शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

बल्लारपुरात ३२ वॉर्डात फक्त तीनच टँकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 17:32 IST

भर उन्हाळ्यात नळजोडणी : १ मेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : ऐन उन्हाळ्यात जीवन प्राधिकरणच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला पाईपलाईन जोडण्याचे काम सुरू असल्याने शहरातील ३२ वॉर्डातील पुरवठा ठप्प झाला. पिण्याचे पाणीच मिळत नसल्याने नागरिकांची भटकंती सुरू झाली. नगरपरिषदेकडून केवळ तीन टँकरने काही वॉर्डात पाणीपुरवठा केला आहे. उर्वरित वॉर्डातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शहरात उन्हाचा पारा भडकला. वर्धा नदीच्या पाण्याची पातळी खालावली. वर्धा नदीवरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या विहिरीला पाणी पोहचत नाही. त्यामुळे प्राधिकरणाने शनिवारपासून नवीन योजनेला पाईपलाईन जोडणे सुरू केले आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठा ठप झाला आहे.१ मेपर्यंत बंद राहण्याची सूचना जीवन प्राधिकरणाने नळग्राहकांना दिली. नवीन पाईप जोडण्याचे काम अत्यंत वेगाने करीत असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता सतीश गोर्लावार यांनी दिली. शहरातील आपत्कालीन पाणी टंचाई निर्माण झालेली पाहून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी तीन पाणी टँकरची व्यवस्था केली. पण, टँकरद्वारे शहरातील ३२ वॉर्डात पाणीपुरवठा अशक्य झाले आहे.

बल्लारपूर शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची अडचण होऊ नये म्हणून सध्या तीन टँकरने पाणी पुरवठा केल्या जात आहे. नळ योजनेचे काम लवकरच पूर्ण होईल. नागरिकांना पाण्याची सोय व्हावी या दृष्टीने नगर परिषद प्रशासनाकडून पूर्ण प्रयत्न केले जात आहेत.- विशाल वाघ, मुख्याधिकारी नगरपरिषद, बल्लारपूर

बल्लारपुरातील जनता शुद्ध पाण्यासाठी महाराष्ट्र जीवनप्राधिकरण भरवशावर आहे. पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे पाण्याची कॅन घेण्यासाठी दुकानात गर्दी होत आहे. नागरिकांची गरज लक्षात घेऊन नगरपरिषदेने पाणीपुरवठ्यासाठी टँकरची संख्या वाढवावी.- सागर राऊत, माजी नगरसेवक, बल्लारपूर

नागभीडलाही पाणीटंचाई झळा 

घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्क: नागभीड शहरालाही पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने तीन टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. मात्र, अनेकांना पाणी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

नागभीड शहराला तपाळ योजनेद्वारा पुरवठा होतो. ही योजना १९९९ मध्ये कार्यान्वित झाली. पण या योजनेत दोषांमुळे शहराला पाण्याची गरज पूर्ण करू शकत नाही. 

वर्षातून अनेकदा ही योजना विविध कारणांमुळे बंद पडते. आता तर या योजनेतून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून नगर परिषद व नगर परिषदेत समाविष्ट इतर गावांसाठी ३८ कोटी रुपये किमतीची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. योजनेचे काम पूर्ण झाले. पण, घोडे कुठे अडले हे कळेनासे झाले आहे.

सध्या शहरात काही भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू आहे. तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरचीसंख्या पुन्हा वाढविण्यात येईल.- उमेश शेंडे, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, न. प. नागभीड

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणीwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक