जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी, धानपट्टा कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:01 IST2020-07-23T05:00:00+5:302020-07-23T05:01:01+5:30

मागील चार ते पाच दिवसांपासून चंद्रपुरात दररोज पाऊस येत आहे. सकाळच्या सुमारास ऊन्ह असते. मात्र दुपारी अचानक वातावरण बदलून पावसाला सुरूवात होते. बुधवारीदेखील असेच झाले. बुधवारी दुपारी १.३० वाजता पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर रात्रीपर्यंत अधेमधे पावसाची रिपरिप सुरूच होती. चंद्रपूरसह जिल्ह्यातील घुग्घुस, भद्रावती, राजुरा, कोरपना, मूल, सिंदेवाही या तालुक्यांमधेही पावसाने हजेरी लावली.

Presence of rain in some parts of the district, paddy belt is dry | जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी, धानपट्टा कोरडाच

जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी, धानपट्टा कोरडाच

ठळक मुद्देसरासरी ४४४.२ मिमी पाऊस : दमदार पावसाअभावी धानपट्ट्यातील रोवण्या खोळंबल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात दररोज पाऊस हजेरी लावत आहे. बुधवारी चंद्रपूरसह अनेक भागात पावसाने हजेरी लावली. मात्र जिथे पावसाची अधिक गरज आहे, अशा चिमूर, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड या धान उत्पादक तालुक्यात अद्यापही पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे तेथील शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.
मागील चार ते पाच दिवसांपासून चंद्रपुरात दररोज पाऊस येत आहे. सकाळच्या सुमारास ऊन्ह असते. मात्र दुपारी अचानक वातावरण बदलून पावसाला सुरूवात होते. बुधवारीदेखील असेच झाले. बुधवारी दुपारी १.३० वाजता पावसाला सुरुवात झाली.
त्यानंतर रात्रीपर्यंत अधेमधे पावसाची रिपरिप सुरूच होती. चंद्रपूरसह जिल्ह्यातील घुग्घुस, भद्रावती, राजुरा, कोरपना, मूल, सिंदेवाही या तालुक्यांमधेही पावसाने हजेरी लावली.

मूलमध्ये मुसळधार
मूल : मागील आठवडयात पावसाने ब्रेक लावल्याने अनेक शेतकऱ्यांची रोवणी खोळबली होती. परंतु मागील दोन दिवसांपासून तुरळक पाऊस पडत असल्याने काही शेतकऱ्यांनी समाधान मानत रोवणीच्या कामाला सुरूवात केली. बुधवारी दुपारी अचानक मूलमध्ये मुसळधार पाऊस पडला. अनेक मोकळ्या भूखंडात व वस्त्यांमधील रस्त्यावर पाणी साचले. अचानक असा पाऊस आल्यामुळे व्यावसायिकांची तारांबळ उडाली. यावर्षी पावसाला सुरूवात झाली खरी, परंतु पाहिजे तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे पºहे टाकण्यापासून तर रोवणीच्या कामापर्यंत शेतकºयांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे तालुक्यात केवळ ४३.९ टक्के रोवणी होऊ शकली.

नागभीडमध्ये वाकुल्या
नागभीड : परिसरात ढगाळ वातावरण राहत असले तरी जोरदार पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांत हलका पाऊस पडला. या पावसावर व मोटारपंपाच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी रोवणी उरकली. पण आता पाऊसच पडत नसल्याने ही रोवणी करपायला सुरूवात झाली आहे. सध्या पडत असलेला पाऊस केवळ पऱ्हे जगविण्याच्या कामी येत आहे. तालुक्यात जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रात धान पीक घेतले जाते. असले तरी आतापर्यंत तालुक्यात ३५ ते ४० टक्के रोवणी उरकल्याचा अंदाज आहे.

Web Title: Presence of rain in some parts of the district, paddy belt is dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस