कंपनीचा प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:33 IST2021-09-17T04:33:40+5:302021-09-17T04:33:40+5:30
प्रा. आशिष देरकर यांची पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार बिबी : गडचांदूर येथील जुनी माणिकगड सिमेंट कंपनी व ...

कंपनीचा प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
प्रा. आशिष देरकर यांची पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार
बिबी : गडचांदूर येथील जुनी माणिकगड सिमेंट कंपनी व सध्याच्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमार्फत गडचांदूर परिसरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण सुरू असून कंपनी प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे.
या कंपनीच्या वायू प्रदूषणामुळे गडचांदुरातील व परिसरातील नागरिकांच्या सरासरी आयुर्मानात घट झालेली आहे. वायू प्रदूषणामुळे येथील नागरिकांना विविध रोगांनी ग्रासलेले आहे. या गंभीर बाबीची कोणीही दखल घेताना दिसत नाही. कंपनीमधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर सोडण्यात येत असताना कंपनी व्यवस्थापन व चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळ या गंभीर बाबीकडे मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडूनही काही कारवाई होताना दिसत नाही. याबाबतची तक्रार प्रा. आशिष देरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.