शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

संततधार पावसाने शेतकरी वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:34 IST

मागील दोन आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. अधेमधे एक दोन तासांचा अपवाद वगळला तर पावसाची रिपरिप अविरत सुरूच आहे. त्यामुळे आता शेतकरी वैतागला आहे. शेताच्या बांद्यात पाणी साचून हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आली आहेत.

ठळक मुद्देआता हवी उसंत : हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील दोन आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. अधेमधे एक दोन तासांचा अपवाद वगळला तर पावसाची रिपरिप अविरत सुरूच आहे. त्यामुळे आता शेतकरी वैतागला आहे. शेताच्या बांद्यात पाणी साचून हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आली आहेत. सततच्या पावसामुळे शेतीची कामेही बंद आहे. आता पावसाने उसंत घ्यावी, अशी आर्त मागणी शेतकरी करू लागले आहेत.यावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिला पाऊस पडला. त्यानंतर चार-पाच दिवस ढगाळ वातावरण कायम राहिले. मात्र पुढे पावसाने दडी मारली. तब्बल २२ दिवस पाऊस आलाच नाही. २९ जुलैपासून जिल्ह्यात पुन्हा मान्सून सक्रीय झाला. तेव्हापासून आज ८ आॅगस्टपर्यंत पावसाची संततधार सुरुच आहे. अधेमधे एक-दोन तासाची विश्रांती सोडली तर पावसाची रिपरिप कायम आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई, अंधारी, उमा, शिरणा, खोडदा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील अनेक मार्गावरून वाहणाऱ्या नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे काही मार्ग बंद झाले आहेत.शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस व धानाची पेरणी केली आहे. धानाचे पऱ्हे जोमात असतानाच संततधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे हजारो हेक्टरवरील धानाचे पऱ्हे पाण्याखाली आहेत. पावसाने उसंत घेतली नाही तर हे पऱ्हे उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांना आॅगस्ट महिन्यात दुबार पेरणी करावी लागणार आहे.आज गुरुवारी जिल्ह्यात एकूण २३५ मिमी पावसाची नोंद झाली. सरासरी १५ मिमी पाऊस झाला. आज सावली तालुक्यात सर्वाधिक ३८.२ मिमी पाऊस पडला. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ६७७.१८ मिमी पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत ही टक्केवारी ५४.८३ आहे. आता पुढील पाच दिवस पुन्हा पावसाचे असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.१५ जनावरे वाहून गेलीआक्सापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून गोंडपिपरी तालुक्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले, तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. अशातच तालुक्यातील सोमनपल्ली-कोंढाणा लगतच्या पुलावरून पाणी वाहत असताना सायंकाळच्या वेळी घरी परतणारी १५ जनावरे वाहून गेली. ही घटना बुधवारी घडली. यात मृत पावलेली तीन जनावरे बाहेर काढण्यात आलीत तर तीन ते चार जनावरे पुलाखालीच अडकल्याची माहिती आहे. ४-५ जनावरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली असल्याची माहिती गावकºयांनी दिली. जनावरे पुरात वाहून जाण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी तालुक्यातील धाबा पुलावरून आठ जनावरे वाहून गेल्याची घटना घडली होती. मागील कित्येक वर्षांपासून हा पूल नव्याने बांधावा, अशी गावकरी मागणी करीत आहे. मात्र सातत्याने निराशाच पदरी पडत आहे. सोमनपल्ली, कोंढाणा, चेकसोमनपली, हेटी सोमनपल्ली येथील शाळकरी मुले, शेतकरी व नागरिक नेहमी याच नाल्यातून वाट काढत जातात. पूर असला की मग धाबा मार्गे ३-४ किमी अंतर पार करून जावे लागते. आपादग्रस्त पशुपालकांना शासनाने आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी आहे. पाण्यात वाहून गेलेली जनावरे ही दिवाकर बोरकुटे, मंजुलाबाई नागपुरे, सुधाकर ठाकूर, राजू भोयर, मिलींद कुबडे, मोरेश्वर ठोंबरे यांच्या मालकीची आहेत.इरई धरणाचे पाच दरवाजे उघडलेदुर्गापूर: संततधार पावसाने इरई धरण तुडूंब भरले असून धरणाचे पाच दरवाजे ०.५ मीटरने गुरुवारी दुपारी उघडण्यात आले आहेत. यापूर्वी १ आॅगस्टला धरणाचे दरवाजे ०.२५ मीटरने उघडले होते. जुलै महिन्याच्या अखेरच्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने अखेर इरई धरण तुडूंब भरले आहे. चारगाव धरणाचा ओव्हरफ्लो सुरु असल्याने त्याचेही पाणी इरई धरणात येत आहे. त्यामुळे इरई धरणातील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आधी १ आॅगस्टला, त्यानंतर ५ आॅगस्टला सातही दरवाजे उघडण्यात आले होते. आज गुरुवारी पुन्हा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहे. इरई नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुढील पाच दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी होऊ शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.खडसंगी - मुरपार मार्ग बंदचिमूर : परिसरात सुरू झालेल्या संततधार पावसाने खडसंगी - मुरपार - मिनझरी मार्गावरील खोडदा नदीचे पात्र लहान असल्याने पूर आला आहे. परिणामी मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. मागील पंधरवड्यापासून आतापर्यंत या नदीच्या पुलावरून पाणी वाहण्याची ही सहावी वेळ आहे. नदीच्या पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने बुधवार रात्रीपासून मुरपार व मिनझरी गावाला जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग गुरुवारी वृत्त लिहिपर्यंत बंद होता. परिणामी मार्गावरून ये- जा करणाºया नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागून होत्या. वेकोलिचे अनेक कामगार खाणीपर्यंत पोहचू शकले नाही. खोडदा नदीच्या पुलाची उंची कमी असल्याने या पुलाला पावसाळ्यात अनेकदा पूर येत असतो.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी