शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

धरणात केवळ ४३ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:43 IST

यावर्षीचा पूर्ण पावसाळा संपत आला असला तरी जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही.

ठळक मुद्देइरई धरणाने तळ गाठला : चंद्रपूरकरांवर पाणी टंचाईचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षीचा पूर्ण पावसाळा संपत आला असला तरी जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे चंद्रपूरकरांची तहाण भागविणाºया इरई धरणासह जिल्ह्यातील सर्वच धरणांनी तळ गाठला असून सध्यास्थितीत जिल्ह्यातील सर्व धरणात केवळ ४३.८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरासह इतरही शहरांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले असून यावर्षीचा उन्हाळा कठीण जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यावर्षीच्या पावसाळ्याला सुरूवात झाली तेव्हाच वरूणराजाने जिल्हावासीयांना हुलकावणी दिली. पाऊस उशिरा पडल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. जवळपास एक महिना उशिरा पाऊस पडल्याने अनेक शेतकºयांना दुबार पेरणी करावी लागली होती. अशातच पाऊस पडला, मात्र सरासरीही गाठली नाही. त्यामुळे पावसाळा संपूनही जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प कोरडेच आहेत.अद्यापही शेतकºयांना पावसाची प्रतीक्षाच असल्याने विविध पाणी स्त्रोतांद्वारे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू आहे. धरणात उपलब्ध पाणीसाठ्यातूनही शेतपिकांना पाणी देणे सुरू असल्याने काही दिवसांतच उपलब्ध पाणीसाठा संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षीच्या उन्ह्याळ्यात तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे.९ सिंचन प्रकल्पात ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठाजिल्ह्यात इरई, चंदई, चारगाव, अमलनाला, लभानसराड, पकडीगुडम, डोंगरगाव, लाल नाला, आसोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर अशी ११ सिंचन प्रकल्प आहेत. यापैकी घोडाझरी तलाव वगळता एकाही सिंचन प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध नाही. घोडाझरी तलावात सध्यास्थितीत ७५.७७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून चंदई धरणात ६१.९९ आणि डोंगरगाव धरणात ५९.३० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर इतर धरणात ५० टक्केपेक्षाही कमी पाणीसाठा उपलब्ध आहे.धरणात सध्या उपलब्ध पाणीसाठीधरण टक्केवारीचंदई ६१.९९चारगाव ३९.९७अमलनाला २४.८८लभानसराड १६.१३पकडीगुडम १८.९९डोंगरगाव ५९.३०इरई ३४.५०लालनाला ३१.०१आसोलामेंढा ३४.०१घोडाझरी ७५.२७नलेश्वर ४६.२७एकूण ४३.८५