शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नागभीड-नागपूर रेल्वे मार्ग निविदा निघाल्याने आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 6:00 AM

ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना १०६ किमी लांबीच्या या नॅरोगेज मार्गास ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची परवानगी देण्यात आली होती. पण प्रत्येक वेळेस अर्थसंकल्पात तरतूदच करण्यात येत नव्हती. दरम्यान, २०१४ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले आणि या मार्गाविषयी या भागातील लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या.

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड - नागपूर या बहूप्रतिक्षित ब्राडगेज रेल्वे मार्गासाठी विभागाकडून निविदा मागविण्यात आल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत.येथील रेल्वे लाईन परिसरातील जमीन अधिग्रहीत करण्यासंदर्भात काहिंना नोटीस देण्यात आल्याने लवकरच या मागार्चे कामही सुरू होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना १०६ किमी लांबीच्या या नॅरोगेज मार्गास ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची परवानगी देण्यात आली होती. पण प्रत्येक वेळेस अर्थसंकल्पात तरतूदच करण्यात येत नव्हती. दरम्यान, २०१४ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले आणि या मार्गाविषयी या भागातील लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. या लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी २०१४ मध्ये निवडून आल्यावर काही दिवसातच नागभीड येथे रेल्वेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या मार्गातील अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळेही या अपेक्षेत आणखीच भर पडली होती. मात्र या मार्गासाठी कोणतीही तरतूद होत नसल्याने लोकांच्या अपेक्षेवर पाणी फेरल्या जात होते. या मार्गास ७०८ कोटी ११ लाख रुपये खर्च असून यातील निम्मा वाटा राज्य सरकार उचलणार आहे.या कबुलीनंतर या क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी या मागार्साठी अर्थसंकल्पात तरतूद व्हावी यासाठी प्रयत्न केले. दीर्घ प्रतीक्षेनंतर का, होईना पण या रेल्वे मागार्साठी विभागाने निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. या मागार्चे तीन टप्प्यात काम होणार असून पहिल्या टप्प्यात नागभीड - भिवापूर , दुसऱ्या टप्प्यात भिवापूर - उमरेड आणि तिसऱ्या टप्प्यात उमरेड - नागपूर असे काम विद्युतीकरणासह होणार असल्याची माहिती आहे.एकमेव मार्गमध्य रेल्वे विभागात जे काही रेल्वे मार्ग आहेत, त्या सर्व रेल्वे मार्गांचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाले आहे. केवळ नागभीड - नागपूर हाच एकमेव मार्ग नॅरोगेज उरलेला होता. १०६ कि.मी. लांबीच्या या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी, गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, कुरखेडा ,आरमोरी, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील पवनी व लाखांदूर या तालुक्यांना नागपूरसाठी अतिशय सोयीचा मार्ग ठरू शकतो. एवढेच नाही तर या भागातील कृषी उत्पादनासाठी या मार्गाच्या रूपाने नागपूरसारखी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. नागपूरवरून दक्षिणेकडे जाणाऱ्या व दक्षिणेकडून नागपूरला येणाºया वर्धाऐवजी हा मार्ग सोयीस्कर ठरणार आहे.रेल्वे विभागाने या मार्गाच्या निविदा काढल्याने हा प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली निघाला आहे. हा मार्ग चंद्रपूर , गडचिरोली या जिल्ह्यांसाठी प्रगतीमार्ग ठरणार आहे.- संजय गजपुरे, जि.प. व सल्लागार सदस्य झोन रेल्वे कमेटी.

टॅग्स :railwayरेल्वे