शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
3
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
5
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
6
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
7
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
8
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
9
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
10
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
11
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
12
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
13
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
14
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
15
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
16
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
17
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
18
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
19
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
20
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता

खरिपाचा पेरा पावणेपाच लाख हेक्टरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 23:19 IST

खरीप हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन पूर्ण केले आहे. कृषी विभागाच्या सर्व्हेक्षण व आकडेवारीनुसार यंदा चार लाख ७९ हजार ५०० हेक्टरवर खरिप पिकाची लागवड केली जाणार आहे. यात सर्वाधिक एक लाख ९७ हजार हेक्टरवर कापसाचा पेरा असणार आहे.

ठळक मुद्देसोयाबीन घटणार : कृषी विभागाच्या मते कापसाचा पेरा सर्वाधिक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन पूर्ण केले आहे. कृषी विभागाच्या सर्व्हेक्षण व आकडेवारीनुसार यंदा चार लाख ७९ हजार ५०० हेक्टरवर खरिप पिकाची लागवड केली जाणार आहे. यात सर्वाधिक एक लाख ९७ हजार हेक्टरवर कापसाचा पेरा असणार आहे.जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू झाली आहे. कृषी विभागही यासाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. शेतकऱ्यांना निसर्गाच्या जलचक्रावर अवलंबून राहावे लागते. गतवर्षी शेतकºयांनी सोयाबीनचा पेरा कमी करून कापसाला प्राधान्य दिले. अल्पपावसामुळे भात पिकाला मोठा फटका बसला. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली आदी धान पट्टयातील अनेक भागात सिंचनाची सुविधाच नसल्यामुळे व निसर्गाच्या जलचक्राने दगा दिल्याने भात पिकांचा हंगाम शेतकºयांच्या हातातून गेला होता. अशातच कापसाचे पीक जोमात असताना बोंड अळीच्या आक्रमणाने शेतकºयावर अरिष्ट ओढावले होते.शेतकºयांना कधी सुलतानी, तर कधी अस्मानी संकटाचा सामना करावा लागतो. तरीही वर्षभराच्या भाकरीची तरतूद म्हणून शेतकºयांना शेतीच्या मशागतीला लागल्याशिवाय गत्यंतर नाही. जीव एकवटून तो मशागत करतो. परंतु खर्च अधिक व उत्पन्न कमी या चक्रव्यूहातून आजघडीला तरी बळीराजाची सुटका नाही. ग्रामीण अर्थ व्यवस्थेचा डोलारा कृषी व्यवसायावरच अवलंबून आहे. पण निष्ठूर शासन व्यवस्था शेतकºयांच्या पाठीशी खंबीर उभी असल्याचे दिसत नाही.जिल्ह्यात शेतकरी खरीप हंगामात भात, तूर, कापूस, सोयाबीन, मिरची, मूग आदी पिके घेतात. यामध्ये भात व कापसाचे पेरणी क्षेत्र सर्वाधिक आहे. अन्य कडधान्य पिकाचे क्षेत्र जेमतेम आहे. कृषी विभागाने यंदाच्या खरिपासाठीचे सर्व्हेक्षण पूर्ण केले आहे. नियोजनही तयार केले आहे. यात जिल्ह्यात एकूण चार लाख ७९ हजार ५०० हेक्टरवर खरिप पिकांची लागवड केली जाणार आहे.मागील वर्षी कृषी विभागाने आखलेल्या पेरणी क्षेत्रात घट झाली होती. यावेळी पुन्हा कृषी विभागाने पेरणी क्षेत्र वाढविले आहे. शेती व्यवसाय सध्या शेतकºयांना परवडणारा राहिलेला नाही. मात्र शेतीशिवाय पर्याय नसल्याने बळीराजा जीव एकवटून शेतीच्या मशागतीला लागला आहे.नागरणी, वखरणी, शेतात शेणखत टाकणे, कुंपण तयार करणे, अनावश्यक झुडुपे हटविणे आदी कामांना आता वेग आला आहे. उन्हाची पर्वा न करता शेतकरी सकाळी ६ वाजतापासून शेतात व्यस्त असताना दिसून येत आहे.कापूस दोन लाख हेक्टरवरमागील वर्षी कापूस पिकांवर बोंडअळीने आक्रमण केले होते. या अळीने पूर्ण कापूस पीक उद्ध्वस्त केले. उत्पादनात कमालीची घट आली. जे उत्पादन झाले, त्यातही बोंडअळीचा प्रभाव होताच. कापसाची प्रतवारी खराब होऊन कापसाला किंमत मिळाली नाही. त्यामुळे यंदा कापसाचा पेरा घटणार, असे वाटत होते. मात्र कृषी विभागाच्या नियोजनानुसार कापसाचा पेराच यंदा सर्वाधिक असणार आहे. यंदा एक लाख ९७ हजार हेक्टरवर कापसाची लागवड होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.सोयाबीनला पसंती नाहीजिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी लागवड क्षेत्र एक लाख हेक्टर आहे. दोन वर्षांपूर्वी सोयाबीनने शेतकºयांचे मोठे नुकसान केले होते. त्यामुळे मागील वर्षी सोयाबीनचा पेरा चांगलाच घटला. शेतकºयांनी सोयाबीनला पसंती दर्शविली नाही. केवळ ४९ हजार हेक्टरवरच सोयाबीनची लागवड करण्यात आली. त्यामुळे कृषी विभागाने यावेळी ५३ हजार ७०० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा नियोजित केला आहे. मात्र मागील वर्षी बोंडबळीने कापसावर केलेले जोरदार आक्रमण लक्षात घेता कृषी विभागाचे हे नियोजन शेतकरी खोटे ठरवून सोयाबीनची लागवड अधिक प्रमाणात करतील की काय, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.खताची टंचाई नाहीयंदाच्या खरीप हंगामात खताची टंचाई जाणवणार नाही, असे संकेत दिसून येत आहे. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात एकूण २७ हजार २५९ मेट्रीक टन खत प्राप्त झाला आहे. यातील एक हजार १३६ मेट्रीक टन खत विक्रीसाठी असणार आहे आणि एकूण २६ हजार १२३ मेट्रीक टन खताची उपलब्धता कृषी विभागाकडे आहे. त्यामुळे शेतकºयांना केव्हाही खते मिळू शकणार आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी एस.एस. किरवे यांनी लोकमतशी बोलताना दिली.धानाचा पेराही वाढणारसोयाबीनबाबत शेतकरी उदासीन आहेत. कापूस बोंडअळी व चोर बिटी बियाण्यांमुळे अडचणीत आहे. त्यामुळे धानाच्या पेरा यंदा वाढणार, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. जिल्ह्यात एकूण एक लाख ८० हजार १०० हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड कृषी विभागाला अपेक्षित आहे. मागील वर्षी धानावर मावा तुडतुडा रोगाने आक्रमण केले होते. त्यामुळे धानाची उतारी निम्म्यावर आली होती. यात शेतकºयांना जबर फटका बसला. असे असले तरी सिंदेवाही, मूल, नागभीड, ब्रह्मपुरी, सावली या धानपट्टयातील तालुक्यात धानाचीच लागवड केली जाते. कृषी विभागानुसार यंदा ४६ हजार ६०० हेक्टरवर तुरीची लागवड होणार आहे.यावेळी खरिपाचा पेरा चांगलाच असणार आहे. चार लाख ७९ हजार ५०० हेक्टरवर खरीपाची लागवड होईल, असा अंदाज आहे. बियाणे व खतांची टंचाई निर्माण होणार नाही. कृषी विभागाची भरारी पथकेही तयार आहेत.- अण्णासाहेब हसनाबादे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर.