शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

अवकाळी पावसाने एका रात्रीत केला घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 6:00 AM

खरिपात झालेले नुकसानीचे दु:ख विसरून आता शेतकऱ्यांनी रबी पिकांची लागवड केली. मात्र येथेही निसर्ग आडवा येत आहे. गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी, मका, भाजीपाला पिके धोक्यात आली आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हे ढगाळ वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने तुरळक हजेरी लावल्याने शेतातील पिके उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला.

ठळक मुद्देजिल्हाभरात मोठे नुकसान : आठवडाभरापासून ढगाळ वातावरण कायम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे. अशातच अवकाळी पाऊसही हजेरी लावत आहे. बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्हाभर मुसळधार पाऊस बरसला. बुधवारी रात्रीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले. सातत्याने ढगाळ वातावरण आणि अधेमधे पाऊस बरसत असल्याने गहू, हरभरा, तूर आदी रबी पिकांना जोरदार फटका बसला आहे. खरीप हंगामातील धान आणि कापसाचेही नुकसान झाले आहे.खरिपात झालेले नुकसानीचे दु:ख विसरून आता शेतकऱ्यांनी रबी पिकांची लागवड केली. मात्र येथेही निसर्ग आडवा येत आहे. गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी, मका, भाजीपाला पिके धोक्यात आली आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हे ढगाळ वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने तुरळक हजेरी लावल्याने शेतातील पिके उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला. ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी पिकांना मोठा फटका बसत आहे. रबी पिके आठवडाभरापूर्वी चांगली भरात आली होती. मात्र अचानक वातावरणात बदल झाला आहे. आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्हाभरातच जोरदार पाऊस बरसला. किमान अर्धा-एक तास हा पाऊस कायम राहिला. त्यानंतर मध्यरात्री पुन्हा पावसाने हजेरी लावली. गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास आणखी पाऊस बरसला.या पावसामुळे खरीपातील धान, कापूस आणि रबीतील सर्व पिकांना जोरदार फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या वातावरणातील बदलामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांचा फुलोरा गळत असल्याने उत्पादन वाढीला फटका बसण्याची शक्यता आहे. निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने शेतीला दिवसेंदिवस उतरती कळा आली आहे. पिकांची स्थिती चांगली असताना अचानक वातावरणात बदल झाल्याने कापसासह रबी हंगामातील सर्वच पिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे आधीच कर्जाच्या ओझ्याख्नाली असलेला शेतकरी धास्तावला आहे. अकाली पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या आहेत. यामुळे शेतकºयांचे नुकसान झाले आहेत. कृषी विभागाने सर्व्हेक्षण करावे, अशी मागणी आहे.नागरिकांच्या आरोग्यावरही परिणामसातत्याने ढगाळ वातावरण आणि अकाली पावसामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होत आहे. लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार होत असून रुग्णालयात बालगोपालांची उपचारासाठी गर्दी दिसत आहे. सूर्यानेही नागरिकांना दर्शन देणे कमी केले आहे. सकाळपासून सुरू झालेले ढगाळ वातावरण रात्रीपर्यंत कायम राहत आहे. केव्हा सूर्यादय होतो आणि केव्हा मावळतो, हेच कळेणासे झाले आहे.भाजीपाला पिकाचेही नुकसानभद्रावती, वरोरा, सिंदेवाही, नागभीड या तालुक्यात बऱ्यापैकी भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. अनेकांच्या वाड्या आहेत. मात्र बुधवारी रात्री जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. याशिवाय भद्रावती तालुक्यात गाराही पडल्या. त्यामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.ढगाळ वातावरणामुळे थंडी कमीचंद्रपूर जिल्ह्यात आठवडाभरापूर्वी कडाक्याची थंडी पडू लागली होती. पारा चक्क ५.१ अंशापर्यंत घसरला होता. त्यामुळे आता जानेवारी महिना संपेपर्यंत अशीच थंडी कायम राहील, असे वाटले होते. मात्र ढगाळ वातावरणाने थंडीचा जोर कमी करून टाकला आहे. सातत्याने ढगाळ वातावरण राहत असल्याने पारा वाढला आहे. बुधवारी तापमान १६.६ अंशापर्यंत आले.

टॅग्स :Rainपाऊस