शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

...म्हणून केंद्र सरकारने केली कृषी कायदे रद्दची घोषणा : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 17:43 IST

ऊन, वारा, पावसात संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना आपला सलाम आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायदे रद्द केल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली.

ठळक मुद्देउन्ह, वारा, पावसात शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागला हे विसरता येणार नाही

चंद्रपूर : उत्तर प्रदेश व पंजाबच्या निवडणुकांना सामोरे जाताना तेथील शेतकरी व जनतेला उत्तर देण्यासाठी काहीही नव्हते. ही अडचण लक्षात घेऊनच कोणालाही विचारात न घेता लागू केलेले तीनही कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केंद्र सरकारला करावी लागली. ऊन, वारा, पावसात संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना आपला सलाम आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायदे रद्द केल्यानंतर आपली प्रतिक्रिया येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

कृषी क्षेत्रात गुंतवणुकीला चालना मिळावी, कृषी मालाला योग्य भाव मिळावा, जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या अनुषंगाने कृषी कायद्यात सुधारणेचा विचार २०१४ पूर्वीच्या सरकारचा होता. कृषी हा राज्याशी संबंधित विषय आहे. तेव्हा राज्य सरकारे, कृषितज्ज्ञ, कृषी विद्यापीठे, कृषी संघटना आणि शेतकऱ्यांशी चर्चा करून या सुधारणा करण्याचे काम सुरू होते. नंतर केंद्रातील सरकार बदलले. मात्र या सरकारने काही तासांतच तीन कृषी कायदे लागू केले. हे कायदे करताना सखोल चर्चा झाली नाही. परिणामी कृषी क्षेत्रात नवीन समस्या निर्माण होत असल्याचे लक्षात येताच देशाच्या विविध भागात या कायद्याला विरोध सुरू झाला, या शब्दात शरद पवार यांनी कायद्याचे अपयश सांगितले.

कायदे रद्द होण्यासाठी शेतकऱ्यांना दिल्लीला जाणारा मार्ग रोखून धरावा लागला. हा संघर्ष शांततेच्या मार्गाने उन्ह, वारा, पावसाची तमा न बाळगता सुरूच ठेवला. या शेतकऱ्यांशी चर्चा करून योग्य मार्ग काढण्याची गरज होती. मात्र केंद्र सरकारने आश्चर्यकारक भूमिका घेतली. या आंदोलनात राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबचे शेतकरी उतरले. पुढे होणाऱ्या उत्तर प्रदेश, पंजाब राज्याच्या निवडणुकांना सामाेरे कसे जायचे हा प्रश्न केंद्र सरकारला पडला. म्हणून हे कायदे मागे घ्यावे लागले, अशी टीकाही पवार यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस नेते खासदार प्रफुल्ल पटेल, ना. प्राजक्त तनपुरे, ओबीसी नेते डाॅ. अशोक जिवतोडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, सुबोध मोहिते उपस्थित होते.

सन्मान दूरच, सौजन्याची वागणूकही नाही

महाराष्ट्रासारखे मोठे राज्य भाजपच्या हातात नाही. याचा परिणाम राज्यातील नेतृत्वावर झाला आहे. सुरुवातीला महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भविष्यवाणी करीत होते. अशातच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने यशस्वीरीत्या दोन वर्षे पूर्ण केली. आता सत्तेचा दुरुपयोग करून चौकशा, ईडीचा वापर केला जात आहे. खोट्यानाट्या केसेस लावल्या जात आहे. तिन्ही पक्ष एकत्र असल्याने याचा परिणाम होणार नाही. पं. बंगालमध्ये सर्व प्रयत्न केले तरीही सत्ता आली नाही. केरळ व महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे. नरेंद्र मोदींकडून विरोधकांचा सन्मान दूरच, पण विरोधकांना साधी सौजन्याची वागणूकही मिळत नसल्याचा गंभीर आरोप या वेळी शरद पवार यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपagitationआंदोलन