शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

मालवाहतुकीमुळे रापमंची एसटी मालामाल, चालक मात्र कंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:23 IST

कोरोनामुळे एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या बंद करण्यात आला. आर्थिक संकटातून उभारी घेण्यासाठी मालवाहतूक सुरू करण्यात आली. यातून बरेच उत्पन्नही महामंडळाला ...

कोरोनामुळे एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या बंद करण्यात आला. आर्थिक संकटातून उभारी घेण्यासाठी मालवाहतूक सुरू करण्यात आली. यातून बरेच उत्पन्नही महामंडळाला मिळत आहे. परंतु, एखाद्या डोपोतून मालवाहतूक दुसऱ्या ठिकाणी नेल्यानंतर तेथूनही परतीसाठी मालवाहतूक मिळेल याचा काही नेम नाही. मालवाहतूक मिळेपर्यंत चालकांना त्या ठिकाणीच मुक्काम करावा लागतो. तर बहुतेकदा स्वत:च्या खिशातून पैसे संपवून परत यावे लागते. महामंडळाकडून देण्यात येणारा भत्ता तुटपुंजा आहे. त्यामुळे बहुतेकदा स्वत:च्या खिशातून पैसे संपवून जेवण घ्यावे लागते. जर मालवाहतुकीसाठी गेले नाही तर कारवाई होण्याची भीती असते. त्यामुळे मालवाहतुकीतून महामंडळाला उत्पन्न मिळत असले तरी बहुतेकदा चालकाला फटका बसत असतो.

-----

कोरोनाकाळात एक कोटीची कमाई

-कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. उत्पन्नासाठी महामंडळाने मालवाहतूक सुरू केली. साधारणत: मालवाहतुकीतून महामंडळाला १ कोटीच्या जवळपास उत्पन्न मिळाले आहे.

२) चंद्रपूर जिल्ह्यातील चार आगारातून ३० गाड्या नियमित मालवाहतुकीसाठी धावत आहेत.

३) कोरोनामुळे कडक निर्बंध असल्याने एसटी महामंडळाने १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवली असल्याचे सांगितले आहे.

बॉक्स

मालवाहतूक मिळेपर्यंत तेथेच मुक्काम

डेपोतून एसटीचे चालक माल घेऊन गेल्यास त्यांना परतीच्या मालवाहतुकीची हमी नाही. त्यामुळे जोपर्यंत दुसरी मालवाहतूक मिळत नाही तोपर्यंत तेथेच मुक्काम करावा लागतो. नाहीतर स्वत:च्या खर्चाने परत यावे लागते.

कोरोनामुळे खासगी वाहने तसेच महामंडळाच्या बसफेऱ्याही बंद आहेत. तसेच हॉटेल व रेस्टारंटसुद्धा बंद आहेत. त्यामुळे चालकांना मुक्काम करण्याची वेळ आल्यास मोठी फजिती होते. अनेकदा शिळ्या अन्नावर दिवस काढावे लागतात. तर कुठेकुठे जेवणाची व्यवस्था केलेली असते.

बॉक्स

ॲडव्हान्स मिळतो, पण पगारातून होतो कट

एसटी चालक मालवाहतुकीचे ट्रक घेऊन जातात. त्यासाठी त्यांना भत्ता दिला जातो. मात्र हा भत्ता तुटपुंजा असल्याने मोठी अडचण होते. तसेच हा भत्ता वेतनातून कपात केला जात असल्याची माहिती आहे. बऱ्याचदा पगारासोबत भत्ता दिला जाईल, असे सांगितले जाते; परंतु, कोरोनामुळे आता पगारही वेळेवर होत नसल्याने भत्ताही बऱ्याचदा प्रलंबित राहत असतो. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. याकडे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

------

संघटनेचे पदाधिकारी म्हणतात...

एखादा चालक मालवाहतूक घेऊन गेल्यास त्याला परत मालवाहतूक मिळेलच याची शाश्वती नाही. दुसरी मालवाहतूक होईपर्यंत त्याला तिथेचे थांबावे लागते. किंवा स्वत:च्या खिशातील पैसे संपवून परत यावे लागते. महामंडळाकडून त्याचे परत येण्याचे कुठलेच नियोजन नाही. -दत्ता बावणे, विभागीय सचिव महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

-------

ज्या ठिकाणी माल नेला जातो तेथून परतीची मालवाहतूक मिळेपर्यंत गाडी तेथेच ठेवावी लागते. आम्हाला एसटी महामंडळाकडून तुटपुंजा भत्ता दिला जातो. त्यामुळे हाल होतात. वाहतुकीसाठी गेले नाही तर कारवाई करण्याची भीती असते.

संजय सोनकर

विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना