क्षयरुग्ण शोध मोहिमेत अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 05:00 IST2020-03-02T05:00:00+5:302020-03-02T05:00:07+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील निवडलेल्या तालुक्यांमध्ये क्षयरुग्ण शोध मोहीम १६ ते २३ मार्च २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत संबंधित अधिकारी व गैरसरकारी संस्थांनी विशेष लक्ष द्यावे व मोहीम यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. शोध मोहिमेमध्ये घेण्यात आलेली लोकसंख्या व घरे यांच्यापर्यंत मोहिमेचे टीम सदस्य पोहोचणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

क्षयरुग्ण शोध मोहिमेत अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यातील सर्व जिल्ह्यात क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील निवडलेल्या तालुक्यांमध्ये क्षयरुग्ण शोध मोहीम १६ ते २३ मार्च २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत संबंधित अधिकारी व गैरसरकारी संस्थांनी विशेष लक्ष द्यावे व मोहीम यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. शोध मोहिमेमध्ये घेण्यात आलेली लोकसंख्या व घरे यांच्यापर्यंत मोहिमेचे टीम सदस्य पोहोचणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम २०२० करिता जिल्हा समन्वय समितीची सभा जिल्हा परिषद चंद्रपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. पी गहलोत, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. गेडाम, आयएमएचे अध्यक्ष डॉ. किरण देशपांडे, वैद्यकीय अधिकारी तथा आरएमओ चंद्रपूरचे डॉ. हेमचंद कन्नाके, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सौरभ राजूरकर, डॉ. एन. एन. जीवने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्रीनिवास मुक्कावार, राजेश पालीवाल, सतीश गोस्वामी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे यांनी सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीमेविषयी माहिती दिली. या मोहीमेत आशांचा सहभाग महत्त्वपूर्ण असणार आहे. या संदर्भात डॉ.आर.पी गहलोत यांनी माहिती दिली.
सात तालुक्यांचा समावेश
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, जिवती, कोरपणा, मूल,पोंभूर्णा, सिंदेवाही या सात तालुक्यांमध्ये सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहीम १६ ते २३ मार्च या कालावधीत राबविण्यात येत असून सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिमेत ५ टक्के नमुने दूषित आढळणे अपेक्षित आहे, असे यावेळी सांगण्यात आले. यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.