शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

एक दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2022 05:00 IST

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अपघात तसेच इतर रुग्णांची संख्या अधिक असते. रक्तदात्यांची संख्या नेमकी याच दिवसात घटत असल्याने रक्त तुटवडा निर्माण होतो. यावर्षी तर मेच्या सुरुवातीपासूनच रक्त तुडवड्याचा सामना येथील रुग्णांना करावा लागत आहे. दाता द्या, रक्त न्या, अशी अवस्था येथे निर्माण झाली आहे. त्यातच आता तर एक ते दोन दिवस पुरेल एवढेच रक्त सध्या शासकीय रक्तपेढीमध्ये उपलब्ध आहे.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागणीच्या तुलनेमध्ये रक्तसाठा कमी होत असल्याने येथील जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रचंड रक्त तुडवडा आहे. एक ते दोन दिवस पुरेल एवढेच रक्त सध्या येथे उपलब्ध आहे. त्यामुळे गंभीर तसेच नियमित रुग्णांना रक्तपुरवठा कसा करायचा, असा प्रश्न सध्या रक्तसंक्रमण अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना पडला आहे. सामाजिक संस्था, राजकीय पक्ष संघटनांनी पुढाकार घेत रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तटंचाईवर मात करणे सध्या तरी गरजेचे झाले आहे.उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अपघात तसेच इतर रुग्णांची संख्या अधिक असते. रक्तदात्यांची संख्या नेमकी याच दिवसात घटत असल्याने रक्त तुटवडा निर्माण होतो. यावर्षी तर मेच्या सुरुवातीपासूनच रक्त तुडवड्याचा सामना येथील रुग्णांना करावा लागत आहे. दाता द्या, रक्त न्या, अशी अवस्था येथे निर्माण झाली आहे. त्यातच आता तर एक ते दोन दिवस पुरेल एवढेच रक्त सध्या शासकीय रक्तपेढीमध्ये उपलब्ध आहे.  गंभीर रुग्णांना वेळीच रक्त मिळण्यासाठी आता समाजातील  रक्तदात्यांनी समोर येऊन रक्तदान करण्याची गरज निर्माण झाली       आहे.

कडक उन्हामुळे अनेकांची पाठमागील काही वर्षांमध्ये रक्तदानासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. अनेक जण रक्तदान करण्यास इच्छुकही  आहेत. ते नियमित रक्तदानही करतात. मात्र सद्य:स्थितीत पारा ४६ अंशांवर पोहोचला आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. अशा वेळी नागरिक रक्तदान करण्यास पाठ फिरवीत आहेत.

अनेकांना पत्ररक्तसंक्रमण अधिकाऱ्यांनी सामाजिक संस्थांना पत्र पाठवून रक्तदान करण्याची विनंती केली आहे. 

रुग्णांची गैरसोयरक्तसाठा कमी असल्याने जिल्ह्यातील काही रुग्णांची गैरसेय होत आहे.

रक्तसंक्रमण अधिकाऱ्यांची चिंता वाढलीयेथील रक्तसंक्रमण विभागामध्ये एक ते दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना रक्तपुरवठा कसा करायचा, असा प्रश्न पडला आहे. सामाजिक संस्था, संघटनांना पत्र पाठवून येथील अधिकारी, कर्मचारी रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन करीत आहेत. मात्र उन्हामुळे शिबिराची संख्याही रोडावली आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रक्तदात्यांची संख्या कमी असते. अशा वेळी रक्तटंचाईचा सामना करावा लागतो. सामाजिक जबाबदारी म्हणून राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटनांनी रक्तदान शिबिर आयोजित करावे. यामुळे नियमित रुग्ण, गंभीर रुग्णांना रुक्तपुरवठा करणे शक्य होईल. रक्तदान शिबिर आयोजित करावे, यासाठी अनेकांना पत्र पाठवून विनंती करण्यात आली आहे.- डाॅ. अनंत हजारे, रक्तसंक्रमण अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर

 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी