शहरं
Join us  
Trending Stories
1
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
2
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
3
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
4
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
5
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
6
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
7
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
8
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
9
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
11
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
12
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
14
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
15
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
16
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
17
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
18
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
19
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
20
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न

रेशनच्या धान्याची किराणा दुकानातून विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 05:00 IST

सन २०१४ मध्ये अन्नसुरक्षा कायदा अंमलात आला. त्यामुळे मोठ्या संख्येने रेशनकार्डधारकांना योजनेत समाविष्ट करण्यात आले. काही वर्षापूर्वी कोरपना तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदारांकडून काळाबाजार सुरू होता. याविरोधात नांदा शहर युवक कॉंग्रेसने व्यापक आंदोलन सुरू केले होते. यामुळे अनेक दुकानाचे निलंबन करण्यात आले होते. यानंतर धान्य वाटपाकरिता शासनाने पाॅस मशिन प्रणाली लागू केली.

लोकमत न्यूज नेटवर्कआवाळपूर : गरज नसलेल्या अनेक कुटुंबीयांना रेशनकॉर्डवर गहू, तांदूळचे वितरण करण्यात येते. मात्र हे कुुटुंबीय हे तांदूळ व गहू खात नसल्याचे या धान्यांची परस्पर गावातीलच दुकानदारांना विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार नांदाफाटा परिसरात उघडकीस येत आहे. त्यामुळे गरजवंतावर अन्याय होत असल्याने श्रीमंत लाभार्थ्यांचे रेशन बंद करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.  सन २०१४ मध्ये अन्नसुरक्षा कायदा अंमलात आला. त्यामुळे मोठ्या संख्येने रेशनकार्डधारकांना योजनेत समाविष्ट करण्यात आले. काही वर्षापूर्वी कोरपना तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदारांकडून काळाबाजार सुरू होता. याविरोधात नांदा शहर युवक कॉंग्रेसने व्यापक आंदोलन सुरू केले होते. यामुळे अनेक दुकानाचे निलंबन करण्यात आले होते. यानंतर धान्य वाटपाकरिता शासनाने पाॅस मशिन प्रणाली लागू केली. यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांकडून होणाऱ्या काळाबाजारीला लगाम बसला. मध्यंतरीच्या काळात अनेक श्रीमंत व कंपन्यांमध्ये शासकीय नोकरीवर असलेल्या नागरिकांनी आपल्या कुटुंबाचे नाव अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करून घेतली. कोरोना काळात आर्थिक परिस्थिती विस्कटल्याने केंद्र शासनाने मोफत धान्य योजना अमलात आणली. यामुळे रेशनकार्डधारकांना आता मुबलक प्रमाणात धान्य मिळत आहे. काही श्रीमंत व नोकरदार वर्ग रेशनचे गहू तांदूळ हलक्या दर्जाचे असल्याने स्वत: खात नाही.रेशनचे धान्य जनावरांना टाकणे, गरजूंना चढ्या दरात विक्री करणे असा गैरप्रकार सुरू झाला आहे. एकीकडे तालुक्यातील अनेक गोरगरीब कुटुंबांना रेशनचे धान्य मिळत नाही. तर इष्टांक नसल्याचे कारण देऊन वर्षभरापासून अनेक शिधापत्रिकाधारकांना पात्र असतानाही धान्य मिळत नसल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे श्रीमंत व नोकरदार वर्गाकडून धान्याची उचल करून त्याची परस्पर दुकानामध्ये विक्री केली जात आहे. नांदा येथील पदाधिकाऱ्यांच्या घरातील सदस्यांनी अंधाराचा वेळ साधत रेशनचे धान्य लगतच्या होलसेल किराणा दुकानात विकल्याने नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

नवीन शिधापत्रिका अन्नसुरक्षा योजनेत घेण्यापूर्वी ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयामध्ये प्रसिद्ध केली जाते. श्रीमंत कुटुंबे असल्यास नागरिकांनी आक्षेप घेणे अपेक्षित आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीचे पदाधिकारीही माहिती देऊ शकतात. श्रीमंत कुटुंबांना लाभ मिळत असल्यास तक्रार द्यावी, कारवाई करता येइल. - राजेश माकोडे पुरवठा विभाग कोरपना 

मागील १८ महिन्यांत रेशनकार्ड सुरू करण्याकरिता दोनदा अर्ज केला. परंतु धान्य मिळत नाही. मोठ्या लोकांना धान्याची गरज नसतानाही धान्य मिळते. परंतु, मजुरी करणा-या कुटुंबांना धान्य मिळत नाही.   - वंदना सोनटक्के,नांदा

 

टॅग्स :government schemeसरकारी योजना