शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

कुसुंबीच्या आदिवासींचे न्यायासाठी आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 00:45 IST

कुसुंबी येथील १४ आदिवासी शेतकऱ्यांची शेतजमीन माणिकगड सिमेंट प्रकल्पाने २०१२-१३ मध्ये बळकावल्याचा आरोप केला आहे. कंपनीने या मोबदल्यात आदिवासींना आर्थिक मदत केली नाही. सोबतच कुटुंबातील सदस्यांना नोकरीसुद्धा दिली नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला. परंतु, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देप्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप : आजारी महादेव कुळमेथे खाटेवर

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी वसलेल्या कुसुंबी गावातील १४ आदिवासी शेतकऱ्यांची शेतजमीन माणिकगड सिमेंट प्रकल्पाने हडप केल्याचा आरोप असून, मागील ७ ते ८ वर्षांपासून आदिवासी बांधव न्याय हक्कासाठी लढा देत आहे. मात्र अजूनपर्यंत प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर कुसुंबीच्या आदिवासींनी तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात महादेव देऊ कुळमेथे हा ६५ वर्षीय आदिवासी खाटेवर झोपून ‘भीक द्या भाऊ’ म्हणत प्रशासनाचे लक्ष वेधून घेत आहे.कुसुंबी येथील १४ आदिवासी शेतकऱ्यांची शेतजमीन माणिकगड सिमेंट प्रकल्पाने २०१२-१३ मध्ये बळकावल्याचा आरोप केला आहे. कंपनीने या मोबदल्यात आदिवासींना आर्थिक मदत केली नाही. सोबतच कुटुंबातील सदस्यांना नोकरीसुद्धा दिली नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला. परंतु, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे. कंपनी व्यवस्थापनाने नियमबाह्य पद्धतीने रस्ता अडविल्याने शेतकऱ्यांना ये-जा करताना अनेक समस्येला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, कंपनीने बळजबरीने शेतीवर कब्जा करून फसवणूक केली असतानाही गुन्हे मात्र, आदिवासींवर दाखल करण्यात येत असल्याने त्यांच्यात कमालीचा असंतोष पसरला आहे. या आंदोलनात ६५ वर्षीय महादेव कुळमेथे हा आदिवासी आजारी असतानाही सहभागी झाला आहे. त्यांची ४१८ आराजी ८ एकर शेती कंपनीने हडप केल्याचा आरोप आहे. शेती नसल्याने व रोजगाराअभावी त्यांच्यावर उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांची तब्बेत आणखीच खालावली आहे. हा आदिवासी खाटेवर झोपून भिक द्या भाऊ, म्हणत न्याय मागत आहे. या आंदोलनात ४० ते ५० पीडित आदिवासी शेतकरी व महिलासुद्धा सहभागी झाल्या आहेत. आंदोलनकर्ते भाऊराव कन्नाके, जंगू पेंदोर, काळाशी सिडाम, मारोती तलांडे, झाडू सिडाम, नैताम कुळमेथे, गणेश सिडाम आदींनी माणिकगड सिमेंट व्यवस्थापनावर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासोबतच एकरी २५ लाख रुपये मोबदला व एकाला नोकरी देण्याची मागणी केली आहे. जनसत्याग्रहचे आबिद अली यांनी मागण्या न्याय असून, प्रशासन आदिवासींवर अन्याय करीत असल्याचा आरोप केला आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीStrikeसंप