शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाचा विदर्भातील तांदूळ निर्यातीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 12:14 IST

रशिया-युक्रेन युद्धामुळे विदर्भातून या दोन देशांत होणाऱ्या बिगरबासमती तांदूळ निर्यातीलाही फटका बसला आहे. या भागातून या देशांमध्ये १० ते १२ हजार टन तांदूळ जातो, अशी माहिती राइस एक्स्पोर्ट्स असोसिएशन दिली.

ठळक मुद्देजहाजमार्ग बंद : विदर्भातून जातो १२ हजार टन तांदूळ

राजेश मडावी

चंद्रपूर : कोरोनाकाळात भारतातील तांदूळ आयातीला झळ पोहोचल्यानंतर आता स्थिती थोडी पूर्वपदावर आली होती. मात्र रशिया-युक्रेन युद्धामुळे शिपिंग कंपन्यांनी जहाज पाठविणे बंद केल्याने विदर्भातील गैरबासमती (चिन्नोर, श्रीराम कोलम) तांदळाच्या निर्यातीलाही फटका बसला आहे.

कोरोनापूर्वी गैरबासमती तांदळाची निर्यात १३.०८ दशलक्ष टन (एमटी) विक्रमी मालवाहतुकीपेक्षा जास्त झाली होती. जगातील सर्वांत मोठा तांदूळ निर्यातदार असलेल्या भारताने विदेशात ६.६ दशलक्ष टन बासमती तांदूळ पाठवला आहे. भारताच्या तांदळाची एकूण निर्यात ६५,२९७ कोटींवर गेली. भारताने २०१९-२० मध्ये ४५,४२६ कोटींच्या तांदळाची निर्यात केली होती. यात महाराष्ट्रातील विदर्भाचाही वाटा लक्षणीय आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे विदर्भातून या दोन देशांत होणाऱ्या बिगरबासमती तांदूळ निर्यातीलाही फटका बसला आहे. या भागातून या देशांमध्ये १० ते १२ हजार टन तांदूळ जातो, अशी माहिती राइस एक्स्पोर्ट्स असोसिएशन दिली.

कोरोनापूर्वी तांदूळ बाजारात दबदबा

कोरोनापूर्वी तांदूळ आयातीच्या बाजारात भारताचा दबदबा हाेता. १४-१५ दशलक्ष टन निर्यात होऊ शकेल असा अंदाज होता. मात्र युद्धामुळे या निर्यातीलाही अडथळे निर्माण झाले.

पारंपरिक तांदळाच्या मागणीलाही ब्रेक

कृषी संशोधनामुळे बाजारपेठेत तांदळाचे नवीन वाण येत आहेत. परंतु भारतातील पारंपरिक वाणांनाही जगात मागणी आहे, विशेषकरून ११२१ या जातीच्या तांदळाला आखाती देशातून मागणी वाढत होती. युद्धामुळे भारतातील पारंपरिक तांदळाच्या मागणीला ब्रेक लागला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात गैरबासमती तांदूळ निर्यातीची प्रचंड क्षमता असूनही पायाभूत सुविधा नाहीत. आम्ही नागपूरच्या व्यावसायिकांना तांदूळ विकतो. तिथून ते मुंबईला विकतात. त्यानंतर जहाजमार्गे हा तांदूळ विदेशात जातो. राईस टेस्टिंग फेल झाल्यास आमच्यावरच आर्थिक भुर्दंड बसताे. अन्य राज्यांच्या तुलनेत विजेचे दर सर्वाधिक आहेत. गोंदिया-भंडारा जिल्ह्यात काही प्रमाणात थेट निर्यात सुविधा झाल्या, मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अभाव आहे. आता युद्धामुळे व्यवहारावरही मर्यादा आल्या आहेत.

-जीवन कोंतमवार, सचिव, चंद्रपूर जिल्हा राईस मिल असोसिएशन, चंद्रपूर

टॅग्स :agricultureशेतीRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धFarmerशेतकरीVidarbhaविदर्भ