शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

राणी हिराईची जलनीती राजकर्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी!

By राजेश मडावी | Updated: April 19, 2023 17:41 IST

जयंतीदिन विशेष : ..तर टळले असते जलसंकट; गोंडकालीन जलधोरणे कालबाह्य ठरविण्याचा सपाटा

चंद्रपूर : लोककल्याणाची कळकळ, बुद्धिचातुर्य व उत्कृष्ट प्रशासन कौशल्याने चंद्रपूरच्या गोंड राजवटीत ठसा उमटविणाऱ्या राणी हिराईची जलनीती आजच्या राजकर्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. मात्र, गोंडकालीन जलधोरणांना कालबाह्य ठरविण्याची कृतघ्न परंपरा सुरूच ठेवल्याने चंद्रपुरातील पिण्याची पाण्याची समस्या अद्याप दूर झाली नाही.

चंद्रपूरच्या तत्कालीन गोंड राजसत्तेत २० पेक्षा अधिक राजे होऊन गेले. राणी हिराईचे सर्वोच्च स्थान आहे. प्रजेशी सुसंवाद ठेवून अत्यंत प्रतिकूल परिस्थिती राणीने केलेल्या विकासकामांचे स्वरूप इतिहासकारांच्या आकर्षणाचा विषय आहे. राणी हिराईने चंद्रपुरात केलेले विधायक कार्य विशेषत: पाणी प्रश्नाबाबत १६ व्या शतकातील सुधारणा आजही चार पाऊल पुढे असल्याचे दिसून येते.   राणी हिराईची दूरदृष्टी

१५ व्या शतकात राजा खांडक्या बल्लाळशाहाने १५८ एकरमध्ये रामाळा तलाव तयार करून चंद्रपूरच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. राणी हिराईने पती राजा वीरशहा यांच्या हत्येनंतर दत्तकपुत्र रामशहा यास बसवून राणीने राज्य केले. आपल्या कार्यकाळात केवळ मंदिरांचा जीर्णोद्धार केला नाही तर अनेक सुंदर वास्तू बांधल्या. जलसंकट दूर केले. रामशहाने तलावाचा विकास केला. रामशहाच्या नावावरूनच ‘रामाळा’ असे नाव झाले. शहरातील बावड्यांचे (विहिरी) स्वरूप तर आजही आधुनिक वाटावे असे आहे. पण, प्रशासनाला त्यांचा सांभाळ करता आला नाही.

‘त्या’ १३ हतनींचे काय झाले ?

रामाळा तलावातून चंद्रपूरकरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी गोंड राजांनी शहरात १३ हतनी (आजच्या भाषेत नळ पाइपलाइन) बांधल्या होत्या. राणी हिराईने या हतनींची उत्तम काळजी घेतली होती. भानापेठ वॉर्ड, रघुवीर बालक मंदिर, अंचलेश्वर वॉर्ड, कस्तुरबा शाळा, जेल सुरक्षाभिंत, सोमेश्वर मंदिर, दादमहल महल वार्ड, कस्तुरबा चौक, गोलबाजार परिसरातील हतनी नष्ट झाल्या. या हतनींच्या विस्तारावरून राणीचा जलदृष्टिकोन प्रतीत होतो.

टॅग्स :Socialसामाजिकchandrapur-acचंद्रपूरhistoryइतिहास