शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; उमेदवारांना चिन्ह वाटप; आता प्रचाराची रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 22:10 IST

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रांतर्गत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार उमेदवारांनी माघार घेतली असून उर्वरित व अंतिम १३ उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आलेले आहे. दरम्यान, निवडणूक निरीक्षक दीपांकर सिन्हा यांनी उमेदवारांसोबत झालेल्या बैठकीमध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देवॉर्डावॉर्डात मोर्चेबांधणी : ध्वनीक्षेपकधारकांना सुगीचे दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रांतर्गत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार उमेदवारांनी माघार घेतली असून उर्वरित व अंतिम १३ उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आलेले आहे. दरम्यान, निवडणूक निरीक्षक दीपांकर सिन्हा यांनी उमेदवारांसोबत झालेल्या बैठकीमध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता उद्या शुक्रवारपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे.चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी दाखल अर्ज व छाननी करून एकूण १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आज गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. गुरुवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १७ उमेदवारांंपैकी चार उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता उर्वरित १३ उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. काँग्रेस, भाजप, बहुजन समाज पार्टी या राष्ट्रीय पक्षांना त्यांच्या कायमस्वरूपी निवडणूक चिन्हांशिवाय इतरांना विविध निवडणूक चिन्हे दिली गेली आहेत. यात भाजपचे हंसराज अहीर यांना कमळ, कॉग्रेसचे सुरेश धानोरकर यांना हात, बहुजन समाज पार्टीचे सुशील वासनिक यांना हत्ती, बहुजन मुक्ती पार्टीचे डॉ गौतम गणपत नगराळे यांना चारपाई ( खाट ), बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे दशरथ पांडुरंग मडावी यांना एअर कंडीशन, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नामदेव माणिकराव शेडमाके यांना करवत, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे नितेश आनंदराव डोंगरे यांना कोट, प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाचे मधुकर विठ्ठल निस्ताने यांना गॅस सिलिंडर, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. राजेंद्र श्रीरामजी महाडोळे यांना कपबशी, अपक्ष उमेदवार अरविंद नानाजी राऊत यांना स्विच बोर्ड, नामदेव केशव किनाके यांना आॅटोरिक्षा, मिलिंद प्रल्हाद दहिवले यांना बॅट, राजेंद्र कृष्णराव हजारे यांना गन्ना किसान यांचा समावेश आहे. आता निवडणूक प्रचार जोर धरणार असून ९ एप्रिलला प्रचाराची अंतिम तारीख आहे. ११ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून २३ मे रोजी मतमोजणी होऊन २७ मे निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख असणार आहे.१० एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेशभारत निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी लोकसभेचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहिता अंमलात आली असून या काळात निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीकोनातून, तसेच निवडणुकीचे कामे हाताळताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यात १० एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी प्रतिबंधात्मक आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी घनश्याम भुगावकर यांनी लागू केले आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी पोलिसांना मदत व्हावी, याकरीता पोलीस अधीक्षक, यांनी सादर केलेला अहवाल पाहता मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये जिल्ह्यात २७ मार्च ते १० एप्रिल रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. मुंबई पोलिस अधिनियमानुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील कोणत्याही इसमास पुढील कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यात सोटे, तलवारी, बंदुका, भाले, सुरे, लाठया किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील, अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तू बरोबर घेवून फिरणे, अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेवून फिरणे, दगड अगर अस्त्रे सोडावयाची अगर फेकण्याची हत्यारे, सार्वजनिक शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे, हावभाव करणे अथवा सोंग आणणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, कोणत्याही व्यक्तीची आकृती किंवा प्रतिमेचे प्रदर्शन करणे, सभा घेण्यास, मिरवणूक काढण्यास, पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या परवानगीशिवाय काढण्यात आलेले मोर्चे, रॅली, सभा, ३७ (१) (३) हा आदेश ज्यांना लाठी अगर तत्सम वस्तू घेतल्याशिवाय चालता येत नाही, अशा अपंग व्यक्तींना लागू होणार नाही. तसेच शासनाच्या सेवेतील व्यक्तींना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे, त्यांना लागू होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक