जातकारणाच्या बढाया मारणारेच पडले तोंडघशी ..!

By Admin | Updated: May 24, 2014 23:30 IST2014-05-24T23:30:48+5:302014-05-24T23:30:48+5:30

प्राचीन काळापासून देशात ‘जात’ या शब्दाने समाजाची विभागणी केली आहे, तर देशात जाती व विविध समाजांना आरक्षणाची भेट शासनाकडूनही देण्यात आली. विविध जाती-धर्म-पंथांचा समावेश असलेल्या या देशात

The kind of pride of the caste fell face ..! | जातकारणाच्या बढाया मारणारेच पडले तोंडघशी ..!

जातकारणाच्या बढाया मारणारेच पडले तोंडघशी ..!

वेदांत मेहरकुळे - गोंडपिपरी

प्राचीन काळापासून देशात जातया शब्दाने समाजाची विभागणी केली आहे, तर देशात जाती व विविध समाजांना आरक्षणाची भेट शासनाकडूनही देण्यात आली. विविध जाती-धर्म-पंथांचा समावेश असलेल्या या देशात आजवर राजकारणात जातकारणकरण्यात आल्याचे निवडणूक निकालानंतर मतदारांच्या लक्षात आले. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनुकूल परिस्थितीतील जातकारणावर समाजकारण व राजकारण श्रेष्ठ ठरून जातकारणाच्या बढाया मारणार्‍यांना तोंडघशी पडावे लागल्याचे दिसून आले.आपकडून अँड. वामनराव चटप अशा दिग्गजांनी निवडणूक लढविली. यात काँग्रेस व आपउमेदवारांच्या राजकारणात जातकारणाची जोड असल्याने सर्वांनाच त्यांचे पारडे जड वाटत होते, तर अल्पसंख्याक समाजाचे उमेदवार असलेल्या अहीर यांची बाजू बरीच कमजोर वाटत होती. मात्र निवडणूक निकालानंतर मतदारांसह राजकीय वतरुळातील नेत्यांवरही निवडणूक निकालानंतर डोके खाजविण्याची वेळ आली. तसेच ज्या क्षेत्रात उमेदवाराला जातकारणाचा अधिक फायदा होण्याचे संकेत असतानाही मोदी लाटव सत्ता परिवर्तनाची गरज अशा दुहेरी मार्‍यापुढे जातकारणावर मतदारांनी पांघरून घालून भाजपाला भक्कम असा कौल दिल्याने काळ बदलला आता जातकारणाला थारा नाहीअशा प्रतिक्रिया सामान्यांच्या वतरुळातून व्यक्त होत आहे.गुळ तिथे माशाया उक्तीप्रमाणे निवडणुकी पूर्वी जुळलेल्या कार्यकर्त्यांनी जातकारण करणार्‍या उमेदवार व पक्ष पदाधिकार्‍यांना तन-मन-धनाने कार्य करण्याची व छातीला माती लावून उमेदवाराला विजयी करण्याची दिलेली ग्वाही कितपत खरी ठरली, हे मतदार संघातील गावनिहाय मतमोजणीतील प्राप्त मत संख्येवरुनच कळते. आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर लोकसभा निवडणुकीच्या निकालाची छाया पडणार असल्याचे स्पष्ट संकेत दिसत असून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या बड्या पक्षाच्या नेत्यांनी लोकसभेच्या निकालावरुन आत्मचिंतनातून विधानसभा निवडणुकीची रणनिती आखणे गरजेचे असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

चंद्रपूर-वणी-आर्णी या लोकसभा मतदार संघातून भाजपाकडून हंसराज अहीर, काँग्रेसकडून संजय देवतळे व

पक्ष उमेदवारांसोबत केवळ जातकारणातून जुळणार्‍या संधीसाधूंनी निवडणुकीपूर्वी मारलेल्या जातकारणाच्या बढाया चांगल्याच अंगलट आल्या. त्यामुळे त्यांच्यावर चांगलेच तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. केवळ स्वार्थ साधण्याच्या हेतूने

बढाईखोर कार्यकर्त्यांना बाजुला सारणे हे तेवढेच गरजेचे असून कार्यकर्त्यांचे राजकीय अस्तित्व व लोकांमधील त्यांची प्रतिष्ठा याची खात्री करूनच त्यावर विश्‍वास ठेवण्याची गरज आता संभाव्य उमेदवारांना आहे.

Web Title: The kind of pride of the caste fell face ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.