शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

एक दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2022 05:00 IST

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अपघात तसेच इतर रुग्णांची संख्या अधिक असते. रक्तदात्यांची संख्या नेमकी याच दिवसात घटत असल्याने रक्त तुटवडा निर्माण होतो. यावर्षी तर मेच्या सुरुवातीपासूनच रक्त तुडवड्याचा सामना येथील रुग्णांना करावा लागत आहे. दाता द्या, रक्त न्या, अशी अवस्था येथे निर्माण झाली आहे. त्यातच आता तर एक ते दोन दिवस पुरेल एवढेच रक्त सध्या शासकीय रक्तपेढीमध्ये उपलब्ध आहे.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागणीच्या तुलनेमध्ये रक्तसाठा कमी होत असल्याने येथील जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रचंड रक्त तुडवडा आहे. एक ते दोन दिवस पुरेल एवढेच रक्त सध्या येथे उपलब्ध आहे. त्यामुळे गंभीर तसेच नियमित रुग्णांना रक्तपुरवठा कसा करायचा, असा प्रश्न सध्या रक्तसंक्रमण अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना पडला आहे. सामाजिक संस्था, राजकीय पक्ष संघटनांनी पुढाकार घेत रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तटंचाईवर मात करणे सध्या तरी गरजेचे झाले आहे.उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अपघात तसेच इतर रुग्णांची संख्या अधिक असते. रक्तदात्यांची संख्या नेमकी याच दिवसात घटत असल्याने रक्त तुटवडा निर्माण होतो. यावर्षी तर मेच्या सुरुवातीपासूनच रक्त तुडवड्याचा सामना येथील रुग्णांना करावा लागत आहे. दाता द्या, रक्त न्या, अशी अवस्था येथे निर्माण झाली आहे. त्यातच आता तर एक ते दोन दिवस पुरेल एवढेच रक्त सध्या शासकीय रक्तपेढीमध्ये उपलब्ध आहे.  गंभीर रुग्णांना वेळीच रक्त मिळण्यासाठी आता समाजातील  रक्तदात्यांनी समोर येऊन रक्तदान करण्याची गरज निर्माण झाली       आहे.

कडक उन्हामुळे अनेकांची पाठमागील काही वर्षांमध्ये रक्तदानासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. अनेक जण रक्तदान करण्यास इच्छुकही  आहेत. ते नियमित रक्तदानही करतात. मात्र सद्य:स्थितीत पारा ४६ अंशांवर पोहोचला आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. अशा वेळी नागरिक रक्तदान करण्यास पाठ फिरवीत आहेत.

अनेकांना पत्ररक्तसंक्रमण अधिकाऱ्यांनी सामाजिक संस्थांना पत्र पाठवून रक्तदान करण्याची विनंती केली आहे. 

रुग्णांची गैरसोयरक्तसाठा कमी असल्याने जिल्ह्यातील काही रुग्णांची गैरसेय होत आहे.

रक्तसंक्रमण अधिकाऱ्यांची चिंता वाढलीयेथील रक्तसंक्रमण विभागामध्ये एक ते दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना रक्तपुरवठा कसा करायचा, असा प्रश्न पडला आहे. सामाजिक संस्था, संघटनांना पत्र पाठवून येथील अधिकारी, कर्मचारी रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन करीत आहेत. मात्र उन्हामुळे शिबिराची संख्याही रोडावली आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रक्तदात्यांची संख्या कमी असते. अशा वेळी रक्तटंचाईचा सामना करावा लागतो. सामाजिक जबाबदारी म्हणून राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटनांनी रक्तदान शिबिर आयोजित करावे. यामुळे नियमित रुग्ण, गंभीर रुग्णांना रुक्तपुरवठा करणे शक्य होईल. रक्तदान शिबिर आयोजित करावे, यासाठी अनेकांना पत्र पाठवून विनंती करण्यात आली आहे.- डाॅ. अनंत हजारे, रक्तसंक्रमण अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर

 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी