शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

राणी हिराईची जलनीती राजकर्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी!

By राजेश मडावी | Updated: April 19, 2023 17:41 IST

जयंतीदिन विशेष : ..तर टळले असते जलसंकट; गोंडकालीन जलधोरणे कालबाह्य ठरविण्याचा सपाटा

चंद्रपूर : लोककल्याणाची कळकळ, बुद्धिचातुर्य व उत्कृष्ट प्रशासन कौशल्याने चंद्रपूरच्या गोंड राजवटीत ठसा उमटविणाऱ्या राणी हिराईची जलनीती आजच्या राजकर्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. मात्र, गोंडकालीन जलधोरणांना कालबाह्य ठरविण्याची कृतघ्न परंपरा सुरूच ठेवल्याने चंद्रपुरातील पिण्याची पाण्याची समस्या अद्याप दूर झाली नाही.

चंद्रपूरच्या तत्कालीन गोंड राजसत्तेत २० पेक्षा अधिक राजे होऊन गेले. राणी हिराईचे सर्वोच्च स्थान आहे. प्रजेशी सुसंवाद ठेवून अत्यंत प्रतिकूल परिस्थिती राणीने केलेल्या विकासकामांचे स्वरूप इतिहासकारांच्या आकर्षणाचा विषय आहे. राणी हिराईने चंद्रपुरात केलेले विधायक कार्य विशेषत: पाणी प्रश्नाबाबत १६ व्या शतकातील सुधारणा आजही चार पाऊल पुढे असल्याचे दिसून येते.   राणी हिराईची दूरदृष्टी

१५ व्या शतकात राजा खांडक्या बल्लाळशाहाने १५८ एकरमध्ये रामाळा तलाव तयार करून चंद्रपूरच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. राणी हिराईने पती राजा वीरशहा यांच्या हत्येनंतर दत्तकपुत्र रामशहा यास बसवून राणीने राज्य केले. आपल्या कार्यकाळात केवळ मंदिरांचा जीर्णोद्धार केला नाही तर अनेक सुंदर वास्तू बांधल्या. जलसंकट दूर केले. रामशहाने तलावाचा विकास केला. रामशहाच्या नावावरूनच ‘रामाळा’ असे नाव झाले. शहरातील बावड्यांचे (विहिरी) स्वरूप तर आजही आधुनिक वाटावे असे आहे. पण, प्रशासनाला त्यांचा सांभाळ करता आला नाही.

‘त्या’ १३ हतनींचे काय झाले ?

रामाळा तलावातून चंद्रपूरकरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी गोंड राजांनी शहरात १३ हतनी (आजच्या भाषेत नळ पाइपलाइन) बांधल्या होत्या. राणी हिराईने या हतनींची उत्तम काळजी घेतली होती. भानापेठ वॉर्ड, रघुवीर बालक मंदिर, अंचलेश्वर वॉर्ड, कस्तुरबा शाळा, जेल सुरक्षाभिंत, सोमेश्वर मंदिर, दादमहल महल वार्ड, कस्तुरबा चौक, गोलबाजार परिसरातील हतनी नष्ट झाल्या. या हतनींच्या विस्तारावरून राणीचा जलदृष्टिकोन प्रतीत होतो.

टॅग्स :Socialसामाजिकchandrapur-acचंद्रपूरhistoryइतिहास