शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

पावसाने वाढविली शेतकºयांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 23:27 IST

पावसाने यंदाही बळीराजाची परीक्षाच घेण्याचे ठरविले आहे की काय, असे दिसते. पावसाळ्याचे दोन महिने लोटले.

ठळक मुद्देपुन्हा मारली दडी : जुलै महिनाही निराशाजनक; शेतकºयांनी करावे काय ?

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाने यंदाही बळीराजाची परीक्षाच घेण्याचे ठरविले आहे की काय, असे दिसते. पावसाळ्याचे दोन महिने लोटले. मात्र जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. सर्वांच्या अंदाजांना ठेंगा दाखवित पाऊस दडी मारून बसला आहे. दुसरीकडे पावसाच्या या दडीमुळे शेतकºयांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. जवळजवळ सर्वच शेतकºयांना आता पावसाची गरज आहे. मात्र पाऊस येतच नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.बहुप्रतीक्षेनंतर मागील आठवड्यापूर्वी पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. हा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र पाऊस बरसला. आता काही दिवस पाऊस सक्रिय राहील, अशी आशा शेतकºयांना होती. हवामान खात्याचाही तसाच अंदाज होता. मात्र पुन्हा सर्व अंदाज चुकवत पावसाने दडी मारली. पाऊस अचानक गायब झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. पावसाळ्यात जुलै महिना सर्वाधिक पावसाचा महिना मानला जातो. या महिन्यात संपूर्ण जलसाठ्या बºयापैकी पाणी जमा होते. मात्र यावेळी संपूर्ण जुलै महिना कोरडा जात आहे. आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. परंतु या देशातील शेतीच आज बिनभरवशाची झाली आहे. पावसाअभावी शेतीला अवकळा आली आहे. सरकार शेतकºयांच्या पाठीशी उभे राहायला तयार नाही. निसर्ग शेतकºयांना साथ देत नाही. जगाच्या पोशिंद्यावर आज आलेले संकट फार मोठे आहे. शेतकºयांनी जगावे की मरावे एवढी शेतकºयाची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकºयांवर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षी चांगला पाऊस पडेल या एकाच भरवशावर शेतकºयांनी उसनवारी व कर्ज काढून कशीबशी शेती केली. हवामान खात्यानेही यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला होता. थेट हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरवित यावेळी पावसाने दगा दिला. पावसाअभावी शेतकºयांनी पेरणी केलेले महागडे बियाणे मातीमोल झाले. शेतकºयांनी दुबार-तिबार पेरणी केली. परंतु अपुºया पावसाने पेरणी केलेले बियाणे मातीतच सडून गेले. त्याचा चांगलाच फटका शेतकºयांना बसला आहे.जुलै महिन्यात विदर्भात पुन्हा पाऊस सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या. अंदाजाप्रमाणे पावसाने दमदार पुनरागमन केले. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पाऊस बरसला. जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच शेतकºयांनी आपल्या पेरण्या आटोपल्या.मात्र त्यानंतर पावसाने दगा दिला. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आजही निसर्गाच्या पाण्यावर कोरडवाहू शेती करतात. रोवणीनंतर पिकांना पुन्हा पावसाची गरज आहे. मात्र पाऊस कुठे लपून बसला कळायला मार्ग नाही. जुन, नंतर जुलै महिनादेखील शेतकºयांच्या दृष्टीने निराशाजनकच राहिला. पावसाच्या महिन्यातच पाऊस बरसला नाही. आता केवळ पावसाचा आॅगस्ट महिनाच शिल्लक आहे. या महिन्यातही पावसाने आपली दडी कायम ठेवली तर शेतकºयांची अवस्था तर बिकट होईलच; सोबतच संपूर्ण जिल्ह्यातच परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.पाणीटंचाईचा धोकायंदा जून महिन्यातील पावसाचे आगमन दमदार झाले नाही. पावसाची एन्ट्रीच शेतकºयांसाठी सुखावह ठरू शकली नाही. जुलै महिन्यात तरी पाऊस सर्व उणिवा भरून काढेल, अशी आशा होती. मात्र चार दिवसांचा अपवाद वगळता जुलै महिनाही कोरडाच गेला. जिल्ह्यातील अकराही सिंचन प्रकल्पात अजूनही पाण्याची बोंब आहे. नदी, नाले, बोड्या, तलाव यासारखे ग्रामीण जलस्रोत निम्मेही भरू शकले नाही. आता आॅगस्ट महिन्यात तरी दमदार पाऊस पडला नाही तर पुढे उन्हाळ्यासारखा पाण्याचा ज्वलंत प्रश्न हिवाळ्यात उद्भवू शकतो, हे निश्चित.