शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

चंद्रपूर जिल्ह्यातील लॉयड्सला लागणार ४८ तासात टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 9:33 AM

सातत्याने प्रदूषण ओकणाऱ्या घुग्घुस येथील लॉयड्स स्टील मेटल्स कंपनीला येत्या ४८ तासात बंद करण्याचा आदेश मुंबईच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी बजावला आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावले आदेश प्रदूषण रोखण्यात व्यवस्थापन अपयशी

राजेश भोजेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सातत्याने प्रदूषण ओकणाऱ्या घुग्घुस येथील लॉयड्स स्टील मेटल्स कंपनीला येत्या ४८ तासात बंद करण्याचा आदेश मुंबईच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी बजावला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषण सोडणाऱ्या कारखान्यांची संख्या मोठी आहे. लॉयड्स स्टील मेटल्स कंपनीला मिळालेल्या बंदच्या आदेशाने प्रदूषण ओकणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील अन्य कंपन्यांना मोठी चपराक बसली आहे.चंद्रपूरपासून २६ कि.मी.वर घुग्घुस येथे हा कारखाना आहे. या कारखान्यात प्रदूषण नियंत्रणासाठी असलेली यंत्रणा निकामी आहे. परिणामी कंपनीद्वारे होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजार जडले असून परिसरातील शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कंपनीद्वारे सोडण्यात येणारे पाणीही घातक असल्याची तक्रार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव व २०१४ मधील चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार महेश मेंढे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र या तक्रारीवर कोणत्याही हालचाली न झाल्याने महेश मेंढे यांनी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडे धाव घेऊन प्रदूषणाची गांभिर्यता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर उपसभापती ठाकरे यांनी चंद्रपूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय कार्यालयाला चौकशीचे आदेश बजावले होते. या चौकशी अहवालात धक्कादायक वास्तव पुढे आले. यानंतर नीरीच्या माध्यमातूनही मोका चौकशी करण्यात आली. हा अहवालही आज दि. ७ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला. यामध्येही कंपनीवर गंभीर ठपका ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तक्रारकर्ते महेश मेंढे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरूच होता. यासोबतच विविध पातळीवर सदर कारखान्याद्वारे होणाऱ्या प्रदूषणाच्या तक्रारीचा आधार घेऊन अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कंपनीला बंद करण्याचे आदेश काढावे लागले.तरच कंपनी सुरू करता येणारबंददरम्यान कंपनी व्यवस्थापनाने प्रदूषण रोखण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या उपायोजना केल्यानंतर कंपनी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर करावा लागणार आहे. त्यानंतर त्याची तपासणी करून कंपनी सुरू करण्याचा परवाना दिला जाणार आहे.‘लोकमत’ने टिपली प्रत्येक घडामोडकंपनीतून होणाऱ्या प्रदूषणाची तक्रार झाल्यानंतर शासन व प्रशासनाच्या पातळीवर झालेल्या प्रत्येक घडामोडींची माहिती ‘लोकमत’ने सर्वप्रथम वाचकांपर्यंत पोहचविली हे विशेष.लॉयड्स कंपनीच्या राक्षसी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. शेतातील कापूस काळा पडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. मात्र त्यांनी गांभिर्याने न घेतल्याने विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी ही तक्रार अतिशय गांभिर्याने घेतल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणाने अखेर कंपनीला ४८ तासात बंद करण्याचे आदेश बजावले आहे. प्रदूषणावरुन एखाद्या कंपनीला बंद करण्याची पाळी येत असेल, तर अन्य कंपन्यांनीही यापासून धडा घेण्याची गरज आहे.- महेश मेंढे, तक्रारकर्ते व सचिव चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटी, चंद्रपूर.

टॅग्स :pollutionप्रदूषणGovernmentसरकार