शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

९० टक्के कोल्हापुरी बंधारे निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:37 PM

आॅनलाईन लोकमतकोठारी : सिंचनावर विशेष लक्ष केंद्रीत करुन या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे व उत्पन्नात कमालीची वाढ व्हावी. तसेच नापिकीने शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागू नये, यासाठी कोठारी परिसरात शेकडो बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. मात्र अधिकाºयांच्या दुर्लक्षितपणामुळे या परिसरातील ९० ...

आॅनलाईन लोकमतकोठारी : सिंचनावर विशेष लक्ष केंद्रीत करुन या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे व उत्पन्नात कमालीची वाढ व्हावी. तसेच नापिकीने शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागू नये, यासाठी कोठारी परिसरात शेकडो बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. मात्र अधिकाºयांच्या दुर्लक्षितपणामुळे या परिसरातील ९० टक्के बंधारे निकामी झाल्याचे वास्तव पुढे आले आहे.जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागातर्फे तसेच कृषी विभागाअंतर्गत बारमाही वाहणाऱ्या जिवंत नाल्यावर, हंगामी वाहनाºया नाल्यावर, याशिवाय मुळीच न वाहनाऱ्या नाल्यावर कोल्हापुरी, सिमेंट प्लग बंधाऱ्याची निर्मिती ठिकठिकाणी करण्यात आली. या बंधाऱ्याचे पाणी अडवून शेतकऱ्यांची कोरडवाहू शेती सिंचनाखाली आणून शेती सुजलाम सुफलाम करुन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा शासनाचा प्रयत्न होता. त्यासाठी करोडो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. बंधारे बांधकाम पूर्ण झाले. शासनाच्या रेकॉर्डवर शेतकऱ्यासाठी सिंचनाची तजवीज केल्याची नोंद झाली. मात्र वास्तविक चित्र वेगळेच आहे. शेती सिंचनासाठी बांधण्यात आलेल्या बंधाºयाची देखरेख संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली नाही. परिणामी आजघडीला हे बंधारे पाणी अडविण्याऐवजी पाणी वाहण्यासाठी वाट मोकळी करताना दिसत आहे. अनेक बंधारे पडले आहेत. त्याच्या भिंती पडून विखुरल्या आहेत. पाणी अडविण्यासाठी बंधाºयावर टाकण्यात आलेल्या पाट्या चोरीला गेल्या आहेत.चौकशी व्हावीसिंचन विभाग, कृषी विभाग व वनविभागांतर्गत बांधण्यात आलेल्या मागील चार वर्षाचे बंधारे तपासणी, प्रत्यक्ष पाहणी करावी व जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर व बंधारे बांधकाम केलेल्या कंत्राटदारांवर, निरीक्षण करणाºया अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.वनविभागाचे बंधारेही निकामीमागील चार वर्षापासून वनविभागाच्या जंगल क्षेत्रातील नाल्यात बंधारे बांधकामावर विशेष जोर देण्यात आला. या जंगलाचा विकास व वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये व त्यात वन्यप्राण्यांचा जीव जाऊ नये, यासाठी वनक्षेत्रात बंधारे बांधकामावर शासनाने निधी उपलब्ध करुन दिला. मात्र याही विभागातील खांबुगिरी व अधिकाºयांच्या दुर्लक्षतेमुळे अनेक बंधारे केवळ शोभेची वास्तू ठरत आहे. ज्या उद्देशाने सिमेंट प्लग, गॅबीन, दगडी बंधारे बांधण्यात आले. त्या उद्देशालाच हरताळ फासण्यात आल्याचे वास्तव्य चित्र आहे.