शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

Maharashtra Election 2019 : विकासाच्या मार्गावर अग्रेसर होण्यासाठी महायुतीला साथ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 12:07 AM

बल्लारपूर शहरातील रेल्वे स्टेशन देखणे व सुंदर झाले असून देशातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. विकासाची ही प्रक्रिया अधिक गतीमान करण्यासाठी विकासाच्या बाजूने कौल देत बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासाचा मार्ग सुलभ करण्याचे आवाहन बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : बल्लारपुरात विविध सामाजिक संघटनेतर्फे कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात आम्ही विकासाचा झंझावात निर्माण केला. बल्लारपूर शहरात सुसज्ज नाट्यगृह, पोलीस स्टेशन, डायमंड प्रशिक्षण केंद्र, शहरानजिक देशातील अत्याधुनिक सैनिकी शाळा, बॉटनिकल गार्ड, स्टेडियम, ग्रामीण रूग्णालय, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे बांधकाम, शहरासाठी ६५ कोटी रू. किमतीची पाणीपुरवठा योजना, अशी विकासाची विविध कामे आपण बल्लारपूर शहरात मंजूर करविली आहे. बल्लारपूर शहरातील रेल्वे स्टेशन देखणे व सुंदर झाले असून देशातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. विकासाची ही प्रक्रिया अधिक गतीमान करण्यासाठी विकासाच्या बाजूने कौल देत बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासाचा मार्ग सुलभ करण्याचे आवाहन बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.बल्लारपूर शहरातील गणपती वार्डात विविध सामाजिक संघटनांतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, शिवचंद द्विवेदी, रेणुका दुधे, मिना चौधरी, आशिष देवतळे, डॉ. बोनगीरवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, विकास प्रक्रियेत आम्ही कधीही राजकारण केले नाही.नेहमीच सर्वसमावेशक भूमिका आम्ही घेतली आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी असलेल्या योजनांचे अनुदान सहाशे रू. वरून वाढवून एक हजार रू. करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. बल्लारपूर शहरासाठी मोठया प्रमाणावर निधी आपण गेल्या पाच वर्षात उपलब्ध केला आहे. त्या माध्यमातून बल्लारपूर शहरात अभूतपूर्व अशी विकासकामे करण्यात आली आहे. शहराचा चेहरा-मोहरा बदलविण्याचा प्रयत्न आपण केला आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.यावेळी बोलताना नगराध्यक्ष हरीश शर्मा म्हणाले, विकास म्हणजे नेमके काय हे खऱ्या अर्थाने जनतेला कळले ते फक्त सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे. केवळ मतदार संघाच्या विकासाचा ध्यास ते उराशी बाळगतात. त्यांच्या पुढाकाराने आज चंद्रपूर जिल्हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर झाला आहे. विकासाचा हा रथ अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी सुधीर मुनगंटीवार पुन्हा एकदा विधानसभेत पाठविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी चंदनसिंह चंदेल यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे संचालन अमिता बोनगीरवार यांनी केले.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार