्य मिळते. परंतु, मजुरी करणा-या कुटुंबांना धान्य मिळत नाही.   - वंदना सोनटक्के,नांदा

 

टॅग्स :government schemeसरकारी योजना