शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

आदिवासींशिवाय जंगलांचे संरक्षण अशक्य : भूपेंदर यादव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2022 11:28 AM

वन अकादमीत जंगल व वाघांच्या संरक्षणावर राष्ट्रीय मंथन

चंद्रपूर : जल, जंगल, जमीन हे नैसर्गिक घटक आपल्याला मुबलक मिळाले. निसर्गात वन्यजीवांचेही स्थान आहे. त्यामुळे केंद्र सरकार पर्यावरण पूरक जीवन पद्धतीचा अवलंब करून पायाभूत विकासासाठी काम करीत. मात्र, आदिवासींशिवाय जंगलांचे संरक्षण अशक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्री भूपेंदर यादव यांनी केले. राष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त चंद्रपुरातील वन अकादमीत ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय पर्यावरण व वन राज्यमंत्री आश्विनीकुमार चौबे, आमदार किशोर जोरगेवार, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे सचिव व अतिरिक्त महानिदेशक एस.पी. यादव, अतिरिक्त महासंचालक (वन्यजीव) विभाष रंजन, महाराष्ट्राचे वनबलप्रमुख डॉ. वाय.एल.पी. राव, मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, अमित मलिक उपस्थित होते. ना. यादव म्हणाले, केंद्र सरकार व्याघ्र व आदिवासींचे संरक्षण, जैवविविधता, जलवायू संरक्षणात भरीव काम करीत आहे. जगातील ७५ टक्के वाघ भारतात सुरक्षित आहेत. देशात ५२ व्याघ्र संरक्षण प्रकल्प आहेत. यापैकी १७ प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला. वन विभागाने वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी फील्डवर जाऊन काम करावे, असेही त्यांनी सूचना केली.

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मुख्य वनसंरक्षक प्रवीण लोणकर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, बफर झोनचे उपसंचालक जी. गुरुप्रसाद, ब्रह्मपुरी वन विभागाचे उपवनसंरक्षक जितेश मल्होत्रा, वनाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिकenvironmentपर्यावरण