शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाचा विदर्भातील तांदूळ निर्यातीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 12:14 IST

रशिया-युक्रेन युद्धामुळे विदर्भातून या दोन देशांत होणाऱ्या बिगरबासमती तांदूळ निर्यातीलाही फटका बसला आहे. या भागातून या देशांमध्ये १० ते १२ हजार टन तांदूळ जातो, अशी माहिती राइस एक्स्पोर्ट्स असोसिएशन दिली.

ठळक मुद्देजहाजमार्ग बंद : विदर्भातून जातो १२ हजार टन तांदूळ

राजेश मडावी

चंद्रपूर : कोरोनाकाळात भारतातील तांदूळ आयातीला झळ पोहोचल्यानंतर आता स्थिती थोडी पूर्वपदावर आली होती. मात्र रशिया-युक्रेन युद्धामुळे शिपिंग कंपन्यांनी जहाज पाठविणे बंद केल्याने विदर्भातील गैरबासमती (चिन्नोर, श्रीराम कोलम) तांदळाच्या निर्यातीलाही फटका बसला आहे.

कोरोनापूर्वी गैरबासमती तांदळाची निर्यात १३.०८ दशलक्ष टन (एमटी) विक्रमी मालवाहतुकीपेक्षा जास्त झाली होती. जगातील सर्वांत मोठा तांदूळ निर्यातदार असलेल्या भारताने विदेशात ६.६ दशलक्ष टन बासमती तांदूळ पाठवला आहे. भारताच्या तांदळाची एकूण निर्यात ६५,२९७ कोटींवर गेली. भारताने २०१९-२० मध्ये ४५,४२६ कोटींच्या तांदळाची निर्यात केली होती. यात महाराष्ट्रातील विदर्भाचाही वाटा लक्षणीय आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे विदर्भातून या दोन देशांत होणाऱ्या बिगरबासमती तांदूळ निर्यातीलाही फटका बसला आहे. या भागातून या देशांमध्ये १० ते १२ हजार टन तांदूळ जातो, अशी माहिती राइस एक्स्पोर्ट्स असोसिएशन दिली.

कोरोनापूर्वी तांदूळ बाजारात दबदबा

कोरोनापूर्वी तांदूळ आयातीच्या बाजारात भारताचा दबदबा हाेता. १४-१५ दशलक्ष टन निर्यात होऊ शकेल असा अंदाज होता. मात्र युद्धामुळे या निर्यातीलाही अडथळे निर्माण झाले.

पारंपरिक तांदळाच्या मागणीलाही ब्रेक

कृषी संशोधनामुळे बाजारपेठेत तांदळाचे नवीन वाण येत आहेत. परंतु भारतातील पारंपरिक वाणांनाही जगात मागणी आहे, विशेषकरून ११२१ या जातीच्या तांदळाला आखाती देशातून मागणी वाढत होती. युद्धामुळे भारतातील पारंपरिक तांदळाच्या मागणीला ब्रेक लागला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात गैरबासमती तांदूळ निर्यातीची प्रचंड क्षमता असूनही पायाभूत सुविधा नाहीत. आम्ही नागपूरच्या व्यावसायिकांना तांदूळ विकतो. तिथून ते मुंबईला विकतात. त्यानंतर जहाजमार्गे हा तांदूळ विदेशात जातो. राईस टेस्टिंग फेल झाल्यास आमच्यावरच आर्थिक भुर्दंड बसताे. अन्य राज्यांच्या तुलनेत विजेचे दर सर्वाधिक आहेत. गोंदिया-भंडारा जिल्ह्यात काही प्रमाणात थेट निर्यात सुविधा झाल्या, मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अभाव आहे. आता युद्धामुळे व्यवहारावरही मर्यादा आल्या आहेत.

-जीवन कोंतमवार, सचिव, चंद्रपूर जिल्हा राईस मिल असोसिएशन, चंद्रपूर

टॅग्स :agricultureशेतीRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धFarmerशेतकरीVidarbhaविदर्भ