शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

३३ हजार झाडांपैकी पाच वर्षांत मोजकीच झाडे जगली !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 17:27 IST

वनकर्मचारी उदासीन : शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. हे हेरून वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेत मूल शहरानजीक कक्ष क्रमांक ७५२ मध्ये सन २०१९ ला ३० हेक्टर जागेत ३३ हजार झाडे लावण्यात आली. पाच वर्षांत झाडांची वाढ होणे गरजेचे असताना त्याकडे वन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने लावलेली झाडे फारशी वाढू शकली नाही. त्यामुळे मोजकीच झाडे जगली आहेत.

त्यात गवत व अनावश्यक झाडे भरमार उगवली असल्याने लागवडीचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम फेल ठरल्याने शासनाचा लाखो रुपयांचा चुराडा झाल्याचे दिसून येते. वृक्षांचे संवर्धन झाले तर वन्यप्राण्यांचा अधिवास सुरक्षित होते. यासाठी वन विभाग वृक्ष संवर्धन करण्यासाठी दरवर्षी लाखो वृक्षांचे वृक्षारोपण केले जाते. ज्या जोशात वृक्षारोपण केले जाते, त्याच तत्परतेने कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देऊन लावलेल्या सगळ्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी बाध्य करणे आवश्यक आहे. मात्र, असला प्रकार होत नसल्याने वृक्ष संवर्धन होत नसल्याची ओरड सुरू आहे.

तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर यांनी पुढाकार घेत मूल शहरानजीक असलेल्या कक्ष क्रमांक ७५२ मध्ये सन २०१९ ला ३० हेक्टर जागेत ३३ हजार झाडांचे वृक्षारोपण केले. यावेळी प्रत्येक वर्षी वृक्ष संवर्धनावर वेळोवळी लाखो रूपये खर्च करण्यात आले. मात्र, वृक्ष संवर्धन होऊ शकले नाही. वृक्ष देखभाल करण्याचा कालावधी पाच वर्षांचा झाला असताना शेवटच्या वर्षात वृक्ष कमी व गवत जास्त अशी स्थिती दिसत आहे. ३३ हजार झाडांपैकी बोटावर मोजण्याइतकी झाडे शिल्लक असल्याचे दिसून येते. 

झाडांच्या सभोवताल अनावश्यक गवत वाढले

जिवंत झाडाच्या सभोवताल कचरा वाढलेला आहे. मात्र, वन कर्मचारी झाडासमोरील कचरा काढण्याचे साधे सौजन्य दाखवीत नसल्याने वृक्ष लागवडीपेक्षा त्यावरील खर्च दाखवून त्यातील मलिदा खाण्यातच धन्यता मानताना दिसत आहेत. त्यामुळे वृक्ष लागवडीचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम फेल ठरत असल्याचे यावरून दिसून येते.

वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी कर्मचारी तत्पर असून सन २०१९ ला सर्व्हे नं. ७५२ मध्ये ३० हेक्टर जागेत ३३ हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. आजच्या घडीला २० हजारांपर्यंत झाडे सुस्थितीत आहेत. वन कर्मचारी टीम वर्कच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाकडे विशेष लक्ष देत आहेत.- एम.जे. मस्के, क्षेत्र सहायक मूल

 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाchandrapur-acचंद्रपूर