शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

१०,१२ वीच्या परीक्षा केंद्रासाठी आता सुधारीत निकष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 6:00 AM

परीक्षा केंद्रासाठी यापूर्वीच्या निकषानुसार विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. पायाभूत सुविधा नसतानाही दहावी आणि बारावीचे परीक्षा केंद्र दिले जात होते. परिणामी जुन्या निकषांची दुरूस्ती करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली.

ठळक मुद्देसुविधा नसलेल्याशाळा वगळणार : ३१ आॅगस्टपर्यंत प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दहावी आणि बारावीच्या परिक्षाकेंद्रासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सुधारित निकष जाहीर केले आहेत. त्यामुळे या निकषांना अनुसरून जिल्ह्यातील शाळांची माहिती ३१ आॅगस्टपर्यंत पाठविण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.परीक्षा केंद्रासाठी यापूर्वीच्या निकषानुसार विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. पायाभूत सुविधा नसतानाही दहावी आणि बारावीचे परीक्षा केंद्र दिले जात होते. परिणामी जुन्या निकषांची दुरूस्ती करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सुधारित निकष जाहीर केले. या नवीन निकषानुसार शाळा व्यवस्थापकांना सुविधा निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. केंद्र व्यवस्थापनासाठी दोन वर्गखोल्या आणि २५ विद्यार्थ्यांमागे एक वर्गखोली या प्रमाणात वर्गखोल्या असाव्यात. इमारतीच्या खिडक्यांना बारीक जाळ्या असाव्यात, दुहेरी बेंच प्रत्येक विद्यार्थ्याला द्यावे लागणार आहे. प्रत्येक वर्गखोलीमध्ये वीज जोडणीसह किमान २ ट्युब एलईडी व पंखे असावेत. अद्यावत संगणक प्रिंटरसह इंटरनेट सुविधा तसेच सीसीटीव्ही कॅमेरे असणाऱ्या शाळा व महाविद्यालयांना नवीन निकषानुसार केंद्रासाठी प्रथम प्राधान्य दिल्या जाणार आहे.परीक्षा कालावधीत केंद्राचे जनरेटर व्यवस्थित असावे, सर्व वर्गखोल्यांमध्ये दिवे, पंखे चालू राहतील इतक्या क्षमतेचे असावे. पर्यायी व्यवस्था म्हणून इनर्व्हटर, सौरउर्जा व अन्य सुविधा सज्ज ठेवण्याची जबाबदारी शाळेची आहे. अद्यावत अग्निशामक यंत्रणा व शाळेभोवती चारही बाजूने सुरक्षाभिंत असली पाहिजे. मुलामुलींसाठी स्वतंत्र व विद्यार्थी संख्येनुसार पुरेशी स्वच्छतागृहे असावीत.या स्वच्छतागृहांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा असावा. केंद्र शाळेत प्रथमोपचार आरोग्य पेढी ठेवावी लागणार आहे. केंद्रापासून वैद्यकीय सुविधा पोस्ट आॅफीस, बसव्यवस्था, पोलीस स्टेशनजवळच्या अंतरावर असावेत. परीक्षा विषयक गोपनीय साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी सोय व सुरक्षितता असावी. परिक्षा केंद्रावर दोन महाविद्यालये ही एकाच संस्थेची नसावीत. नव्याने सांकेतांक प्राप्त शाळा, महाविद्यालयांना शक्यतो दोन वर्षांपर्यंत परिक्षा केंद्र देण्यात येऊ नये. नवीन केंद्रांना तीन वर्षांकरिता केंद्र संचालक हा त्या शाळेव्यतिरिक्त अन्य घटकांतून विभागीय मंडळाकडून देण्यात येणार आहे. असे सुधारित निकष नवीन परीक्षा केंद्रासाठी लागू करण्यात आले आहेत.विद्यार्थी संख्या वगळता ज्या अटींवर परीक्षा केंद्र मंजूर करण्यात आले. त्या अटींचे पालन केले नाही, तर केंद्र बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे आता परीक्षा केंद्राना प्रथम सुविधा उपलब्ध कराव्या लागणार आहे.शाळांना द्याव्या लागणार सुविधाशाळा, महाविद्यालयांना परीक्षा केंद्र अबाधित ठेवायचे असेल तर नवीन निकषानुसार सर्व सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, या निकषानुसार ग्रामीण आणि दुर्गम भागातील केंद्रांना मोठी कसरत करावी लागणार आहे.बोगस प्रकार थांबतीलदहावी आणि बारावीमध्ये पास होण्यासाठी अनेक विद्यार्थी गैरमार्गाचा वापर करतात. हा प्रकार टाळण्यासाठी परीक्षा मंडळाने नवीन निकष जाहीर केले आहे. त्यामुळे भविष्यात परीक्षेदरम्यान करण्यात येणारे गैरप्रकार थांबतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Educationशिक्षण