शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

रस्ते बांधकामात मोठ्याप्रमाणात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 1:16 AM

जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला तालुका विकासापासून वंचित असताना ढिसाळ राजकारण आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे विकासकामांवर अनिष्ट परिणाम होत असल्याचे निकृष्ट रस्ते बांधकामातून पुढे आले आहे.

ठळक मुद्देविभागाचे दुर्लक्ष : कंत्राटदारांना रान मोकळे

ऑनलाईन लोकमतगोंडपिपरी : जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला तालुका विकासापासून वंचित असताना ढिसाळ राजकारण आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे विकासकामांवर अनिष्ट परिणाम होत असल्याचे निकृष्ट रस्ते बांधकामातून पुढे आले आहे. नियम डावलून बांधकाम केले जात असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तालुक्यात अनेक गावांमध्ये रस्ते बांधकाम सुरू आहे. मात्र, निकष डावलल्याने गुणवत्ता घसरली. सा. बां. विभागाचे अधिकारी व अभियंता विकास कामांकडे पाठ फिरवित आहे. ज्या गावांत कामे सुरू आहेत, तिथे दौरे न करताना केवळ कंत्राटदारांवर भरोसा ठेवून आहेत.राज्याचे वित्त नियोजन, अर्थ व वनमंत्री ना. मुनगंटीवार यांनी शहविकासाचा दृरदृष्टीकोन ठेवून येथील नगरपंचायतील १० कोटींचा विकास निधी दिली. सदर विकास निधी अंतर्गत शहरात रस्ते, नाल्या बांधकाम जोमात सुरु आहे. प्रथमताच या शहराला एवढा भरगच्च निधी मिळाल्याने नागरिकांमध्येही समाधान व्यक्त केल्या जात होते.मात्र सदर निधी सा.बां. विभागाकडे वळते झाल्याने शहरातील निर्माण झालेले अनेक सिमेंट रस्ते अंदाजपत्रकानुसार नसून प्रत्यक्ष कामांवर उपस्थित न राहणाऱ्याअभियंत्यांनी कंत्राटदारांशी साटेलोटे करुन थातूरमातूर केले़ परिणामी, काही दिवसांपूर्वी नगरसेवकांनी चौकशीची मागणी केली होती. मात्र, वरिष्ठांनी दखल घेतली नाही़ वरिष्ठांचा तपासणी दौरा सुरू होणार असल्याचे पाहून मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले. शहरातील मुख्य मार्ग व इतर मार्गावर खड्डे जैसे-थे असल्याचे दिसून येत आहे़ शासकीय इमारतीचे देखभाल व दुरुस्ती काम करीत असताना प्रशासकीय तांत्रिक मंजूरी आणि करारनाम्यातील अटींचे पालन केले जात नाही़ या प्रशासकीय बाबी रितसर पूर्ण करण्याअगोदरच मर्जीतील कंत्राटदारांना कामे वाटपाचा प्रतापही तालुक्यात घडला आहे़गोंडपिपरी ते धाबा मार्गावर अनेक खड्डे आहेत़ गोंडपिपरी ते वढोली कोठारी, गोंडपिपरी ते मूल मार्गाचीही स्थिती वाईट आहे़ या मार्गावर सातत्याने डागडुजीची कामे करून कोट्यवधी रुपयांची देयके उचलली जात आहे़ तालुक्यातील विविध रस्त्यांची डागडुजी, खडीकरण डांबरीकरण कामांवर या विभागाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला़ ही कामे सुरू असताना संबंधित अधिकाºयांनी घटनास्थळाची पाहणीदेखील केली नाही़ यावरून रस्ते बांधकाम निष्कृष्ट झाल्याचे बोलले जात आहे. याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़तरच खरा विकासतालुक्याच्या विकासासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे़ यातून अनेक गावांमध्ये कामे सुरू आहेत़ मात्र, नियमांचे उल्लंघन न करता ही कामे पूर्ण करावी, अशी मागणी नागरिकांनी केली़ काही लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे कानाडोळा करीत असले तरी नियमाधिन कामांतूनच तालुक्याचा विकास होईल़