शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

धरणात केवळ ४३ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:43 IST

यावर्षीचा पूर्ण पावसाळा संपत आला असला तरी जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही.

ठळक मुद्देइरई धरणाने तळ गाठला : चंद्रपूरकरांवर पाणी टंचाईचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षीचा पूर्ण पावसाळा संपत आला असला तरी जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे चंद्रपूरकरांची तहाण भागविणाºया इरई धरणासह जिल्ह्यातील सर्वच धरणांनी तळ गाठला असून सध्यास्थितीत जिल्ह्यातील सर्व धरणात केवळ ४३.८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरासह इतरही शहरांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले असून यावर्षीचा उन्हाळा कठीण जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यावर्षीच्या पावसाळ्याला सुरूवात झाली तेव्हाच वरूणराजाने जिल्हावासीयांना हुलकावणी दिली. पाऊस उशिरा पडल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. जवळपास एक महिना उशिरा पाऊस पडल्याने अनेक शेतकºयांना दुबार पेरणी करावी लागली होती. अशातच पाऊस पडला, मात्र सरासरीही गाठली नाही. त्यामुळे पावसाळा संपूनही जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प कोरडेच आहेत.अद्यापही शेतकºयांना पावसाची प्रतीक्षाच असल्याने विविध पाणी स्त्रोतांद्वारे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू आहे. धरणात उपलब्ध पाणीसाठ्यातूनही शेतपिकांना पाणी देणे सुरू असल्याने काही दिवसांतच उपलब्ध पाणीसाठा संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षीच्या उन्ह्याळ्यात तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे.९ सिंचन प्रकल्पात ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठाजिल्ह्यात इरई, चंदई, चारगाव, अमलनाला, लभानसराड, पकडीगुडम, डोंगरगाव, लाल नाला, आसोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर अशी ११ सिंचन प्रकल्प आहेत. यापैकी घोडाझरी तलाव वगळता एकाही सिंचन प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध नाही. घोडाझरी तलावात सध्यास्थितीत ७५.७७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून चंदई धरणात ६१.९९ आणि डोंगरगाव धरणात ५९.३० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर इतर धरणात ५० टक्केपेक्षाही कमी पाणीसाठा उपलब्ध आहे.धरणात सध्या उपलब्ध पाणीसाठीधरण टक्केवारीचंदई ६१.९९चारगाव ३९.९७अमलनाला २४.८८लभानसराड १६.१३पकडीगुडम १८.९९डोंगरगाव ५९.३०इरई ३४.५०लालनाला ३१.०१आसोलामेंढा ३४.०१घोडाझरी ७५.२७नलेश्वर ४६.२७एकूण ४३.८५