शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वीज तार तुटली, जीव धोक्यात टाकू नका, व्हॉटस्ॲपवर कळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 14:46 IST

वीजसेवेच्या तक्रारीसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते, अशा वेळी माहिती देण्यासाठी १८००-१०२-३४३५,१८००-२३३-३४३५, १९१२०, १९१२ हे टोल क्रमांक उपलब्ध आहेत.

ठळक मुद्देधोका टाळण्यासाठी ग्राहकांना महावितरणचे आवाहन

चंद्रपूर : आजच्या औद्योगिक युगात विजेचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विजेपासून ज्याप्रमाणे फायदा होऊ शकतो, त्याचप्रमाणे ती वापरताना योग्य काळजी घेतली नाही, तर नुकसानीलाही सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रत्येकाने विजेचे काम करताना किंवा इतरवेळी सुरक्षिततेचे नियम पाळणे गरजेचे आहे. वीज तार तुटली, खांब पडला तर स्वत: हात न लावता त्वरित महावितरणच्या टोल फ्री क्रमांक किंवा व्हॉटस्ॲप क्रमांकावरही कळवा. यामुळे संभाव्य धोका टाळता येणे शक्य आहे.

विजेचा वापर वाढल्यामुळे अपघाताच्या घटनांतही वाढ झाली आहे. अनेक वेळा सुरक्षितता न बाळगता काही नागरिक वीज खांब, तुटलेल्या तारांना हात लावण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे अपघाताची शक्यता अधिक असते. असे न करता महावितरण कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये फोन करून तक्रार केल्यास संभाव्य धोका टाळता येतो. यामध्ये वीज जाणे, विजेची तार तुटणे, रोहित्रामध्ये बिघाड होणे, वीज बिल व मीटरसंबंधीच्या तक्रारीसाठी ग्राहकाला आता महावितरणने सुविधा दिली आहे.

या नंबरवर करा व्हॉटस्ॲप किंवा एसएमएस

वीजसेवेच्या तक्रारीसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते, अशा वेळी माहिती देण्यासाठी १८००-१०२-३४३५,१८००-२३३-३४३५, १९१२०, १९१२ हे टोल क्रमांक उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅंडलाइन किंवा मोबाइलद्वारे या टोल फ्री क्रमांकावर वीज ग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे.

तत्काळ घेणार दखल

व्हॉटस्ॲप किंवा टोल फ्री क्रमांकावर ग्राहकांनी तक्रार केल्यास महावितरणचे अधिकारी तत्काळ दखल घेणार आहेत. यासाठी ग्राहकांना संबंधित नंबरवर तक्रार करणे मात्र गरजेचे आहे.

स्वत: हात न लावणे योग्य

वीज खांब कोसळला, वीज तार तुटली, तर स्वत: हात लावू नये, अनेक वेळा या तारांमध्ये वीज प्रवाह असतो. त्यामुळे सुरक्षेसाठी हात लावू नये. अनेक वेळा त्वचेच्या ओलसरपणावरसुद्धा विजेच्या धक्क्याची तीव्रता अवलंबून असते. कोरड्या त्वचेचा रेझिस्टन्स जास्त, तर ओलसर त्वचेचा रेझिस्टन्स कमी असतो, म्हणूनच ओल्या हाताने विद्युत उपकरणे हाताळणे किंवा स्विच चालू-बंद करणेही टाळावे.

ग्राहकांना सुविधा देण्यासाठी महावितरणने विविध पावले उचलली आहेत. यामध्ये वीज खांब कोसळला, तार तुटली, तर तक्रार करण्यासाठी व्हॉटस्ॲप नंबर, टोल फ्री नंबर जारी केले आहेत. या माध्यमातून ग्राहकांना महावितरणला तक्रार करता येते.

-सुनील देशपांडे, मुख्य अभियंता, महावितरण

टॅग्स :electricityवीजSocialसामाजिकPower Shutdownभारनियमनconsumerग्राहक