शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

नवरगावात मिरचीच्या सातऱ्याला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 12:44 AM

येथील रामदास दुर्कीवार यांच्या राईस मिल परिसरात असलेल्या मिरचीच्या सातऱ्याला शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारात अचानक आग लागली. यामध्ये अंदाजे मिरची व बारदाना मिळून दहा-बारा लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देदहा लाखांचे नुकसान । मिरची व बारदाना जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : येथील रामदास दुर्कीवार यांच्या राईस मिल परिसरात असलेल्या मिरचीच्या सातऱ्याला शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारात अचानक आग लागली. यामध्ये अंदाजे मिरची व बारदाना मिळून दहा-बारा लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.नागपूर येथील मिरची व्यापारी यांनी नवरगाव येथे मिरचीचे देठ तोडण्यासाठी सदर राईसमील परिसरात सातरा मांडला होता. या ठिकाणी दररोज दीडशे- दोनशे कामगार मिरचीचीचे देठं तोडण्याचे काम करीत असतात. नेहमीप्रमाणे शनिवारलाही हे काम सुरू असताना मिरची सातऱ्याला व वर छावणीसाठी बांबु टाकून बांधलेला पोत्यांवर अचानक आग लागली. काही कामगाराच्या लक्षात ही घटना येताच कामगार सैरावरा पळू लागले. तोपर्यंत लगेच आगीने रौद्ररूप धारण केले. प्रत्येक कामगार आपला जीव वाचविण्यासाठी तर काही कामगार मालकाच्या मिरचीचे नुकसान होऊ नये म्हणून मिरचीच्या पोत्यासह बाहेर कसेबसे पळाले.आग नेमकी कशी लागली, हे कळू शकले नाही. मात्र, दुपारी कडक उन्हामुळे मिरची मोडतात. तेव्हा दुपारी त्यावर पाणी मारले जाते. यासाठी लगतच्या विहिरीवर पाणी मारण्यासाठी मोटारपंप बसविला होता. मोटारपंप सुरू करण्यासाठी स्वीच आॅन करताच ठिणग्या उसळल्या. यातील ठिणगी मिरच्यांच्या पोत्यावर पडून आग लागली असावी, असा अंदाज तेथील कामगारांनी वर्तविला. ज्या परिसरात आग लागली, तिथे विद्युत विभागाची डिपी होते. विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ते बंद केल्याने मोठा अनर्थ टळला.उपस्थिती रजिस्टरही जळालेया सातऱ्यावर काम करणाऱ्या मजुरांचे कामगार हजर असण्याचे रजिस्टर व माल ने-आण करण्याचे रजिस्टर जळाल्याने आपली मजुरी मिळणार की नाही अशी सभ्रमावस्थी मजुरवर्गामध्ये निर्माण झाली आहे.

टॅग्स :fireआग