शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

मालवाहतुकीमुळे रापमंची एसटी मालामाल, चालक मात्र कंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:23 IST

कोरोनामुळे एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या बंद करण्यात आला. आर्थिक संकटातून उभारी घेण्यासाठी मालवाहतूक सुरू करण्यात आली. यातून बरेच उत्पन्नही महामंडळाला ...

कोरोनामुळे एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या बंद करण्यात आला. आर्थिक संकटातून उभारी घेण्यासाठी मालवाहतूक सुरू करण्यात आली. यातून बरेच उत्पन्नही महामंडळाला मिळत आहे. परंतु, एखाद्या डोपोतून मालवाहतूक दुसऱ्या ठिकाणी नेल्यानंतर तेथूनही परतीसाठी मालवाहतूक मिळेल याचा काही नेम नाही. मालवाहतूक मिळेपर्यंत चालकांना त्या ठिकाणीच मुक्काम करावा लागतो. तर बहुतेकदा स्वत:च्या खिशातून पैसे संपवून परत यावे लागते. महामंडळाकडून देण्यात येणारा भत्ता तुटपुंजा आहे. त्यामुळे बहुतेकदा स्वत:च्या खिशातून पैसे संपवून जेवण घ्यावे लागते. जर मालवाहतुकीसाठी गेले नाही तर कारवाई होण्याची भीती असते. त्यामुळे मालवाहतुकीतून महामंडळाला उत्पन्न मिळत असले तरी बहुतेकदा चालकाला फटका बसत असतो.

-----

कोरोनाकाळात एक कोटीची कमाई

-कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. उत्पन्नासाठी महामंडळाने मालवाहतूक सुरू केली. साधारणत: मालवाहतुकीतून महामंडळाला १ कोटीच्या जवळपास उत्पन्न मिळाले आहे.

२) चंद्रपूर जिल्ह्यातील चार आगारातून ३० गाड्या नियमित मालवाहतुकीसाठी धावत आहेत.

३) कोरोनामुळे कडक निर्बंध असल्याने एसटी महामंडळाने १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवली असल्याचे सांगितले आहे.

बॉक्स

मालवाहतूक मिळेपर्यंत तेथेच मुक्काम

डेपोतून एसटीचे चालक माल घेऊन गेल्यास त्यांना परतीच्या मालवाहतुकीची हमी नाही. त्यामुळे जोपर्यंत दुसरी मालवाहतूक मिळत नाही तोपर्यंत तेथेच मुक्काम करावा लागतो. नाहीतर स्वत:च्या खर्चाने परत यावे लागते.

कोरोनामुळे खासगी वाहने तसेच महामंडळाच्या बसफेऱ्याही बंद आहेत. तसेच हॉटेल व रेस्टारंटसुद्धा बंद आहेत. त्यामुळे चालकांना मुक्काम करण्याची वेळ आल्यास मोठी फजिती होते. अनेकदा शिळ्या अन्नावर दिवस काढावे लागतात. तर कुठेकुठे जेवणाची व्यवस्था केलेली असते.

बॉक्स

ॲडव्हान्स मिळतो, पण पगारातून होतो कट

एसटी चालक मालवाहतुकीचे ट्रक घेऊन जातात. त्यासाठी त्यांना भत्ता दिला जातो. मात्र हा भत्ता तुटपुंजा असल्याने मोठी अडचण होते. तसेच हा भत्ता वेतनातून कपात केला जात असल्याची माहिती आहे. बऱ्याचदा पगारासोबत भत्ता दिला जाईल, असे सांगितले जाते; परंतु, कोरोनामुळे आता पगारही वेळेवर होत नसल्याने भत्ताही बऱ्याचदा प्रलंबित राहत असतो. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. याकडे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

------

संघटनेचे पदाधिकारी म्हणतात...

एखादा चालक मालवाहतूक घेऊन गेल्यास त्याला परत मालवाहतूक मिळेलच याची शाश्वती नाही. दुसरी मालवाहतूक होईपर्यंत त्याला तिथेचे थांबावे लागते. किंवा स्वत:च्या खिशातील पैसे संपवून परत यावे लागते. महामंडळाकडून त्याचे परत येण्याचे कुठलेच नियोजन नाही. -दत्ता बावणे, विभागीय सचिव महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

-------

ज्या ठिकाणी माल नेला जातो तेथून परतीची मालवाहतूक मिळेपर्यंत गाडी तेथेच ठेवावी लागते. आम्हाला एसटी महामंडळाकडून तुटपुंजा भत्ता दिला जातो. त्यामुळे हाल होतात. वाहतुकीसाठी गेले नाही तर कारवाई करण्याची भीती असते.

संजय सोनकर

विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना