शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

कुसुंबीच्या आदिवासींचे न्यायासाठी आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 00:45 IST

कुसुंबी येथील १४ आदिवासी शेतकऱ्यांची शेतजमीन माणिकगड सिमेंट प्रकल्पाने २०१२-१३ मध्ये बळकावल्याचा आरोप केला आहे. कंपनीने या मोबदल्यात आदिवासींना आर्थिक मदत केली नाही. सोबतच कुटुंबातील सदस्यांना नोकरीसुद्धा दिली नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला. परंतु, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देप्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप : आजारी महादेव कुळमेथे खाटेवर

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी वसलेल्या कुसुंबी गावातील १४ आदिवासी शेतकऱ्यांची शेतजमीन माणिकगड सिमेंट प्रकल्पाने हडप केल्याचा आरोप असून, मागील ७ ते ८ वर्षांपासून आदिवासी बांधव न्याय हक्कासाठी लढा देत आहे. मात्र अजूनपर्यंत प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर कुसुंबीच्या आदिवासींनी तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात महादेव देऊ कुळमेथे हा ६५ वर्षीय आदिवासी खाटेवर झोपून ‘भीक द्या भाऊ’ म्हणत प्रशासनाचे लक्ष वेधून घेत आहे.कुसुंबी येथील १४ आदिवासी शेतकऱ्यांची शेतजमीन माणिकगड सिमेंट प्रकल्पाने २०१२-१३ मध्ये बळकावल्याचा आरोप केला आहे. कंपनीने या मोबदल्यात आदिवासींना आर्थिक मदत केली नाही. सोबतच कुटुंबातील सदस्यांना नोकरीसुद्धा दिली नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला. परंतु, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे. कंपनी व्यवस्थापनाने नियमबाह्य पद्धतीने रस्ता अडविल्याने शेतकऱ्यांना ये-जा करताना अनेक समस्येला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, कंपनीने बळजबरीने शेतीवर कब्जा करून फसवणूक केली असतानाही गुन्हे मात्र, आदिवासींवर दाखल करण्यात येत असल्याने त्यांच्यात कमालीचा असंतोष पसरला आहे. या आंदोलनात ६५ वर्षीय महादेव कुळमेथे हा आदिवासी आजारी असतानाही सहभागी झाला आहे. त्यांची ४१८ आराजी ८ एकर शेती कंपनीने हडप केल्याचा आरोप आहे. शेती नसल्याने व रोजगाराअभावी त्यांच्यावर उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांची तब्बेत आणखीच खालावली आहे. हा आदिवासी खाटेवर झोपून भिक द्या भाऊ, म्हणत न्याय मागत आहे. या आंदोलनात ४० ते ५० पीडित आदिवासी शेतकरी व महिलासुद्धा सहभागी झाल्या आहेत. आंदोलनकर्ते भाऊराव कन्नाके, जंगू पेंदोर, काळाशी सिडाम, मारोती तलांडे, झाडू सिडाम, नैताम कुळमेथे, गणेश सिडाम आदींनी माणिकगड सिमेंट व्यवस्थापनावर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासोबतच एकरी २५ लाख रुपये मोबदला व एकाला नोकरी देण्याची मागणी केली आहे. जनसत्याग्रहचे आबिद अली यांनी मागण्या न्याय असून, प्रशासन आदिवासींवर अन्याय करीत असल्याचा आरोप केला आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीStrikeसंप