प्रत्येक योजनेचा लाभ गरजुंपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 06:00 IST2020-01-11T06:00:00+5:302020-01-11T06:00:23+5:30

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कामांच्या नियोजनामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनांचा लाभ देताना अडचणी येत आहेत. त्यामुळे बँक व इतर शासकीय यंत्रणेने जबाबदारीने कामे करावी, याकडेही खासदार धानोरकर यांनी लक्ष दिले.

Reach the benefits of each plan to those in need | प्रत्येक योजनेचा लाभ गरजुंपर्यंत पोहोचवा

प्रत्येक योजनेचा लाभ गरजुंपर्यंत पोहोचवा

ठळक मुद्देबाळू धानोरकर : मॅरेथॉन बैठकीत जिल्ह्यातील विकास योजनांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्र्रपूर : केंद्र्र आणि राज्य शासनाच्या योजना राबविताना कोणत्याही चुकीच्या धोरणाची झळ सामान्य नागरिकांना पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येक योजनेचा लाभ सर्वसामान्य गरजु नागरिकांपर्यंत पोहोचावा, अशा सूचना खासदार सुरेश धानोरकर यांनी शुक्रवारी जिल्हा विकास समन्वय समितीच्या पहिल्या बैठकीत दिल्या.
यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे, विविध पंचायत समितीचे सभापती, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, जिल्हा यंत्रणेतील सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती मार्फत प्रकल्प संचालक निलेश काळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते.
खासदार बाळू धानोरकर पुढे म्हणाले, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कामांच्या नियोजनामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनांचा लाभ देताना अडचणी येत आहेत. त्यामुळे बँक व इतर शासकीय यंत्रणेने जबाबदारीने कामे करावी, याकडेही खासदार धानोरकर यांनी लक्ष दिले. ग्रामीण भागामध्ये बीएसएनएल यंत्रणा काम करीत नसल्यामुळे बँकेच्या काम करण्याबाबत अडचणी येत असल्याचे यावेळी शिखर बँकेचे समन्वयक एस. एन. झा यांनी बैठकीत लक्षात आणून दिले. त्यामुळे खासदार धानोरकर यांनी गडचांदूर व अन्य दुर्गम भागांमध्ये बँकांना उत्तम इंटरनेट सुविधा तसेच अनेक योजनांची पूर्तता व खात्यामध्ये पैसे डिपॉझिट करताना येणाऱ्या अडचणी बीएसएनएलने तात्काळ निकाली काढावे, असे निर्देश यावेळी दिले.
आमदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण झाली असतानादेखील केवळ वीज जोडणीअभावी योजना सुरू झाल्या नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तीन तीन वर्षांपासून योजना तयार असताना केवळ वीज जोडण अभावी योजना अपूर्ण असतील तर याबाबत संबंधित यंत्रणेला जाब विचारावा, अशी मागणी बैठकीत केली.

योजनेतील मजुरांचे पैसे कदापि अडवू नका
शासकीय मेडिकल कॉलेजमधील कंत्राटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रलंबित देयके तातडीने द्यावे, शिक्षा अभियान, एकात्मिक बाल विकास योजना, मध्यान्न भोजन योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, डिजिटल इंडिया योजनांचाही आढावा घेण्यात आला. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत सावली व गडचिरोली येथील काही एजन्सीमध्ये वाढलेला गुंता सोडवावा. कोणत्याही यंत्रणेत काम करणाºया मजुरांचे पैसे कदापि अडवू नका, अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या.

Web Title: Reach the benefits of each plan to those in need

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.