शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने वाढविली शेतकºयांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 23:27 IST

पावसाने यंदाही बळीराजाची परीक्षाच घेण्याचे ठरविले आहे की काय, असे दिसते. पावसाळ्याचे दोन महिने लोटले.

ठळक मुद्देपुन्हा मारली दडी : जुलै महिनाही निराशाजनक; शेतकºयांनी करावे काय ?

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाने यंदाही बळीराजाची परीक्षाच घेण्याचे ठरविले आहे की काय, असे दिसते. पावसाळ्याचे दोन महिने लोटले. मात्र जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. सर्वांच्या अंदाजांना ठेंगा दाखवित पाऊस दडी मारून बसला आहे. दुसरीकडे पावसाच्या या दडीमुळे शेतकºयांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. जवळजवळ सर्वच शेतकºयांना आता पावसाची गरज आहे. मात्र पाऊस येतच नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.बहुप्रतीक्षेनंतर मागील आठवड्यापूर्वी पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. हा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र पाऊस बरसला. आता काही दिवस पाऊस सक्रिय राहील, अशी आशा शेतकºयांना होती. हवामान खात्याचाही तसाच अंदाज होता. मात्र पुन्हा सर्व अंदाज चुकवत पावसाने दडी मारली. पाऊस अचानक गायब झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. पावसाळ्यात जुलै महिना सर्वाधिक पावसाचा महिना मानला जातो. या महिन्यात संपूर्ण जलसाठ्या बºयापैकी पाणी जमा होते. मात्र यावेळी संपूर्ण जुलै महिना कोरडा जात आहे. आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. परंतु या देशातील शेतीच आज बिनभरवशाची झाली आहे. पावसाअभावी शेतीला अवकळा आली आहे. सरकार शेतकºयांच्या पाठीशी उभे राहायला तयार नाही. निसर्ग शेतकºयांना साथ देत नाही. जगाच्या पोशिंद्यावर आज आलेले संकट फार मोठे आहे. शेतकºयांनी जगावे की मरावे एवढी शेतकºयाची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकºयांवर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षी चांगला पाऊस पडेल या एकाच भरवशावर शेतकºयांनी उसनवारी व कर्ज काढून कशीबशी शेती केली. हवामान खात्यानेही यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला होता. थेट हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरवित यावेळी पावसाने दगा दिला. पावसाअभावी शेतकºयांनी पेरणी केलेले महागडे बियाणे मातीमोल झाले. शेतकºयांनी दुबार-तिबार पेरणी केली. परंतु अपुºया पावसाने पेरणी केलेले बियाणे मातीतच सडून गेले. त्याचा चांगलाच फटका शेतकºयांना बसला आहे.जुलै महिन्यात विदर्भात पुन्हा पाऊस सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या. अंदाजाप्रमाणे पावसाने दमदार पुनरागमन केले. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पाऊस बरसला. जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच शेतकºयांनी आपल्या पेरण्या आटोपल्या.मात्र त्यानंतर पावसाने दगा दिला. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आजही निसर्गाच्या पाण्यावर कोरडवाहू शेती करतात. रोवणीनंतर पिकांना पुन्हा पावसाची गरज आहे. मात्र पाऊस कुठे लपून बसला कळायला मार्ग नाही. जुन, नंतर जुलै महिनादेखील शेतकºयांच्या दृष्टीने निराशाजनकच राहिला. पावसाच्या महिन्यातच पाऊस बरसला नाही. आता केवळ पावसाचा आॅगस्ट महिनाच शिल्लक आहे. या महिन्यातही पावसाने आपली दडी कायम ठेवली तर शेतकºयांची अवस्था तर बिकट होईलच; सोबतच संपूर्ण जिल्ह्यातच परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.पाणीटंचाईचा धोकायंदा जून महिन्यातील पावसाचे आगमन दमदार झाले नाही. पावसाची एन्ट्रीच शेतकºयांसाठी सुखावह ठरू शकली नाही. जुलै महिन्यात तरी पाऊस सर्व उणिवा भरून काढेल, अशी आशा होती. मात्र चार दिवसांचा अपवाद वगळता जुलै महिनाही कोरडाच गेला. जिल्ह्यातील अकराही सिंचन प्रकल्पात अजूनही पाण्याची बोंब आहे. नदी, नाले, बोड्या, तलाव यासारखे ग्रामीण जलस्रोत निम्मेही भरू शकले नाही. आता आॅगस्ट महिन्यात तरी दमदार पाऊस पडला नाही तर पुढे उन्हाळ्यासारखा पाण्याचा ज्वलंत प्रश्न हिवाळ्यात उद्भवू शकतो, हे निश्चित.