शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

कोदेपारात एसआरटी धान रोवणीची पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 21:48 IST

उशिरा व अल्प पावसाने रोवणीला विलंब झाल्यास उत्पादन कमी होते. यावर धोका टाळण्यासाठी एस.आर.टी. ही रोवणी पद्धत उपाय ठरू शकेल काय, याचा प्रयोग कोदेपार येथील एका शेतकरी महिलेने केला. शशिकला श्रीराम माटे असे या शेतकरी महिलेचे नाव आहे.

ठळक मुद्देमशागतीच्या खर्चात बचत : महिला शेतकऱ्याचे धाडस

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : उशिरा व अल्प पावसाने रोवणीला विलंब झाल्यास उत्पादन कमी होते. यावर धोका टाळण्यासाठी एस.आर.टी. ही रोवणी पद्धत उपाय ठरू शकेल काय, याचा प्रयोग कोदेपार येथील एका शेतकरी महिलेने केला. शशिकला श्रीराम माटे असे या शेतकरी महिलेचे नाव आहे.शशिकला माटे या नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका आहेत. त्यांच्याकडे सात एकर धानाची शेती आहे. आजपर्यंत पारंपरिक पद्धतीनेच शेती करीत होत्या. काहीतरी नवीन करावे म्हणून त्यांनी यावर्षी एका एकरात धानाची रोवणी केली. हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढील वर्षी पूर्ण सातही एकरात याच पद्धतीने धानाची रोवणी करणार आहेत. या तंत्राविषयी म्हणाल्या, हे तंत्र कोकणात विकसित झाले आहे. एस.आर.टी तंत्र हे भातशेतीशी संबंधित नांगरणी, चिखलणी व लावणी न करता कायमस्वरूपी गादी वाफ्यावर टोकण पद्धतीने लागवड करून उत्तम भात पिकवण्याचे नवे तंत्र आहे. यामुळे मशागत, बियाणे, मजुरी आदी खर्चात बचत होऊन उत्पादन आणि जमिनीच्या सुपिकतेमध्येही वाढ होते. या तंत्रात शेतीची मशागत व गादीवाफे एकदाच करायचे आणि मग या कायमस्वरूपी या गादीवाफ्यांवर एका मागून एक अशी फेरपालट पिके घेता येतात. या तंत्राचे अनेक फायदे आहेत. चिखलणी व लावणी न करायला लागल्यामुळे ३०-४० टक्के खर्च आणि ५० टक्के त्रास कमी होतो. चिखलणी करताना वाहून जाणाºया सुपीक मातीची धूप वाचेल व पुढच्या पिढीच्या हातात सुपीक जमीन देता येईल. गांडुळांची संख्या वाढते. रोपांमधील योग्य अंतरामुळे हवा खेळती राहते.गांडुळांमुळे जमीन भुसभुशीत राहते. गादी वाफ्यामुळे कमी पावसात पिकाला पाण्याचा ताण पडत नाही. अती पावसात शेतात पाणी साचून राहत नाही. गादीवाफ्यावर भातपिकानंतर नांगरणी न करता फेरपालटीची पिके घेता येतात. दोन पिकांमधील मशागतीचा वेळ आणि खर्च वाचतो. एकदाच केलेले हे गादीवाफे ८-९ वर्ष वापरता येतात. हे तंत्र सर्वसामान्य शेतकºया आत्मविश्वास आणि शेतकºयांना खºया अर्थाने बलवान करणारं ठरू शकते. हे तंत्र यशस्वी झाले तर त्यातून अनेक शेतकºयांना स्फूर्ती आणि प्रेरणा मिळू शकते, असेही माटे यांनी सांगितले.