शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

राणी हिराईची जलनीती राजकर्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी!

By राजेश मडावी | Updated: April 19, 2023 17:41 IST

जयंतीदिन विशेष : ..तर टळले असते जलसंकट; गोंडकालीन जलधोरणे कालबाह्य ठरविण्याचा सपाटा

चंद्रपूर : लोककल्याणाची कळकळ, बुद्धिचातुर्य व उत्कृष्ट प्रशासन कौशल्याने चंद्रपूरच्या गोंड राजवटीत ठसा उमटविणाऱ्या राणी हिराईची जलनीती आजच्या राजकर्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. मात्र, गोंडकालीन जलधोरणांना कालबाह्य ठरविण्याची कृतघ्न परंपरा सुरूच ठेवल्याने चंद्रपुरातील पिण्याची पाण्याची समस्या अद्याप दूर झाली नाही.

चंद्रपूरच्या तत्कालीन गोंड राजसत्तेत २० पेक्षा अधिक राजे होऊन गेले. राणी हिराईचे सर्वोच्च स्थान आहे. प्रजेशी सुसंवाद ठेवून अत्यंत प्रतिकूल परिस्थिती राणीने केलेल्या विकासकामांचे स्वरूप इतिहासकारांच्या आकर्षणाचा विषय आहे. राणी हिराईने चंद्रपुरात केलेले विधायक कार्य विशेषत: पाणी प्रश्नाबाबत १६ व्या शतकातील सुधारणा आजही चार पाऊल पुढे असल्याचे दिसून येते.   राणी हिराईची दूरदृष्टी

१५ व्या शतकात राजा खांडक्या बल्लाळशाहाने १५८ एकरमध्ये रामाळा तलाव तयार करून चंद्रपूरच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. राणी हिराईने पती राजा वीरशहा यांच्या हत्येनंतर दत्तकपुत्र रामशहा यास बसवून राणीने राज्य केले. आपल्या कार्यकाळात केवळ मंदिरांचा जीर्णोद्धार केला नाही तर अनेक सुंदर वास्तू बांधल्या. जलसंकट दूर केले. रामशहाने तलावाचा विकास केला. रामशहाच्या नावावरूनच ‘रामाळा’ असे नाव झाले. शहरातील बावड्यांचे (विहिरी) स्वरूप तर आजही आधुनिक वाटावे असे आहे. पण, प्रशासनाला त्यांचा सांभाळ करता आला नाही.

‘त्या’ १३ हतनींचे काय झाले ?

रामाळा तलावातून चंद्रपूरकरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी गोंड राजांनी शहरात १३ हतनी (आजच्या भाषेत नळ पाइपलाइन) बांधल्या होत्या. राणी हिराईने या हतनींची उत्तम काळजी घेतली होती. भानापेठ वॉर्ड, रघुवीर बालक मंदिर, अंचलेश्वर वॉर्ड, कस्तुरबा शाळा, जेल सुरक्षाभिंत, सोमेश्वर मंदिर, दादमहल महल वार्ड, कस्तुरबा चौक, गोलबाजार परिसरातील हतनी नष्ट झाल्या. या हतनींच्या विस्तारावरून राणीचा जलदृष्टिकोन प्रतीत होतो.

टॅग्स :Socialसामाजिकchandrapur-acचंद्रपूरhistoryइतिहास