शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपुरात ३२ वॉर्डात फक्त तीनच टँकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 17:32 IST

भर उन्हाळ्यात नळजोडणी : १ मेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : ऐन उन्हाळ्यात जीवन प्राधिकरणच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला पाईपलाईन जोडण्याचे काम सुरू असल्याने शहरातील ३२ वॉर्डातील पुरवठा ठप्प झाला. पिण्याचे पाणीच मिळत नसल्याने नागरिकांची भटकंती सुरू झाली. नगरपरिषदेकडून केवळ तीन टँकरने काही वॉर्डात पाणीपुरवठा केला आहे. उर्वरित वॉर्डातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शहरात उन्हाचा पारा भडकला. वर्धा नदीच्या पाण्याची पातळी खालावली. वर्धा नदीवरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या विहिरीला पाणी पोहचत नाही. त्यामुळे प्राधिकरणाने शनिवारपासून नवीन योजनेला पाईपलाईन जोडणे सुरू केले आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठा ठप झाला आहे.१ मेपर्यंत बंद राहण्याची सूचना जीवन प्राधिकरणाने नळग्राहकांना दिली. नवीन पाईप जोडण्याचे काम अत्यंत वेगाने करीत असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता सतीश गोर्लावार यांनी दिली. शहरातील आपत्कालीन पाणी टंचाई निर्माण झालेली पाहून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी तीन पाणी टँकरची व्यवस्था केली. पण, टँकरद्वारे शहरातील ३२ वॉर्डात पाणीपुरवठा अशक्य झाले आहे.

बल्लारपूर शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची अडचण होऊ नये म्हणून सध्या तीन टँकरने पाणी पुरवठा केल्या जात आहे. नळ योजनेचे काम लवकरच पूर्ण होईल. नागरिकांना पाण्याची सोय व्हावी या दृष्टीने नगर परिषद प्रशासनाकडून पूर्ण प्रयत्न केले जात आहेत.- विशाल वाघ, मुख्याधिकारी नगरपरिषद, बल्लारपूर

बल्लारपुरातील जनता शुद्ध पाण्यासाठी महाराष्ट्र जीवनप्राधिकरण भरवशावर आहे. पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे पाण्याची कॅन घेण्यासाठी दुकानात गर्दी होत आहे. नागरिकांची गरज लक्षात घेऊन नगरपरिषदेने पाणीपुरवठ्यासाठी टँकरची संख्या वाढवावी.- सागर राऊत, माजी नगरसेवक, बल्लारपूर

नागभीडलाही पाणीटंचाई झळा 

घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्क: नागभीड शहरालाही पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने तीन टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. मात्र, अनेकांना पाणी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

नागभीड शहराला तपाळ योजनेद्वारा पुरवठा होतो. ही योजना १९९९ मध्ये कार्यान्वित झाली. पण या योजनेत दोषांमुळे शहराला पाण्याची गरज पूर्ण करू शकत नाही. 

वर्षातून अनेकदा ही योजना विविध कारणांमुळे बंद पडते. आता तर या योजनेतून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून नगर परिषद व नगर परिषदेत समाविष्ट इतर गावांसाठी ३८ कोटी रुपये किमतीची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. योजनेचे काम पूर्ण झाले. पण, घोडे कुठे अडले हे कळेनासे झाले आहे.

सध्या शहरात काही भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू आहे. तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरचीसंख्या पुन्हा वाढविण्यात येईल.- उमेश शेंडे, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, न. प. नागभीड

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणीwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक