शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
3
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
4
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
5
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
6
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
7
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
8
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
9
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
10
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
11
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
12
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
13
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
14
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
15
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
16
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
17
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
18
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
19
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
20
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती

खरिपाचा पेरा पावणेपाच लाख हेक्टरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 23:19 IST

खरीप हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन पूर्ण केले आहे. कृषी विभागाच्या सर्व्हेक्षण व आकडेवारीनुसार यंदा चार लाख ७९ हजार ५०० हेक्टरवर खरिप पिकाची लागवड केली जाणार आहे. यात सर्वाधिक एक लाख ९७ हजार हेक्टरवर कापसाचा पेरा असणार आहे.

ठळक मुद्देसोयाबीन घटणार : कृषी विभागाच्या मते कापसाचा पेरा सर्वाधिक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन पूर्ण केले आहे. कृषी विभागाच्या सर्व्हेक्षण व आकडेवारीनुसार यंदा चार लाख ७९ हजार ५०० हेक्टरवर खरिप पिकाची लागवड केली जाणार आहे. यात सर्वाधिक एक लाख ९७ हजार हेक्टरवर कापसाचा पेरा असणार आहे.जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू झाली आहे. कृषी विभागही यासाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. शेतकऱ्यांना निसर्गाच्या जलचक्रावर अवलंबून राहावे लागते. गतवर्षी शेतकºयांनी सोयाबीनचा पेरा कमी करून कापसाला प्राधान्य दिले. अल्पपावसामुळे भात पिकाला मोठा फटका बसला. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली आदी धान पट्टयातील अनेक भागात सिंचनाची सुविधाच नसल्यामुळे व निसर्गाच्या जलचक्राने दगा दिल्याने भात पिकांचा हंगाम शेतकºयांच्या हातातून गेला होता. अशातच कापसाचे पीक जोमात असताना बोंड अळीच्या आक्रमणाने शेतकºयावर अरिष्ट ओढावले होते.शेतकºयांना कधी सुलतानी, तर कधी अस्मानी संकटाचा सामना करावा लागतो. तरीही वर्षभराच्या भाकरीची तरतूद म्हणून शेतकºयांना शेतीच्या मशागतीला लागल्याशिवाय गत्यंतर नाही. जीव एकवटून तो मशागत करतो. परंतु खर्च अधिक व उत्पन्न कमी या चक्रव्यूहातून आजघडीला तरी बळीराजाची सुटका नाही. ग्रामीण अर्थ व्यवस्थेचा डोलारा कृषी व्यवसायावरच अवलंबून आहे. पण निष्ठूर शासन व्यवस्था शेतकºयांच्या पाठीशी खंबीर उभी असल्याचे दिसत नाही.जिल्ह्यात शेतकरी खरीप हंगामात भात, तूर, कापूस, सोयाबीन, मिरची, मूग आदी पिके घेतात. यामध्ये भात व कापसाचे पेरणी क्षेत्र सर्वाधिक आहे. अन्य कडधान्य पिकाचे क्षेत्र जेमतेम आहे. कृषी विभागाने यंदाच्या खरिपासाठीचे सर्व्हेक्षण पूर्ण केले आहे. नियोजनही तयार केले आहे. यात जिल्ह्यात एकूण चार लाख ७९ हजार ५०० हेक्टरवर खरिप पिकांची लागवड केली जाणार आहे.मागील वर्षी कृषी विभागाने आखलेल्या पेरणी क्षेत्रात घट झाली होती. यावेळी पुन्हा कृषी विभागाने पेरणी क्षेत्र वाढविले आहे. शेती व्यवसाय सध्या शेतकºयांना परवडणारा राहिलेला नाही. मात्र शेतीशिवाय पर्याय नसल्याने बळीराजा जीव एकवटून शेतीच्या मशागतीला लागला आहे.नागरणी, वखरणी, शेतात शेणखत टाकणे, कुंपण तयार करणे, अनावश्यक झुडुपे हटविणे आदी कामांना आता वेग आला आहे. उन्हाची पर्वा न करता शेतकरी सकाळी ६ वाजतापासून शेतात व्यस्त असताना दिसून येत आहे.कापूस दोन लाख हेक्टरवरमागील वर्षी कापूस पिकांवर बोंडअळीने आक्रमण केले होते. या अळीने पूर्ण कापूस पीक उद्ध्वस्त केले. उत्पादनात कमालीची घट आली. जे उत्पादन झाले, त्यातही बोंडअळीचा प्रभाव होताच. कापसाची प्रतवारी खराब होऊन कापसाला किंमत मिळाली नाही. त्यामुळे यंदा कापसाचा पेरा घटणार, असे वाटत होते. मात्र कृषी विभागाच्या नियोजनानुसार कापसाचा पेराच यंदा सर्वाधिक असणार आहे. यंदा एक लाख ९७ हजार हेक्टरवर कापसाची लागवड होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.सोयाबीनला पसंती नाहीजिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी लागवड क्षेत्र एक लाख हेक्टर आहे. दोन वर्षांपूर्वी सोयाबीनने शेतकºयांचे मोठे नुकसान केले होते. त्यामुळे मागील वर्षी सोयाबीनचा पेरा चांगलाच घटला. शेतकºयांनी सोयाबीनला पसंती दर्शविली नाही. केवळ ४९ हजार हेक्टरवरच सोयाबीनची लागवड करण्यात आली. त्यामुळे कृषी विभागाने यावेळी ५३ हजार ७०० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा नियोजित केला आहे. मात्र मागील वर्षी बोंडबळीने कापसावर केलेले जोरदार आक्रमण लक्षात घेता कृषी विभागाचे हे नियोजन शेतकरी खोटे ठरवून सोयाबीनची लागवड अधिक प्रमाणात करतील की काय, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.खताची टंचाई नाहीयंदाच्या खरीप हंगामात खताची टंचाई जाणवणार नाही, असे संकेत दिसून येत आहे. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात एकूण २७ हजार २५९ मेट्रीक टन खत प्राप्त झाला आहे. यातील एक हजार १३६ मेट्रीक टन खत विक्रीसाठी असणार आहे आणि एकूण २६ हजार १२३ मेट्रीक टन खताची उपलब्धता कृषी विभागाकडे आहे. त्यामुळे शेतकºयांना केव्हाही खते मिळू शकणार आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी एस.एस. किरवे यांनी लोकमतशी बोलताना दिली.धानाचा पेराही वाढणारसोयाबीनबाबत शेतकरी उदासीन आहेत. कापूस बोंडअळी व चोर बिटी बियाण्यांमुळे अडचणीत आहे. त्यामुळे धानाच्या पेरा यंदा वाढणार, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. जिल्ह्यात एकूण एक लाख ८० हजार १०० हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड कृषी विभागाला अपेक्षित आहे. मागील वर्षी धानावर मावा तुडतुडा रोगाने आक्रमण केले होते. त्यामुळे धानाची उतारी निम्म्यावर आली होती. यात शेतकºयांना जबर फटका बसला. असे असले तरी सिंदेवाही, मूल, नागभीड, ब्रह्मपुरी, सावली या धानपट्टयातील तालुक्यात धानाचीच लागवड केली जाते. कृषी विभागानुसार यंदा ४६ हजार ६०० हेक्टरवर तुरीची लागवड होणार आहे.यावेळी खरिपाचा पेरा चांगलाच असणार आहे. चार लाख ७९ हजार ५०० हेक्टरवर खरीपाची लागवड होईल, असा अंदाज आहे. बियाणे व खतांची टंचाई निर्माण होणार नाही. कृषी विभागाची भरारी पथकेही तयार आहेत.- अण्णासाहेब हसनाबादे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर.