शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

महापुरूषांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:42 AM

शिक्षणातूनच अनेक पिढ्यांचे कल्याण होते. हे युग स्पर्धेचे आहे. एक निर्णय चुकला तर स्पर्धेच्या युगात टिकून राहणे शक्य होते. त्यासाठी गावात शैक्षणिक वातावरण निर्माण करावे. जीवनात यशस्वी होण्यासाठी महापुरूषांचे चरित्र वाचावे. यातून स्फूर्ती, ऊर्जा निर्माण होईल, असे प्रतिपादन प्रा. हेमंत देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देहेमंत देशमुख : ऊर्जानगरात गोंडीयन समाजाचा प्रबोधन मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षणातूनच अनेक पिढ्यांचे कल्याण होते. हे युग स्पर्धेचे आहे. एक निर्णय चुकला तर स्पर्धेच्या युगात टिकून राहणे शक्य होते. त्यासाठी गावात शैक्षणिक वातावरण निर्माण करावे. जीवनात यशस्वी होण्यासाठी महापुरूषांचे चरित्र वाचावे. यातून स्फूर्ती, ऊर्जा निर्माण होईल, असे प्रतिपादन प्रा. हेमंत देशमुख यांनी केले. उर्जानगरातील स्नेहबंध सभागृहात गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वीरांगना महाराणी दुर्गावती शहिद दिनानिमित्त सत्कार व मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक बी. डी. मडावी, महाऔष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे, प्रबोधकार दिलीप सोळंके, लोकश मडावी, गोंडराजे विरेंद्र्रशाह आत्राम, सुनील गावडे, मनोज आत्राम, स्मिता कोवे, चंद्रशेखर सेडमाके, वानखेडे, प्राचार्य डॉ. विजय खंडाते व गोंडीयन आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आजच्या काळात पारंपरिक शिक्षण न घेता आधुनिक कौशल्य शिक्षण घेतले पाहिजे. वैयक्तिक क्षमतांचा विकास करून येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यास तयार व्हावे, असे विचार दिलीप सोळंके यांनी मांडले.अर्चना खंडाते यांना राणी हिराई सामाजिक पुरस्कार व महादेव देवाजी मडावी यांना गोंडवाना भूषण पुरस्काराने व राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक डॉ. सुधाकर मडावी यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थी व माऊंट एव्हरेस्ट सर करणाºया शूर गिर्यारोहकांचाही विशेष सत्कार करण्यात आला. खासदार बाळू धानोरकर यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.मुख्य अभियंता राजु घुगे म्हणाले, आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. परंतु, जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे. विद्यार्थ्यांनी वाचन वाढवावे. विविध विषयांचे ज्ञान मिळविण्यासोबत अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. यश मिळविण्यासाठी हाच एक पर्याय आहे. मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी संघटनेच्या विविध उपक्रमांची पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली.गुणवंत विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. लोकश मडावी, गोंडराजे विरेंद्रशाह आत्राम सुनील गावडे, मनोज आत्राम, स्मिता कोवे, चंद्रशेखर सेडमाके, वानखेडे प्राचार्य डॉ. खंडाते यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन रमेश कुंभरे, प्रास्ताविक, सुधाकर कन्नाके यांनी केले. सुनिल तलांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विजय तोडासे, ज्योती रावन गावडे राजेंद्र किन्नाके, प्रमोद इरपाते, प्रमोद कोवे, राजु कुंभरे, माणिक परचाके, रविंद्र पुसाम, बंडू कुळमेथे, सुभाष कोवे, प्रा धीरज शेडमाके, सुनील तलांडे, संजय तोडासे, निलेश कुमरे, अमृत आत्राम, दिनेश कुमरे, सारंग कुंभर, विद्यार्थी व गोंडीयन समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षण