शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बल्लारपुरात ३२ वॉर्डात फक्त तीनच टँकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 17:32 IST

भर उन्हाळ्यात नळजोडणी : १ मेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : ऐन उन्हाळ्यात जीवन प्राधिकरणच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला पाईपलाईन जोडण्याचे काम सुरू असल्याने शहरातील ३२ वॉर्डातील पुरवठा ठप्प झाला. पिण्याचे पाणीच मिळत नसल्याने नागरिकांची भटकंती सुरू झाली. नगरपरिषदेकडून केवळ तीन टँकरने काही वॉर्डात पाणीपुरवठा केला आहे. उर्वरित वॉर्डातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शहरात उन्हाचा पारा भडकला. वर्धा नदीच्या पाण्याची पातळी खालावली. वर्धा नदीवरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या विहिरीला पाणी पोहचत नाही. त्यामुळे प्राधिकरणाने शनिवारपासून नवीन योजनेला पाईपलाईन जोडणे सुरू केले आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठा ठप झाला आहे.१ मेपर्यंत बंद राहण्याची सूचना जीवन प्राधिकरणाने नळग्राहकांना दिली. नवीन पाईप जोडण्याचे काम अत्यंत वेगाने करीत असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता सतीश गोर्लावार यांनी दिली. शहरातील आपत्कालीन पाणी टंचाई निर्माण झालेली पाहून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी तीन पाणी टँकरची व्यवस्था केली. पण, टँकरद्वारे शहरातील ३२ वॉर्डात पाणीपुरवठा अशक्य झाले आहे.

बल्लारपूर शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची अडचण होऊ नये म्हणून सध्या तीन टँकरने पाणी पुरवठा केल्या जात आहे. नळ योजनेचे काम लवकरच पूर्ण होईल. नागरिकांना पाण्याची सोय व्हावी या दृष्टीने नगर परिषद प्रशासनाकडून पूर्ण प्रयत्न केले जात आहेत.- विशाल वाघ, मुख्याधिकारी नगरपरिषद, बल्लारपूर

बल्लारपुरातील जनता शुद्ध पाण्यासाठी महाराष्ट्र जीवनप्राधिकरण भरवशावर आहे. पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे पाण्याची कॅन घेण्यासाठी दुकानात गर्दी होत आहे. नागरिकांची गरज लक्षात घेऊन नगरपरिषदेने पाणीपुरवठ्यासाठी टँकरची संख्या वाढवावी.- सागर राऊत, माजी नगरसेवक, बल्लारपूर

नागभीडलाही पाणीटंचाई झळा 

घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्क: नागभीड शहरालाही पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने तीन टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. मात्र, अनेकांना पाणी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

नागभीड शहराला तपाळ योजनेद्वारा पुरवठा होतो. ही योजना १९९९ मध्ये कार्यान्वित झाली. पण या योजनेत दोषांमुळे शहराला पाण्याची गरज पूर्ण करू शकत नाही. 

वर्षातून अनेकदा ही योजना विविध कारणांमुळे बंद पडते. आता तर या योजनेतून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून नगर परिषद व नगर परिषदेत समाविष्ट इतर गावांसाठी ३८ कोटी रुपये किमतीची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. योजनेचे काम पूर्ण झाले. पण, घोडे कुठे अडले हे कळेनासे झाले आहे.

सध्या शहरात काही भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू आहे. तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरचीसंख्या पुन्हा वाढविण्यात येईल.- उमेश शेंडे, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, न. प. नागभीड

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणीwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक