शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील धानपट्ट्यात ‘पोटोंडी’ पद्धत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:20 IST

नागभीड : धानपट्ट्यात हंगामाच्या संदर्भात अनेक पद्धती प्रचलित होत्या. ‘पोटोंडी’ ही त्यापैकीच एक. बियाणांमध्ये उगवण क्षमता आहे की नाही ...

नागभीड : धानपट्ट्यात हंगामाच्या संदर्भात अनेक पद्धती प्रचलित होत्या. ‘पोटोंडी’ ही त्यापैकीच एक. बियाणांमध्ये उगवण क्षमता आहे की नाही हे तपासून बघण्याची ‘पोटोंडी’ ही पद्धत दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत चांगलीच प्रचलित होती. मात्र, सध्या ही पद्धत बंद झाल्यासारखीच स्थिती आहे.

सद्य:स्थितीत धानपट्ट्यात आवते व पऱ्हे भरण्याचा हंगाम जोरात सुरू आहे; पण सद्य:स्थितीत शेतकरी पोटोंडी पद्धतीचा अवलंब करीत असल्याचे दिसून येत नाही. कृषी केंद्रांवरून बियाणे घेतले की, सरळ शेतावर नेत असून लगेच आवते आणि पऱ्ह्याची भरणी करीत आहेत.

पोटोंडी टाकण्याची एक पद्धत होती. मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर शेतकरी आवते आणि पऱ्ह्याच्या जागेची अगोदर मशागत करायचे. नंतर पावसाला सुरुवात झाली की, घरीच साठवून ठेवलेल्या बियाणांमध्ये उगवण क्षमता आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी पोटोंडी या पद्धतीचा उपयोग व्हायचा. यासाठी साठवून ठेवलेल्या बियाणांमधून ओंजळभर धान्य काढून ते कापसाच्या बोळ्यामध्ये टाकले जायचे. नंतर हा बोळा पानांपासून बनविलेल्या द्रोणात ठेवला जायचा. आवश्यकतेनुसार या बोळ्यात पाणी देण्यात येत होते. चार-पाच दिवसांत या धान्यांना अंकुर आले नाही तर या बियाण्यांमध्ये उगवण क्षमता नाही हे शेतकऱ्यांच्या लक्षात यायचे आणि लगेच हे शेतकरी दुसऱ्या बियाण्यांची तजवीज करायचे. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर टळायचे. त्याचबरोबर नंतर उगवण क्षमता असलेल्या बियाण्याचा वापर करून वेळेवर हंगामही करता यायचा.

पण आता काळ बदलला आहे आणि काळाबरोबर काळाच्या व्याख्याही बललल्या आहेत. शेतीत मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरणाचा शिरकाव झाला आहे. घरीच तयार केलेले बियाणे साठवून ठेवण्याची पद्धत जवळपास बंद झाली आहे. त्याऐवजी कृषी केंद्रांमधून तयार बियाणे घेऊन त्यांचेच आवते व पऱ्हे टाकण्याची पद्धत रूढ झाली आहे. परिणामी अनेकदा शेतकऱ्यांची फसगत होत असते. कृषी केंद्रांमधून खरेदी केलेले बियाणे काहीवेळा उगवलेच नाही, अशा तक्रारी अनेकदा कानावर येत असल्या तरी शेतकऱ्यांनी पोटोंडीकडे पाठ फिरवली हेही तेवढेच खरे आहे.

कोट

पूर्वी आम्ही पोटोंडी या पद्धतीचा उपयोग करीत होतो. त्यामुळे बियाण्यात उगवण क्षमता आहे की नाही हे लक्षात यायचे; पण आता या पद्धतीचा शेतकरी वापर करताना दिसत नाही.

- बाळाजी सातपैसे, शेतकरी नवखळा.