शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

नाला डायवरशनमुळे ३५० एकर शेतीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:31 IST

राजुरा : राजुरा तालुक्यातील गोवरी, चिंचोली, माथरा या गावांजवळून वाहणाऱ्या ओढ्यांचे नैसर्गिक प्रवाह बदलून त्यांना एकाच ओढ्यात प्रवाहित ...

राजुरा : राजुरा तालुक्यातील गोवरी, चिंचोली, माथरा या गावांजवळून वाहणाऱ्या ओढ्यांचे नैसर्गिक प्रवाह बदलून त्यांना एकाच ओढ्यात प्रवाहित केल्याने आणि खाणीभोवती माती टाकून उंच भाग केल्याने या नाल्यातील संपूर्ण पाणी शेतकऱ्यांच्या शेतात येऊन सुमारे ३५० एकर शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र आश्वासन देऊनही वेकोलिने कसलीही नुकसानभरपाई दिली नाही. ओढा डायवरशन करताना वेकोलिने कायदाभंग केला असून, वेकोलिच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी गोवरी, पोवनी व माथरा येथील आपद्ग्रस्त शेतकऱ्यांनी पत्रपरिषदेत केली.

या शेतकऱ्यांनी राजुरा तहसीलदार यांना निवेदन देऊन या भागातील चार मोठ्या ओढ्यांचे वळणीकरण करताना वेकोलिने कायदयातील तरतुदीचे उल्लंघन करून खोदकाम केले, असा आरोप केला आहे. गोवरी, पोवनी, साखरी, चिंचोली या गावांच्या परिसरात वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणी आहेत. या खाण परिसरात अनेक नाले आहेत. वेकोलिने यापूर्वी दोन ओढ्यांचे खोदकाम करून नैसर्गिकपणे वाहणाऱ्या नाल्यांना कृत्रिमपणे गोवरी ओढ्याला जोडले. यामुळे पाण्याचा प्रवाह बदलून बॅकवॉटरचा फटका गोवरी व परिसरातील गावांना व शेतीला बसत आहे. २२ व २३ जुलैला गोवरी गावातील अनेक घरांत पाणी घुसून गावकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. तसेच गोवरी परिसरातील शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली येऊन शेतपिकाचेसुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली. मात्र वेकोलिकडून नुकसानभरपाई देण्यात आली नाही.

पत्रकार परिषदेला ॲड. मारोती कुरवटकर आणि गोवरी येथील शंकर बोढे, सुधाकर पाचभाई, किशोर लोहे, रूपेश पाचभाई, अरुण पाचभाई, विलास लोहे, सुधाकर ढुमने, श्रीरंग उरकुडे, गुरुदास अहीरकर, लहू चहारे, सुनील पाचभाई, पंढरी बोढे व शेतकरी उपस्थित होते.

190821\img-20210818-wa0241.jpg

फोटो