लॉकडाऊनमध्ये खरिपाच्या मशागतीला आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST2020-04-27T05:00:00+5:302020-04-27T05:00:58+5:30

दोन महिन्यांपूर्वी परतीच्या पावसाने रब्बी पिकांचे होत्याचे नव्हते केले. दरम्यान, अवकाळी पावसाने तर यावर्षी शेतकºयांचे पुरते कंबरडेच मोडले आहे. या संकटातून सावरत पुन्हा शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. शेताची मशागत करणे, पेरणीसाठी शेत तयार करण्याची लगबग सुरु झाली आहे. जिल्ह्यात कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कपाशीचे पीक घेतल्या जाते.

Kharif cultivation has gained momentum in the lockdown | लॉकडाऊनमध्ये खरिपाच्या मशागतीला आला वेग

लॉकडाऊनमध्ये खरिपाच्या मशागतीला आला वेग

ठळक मुद्देहंगामासाठी धडपड सुरुच: आर्थिक नियोजनासाठी शेतकऱ्यांची कसरत

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: कोरानाच्या सावटातच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या शेती मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. काही शेतकरी पारंपारिक पद्धतीने तर काही ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची नांगरनी, वखरनी करीत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दोन महिन्यांपूर्वी परतीच्या पावसाने रब्बी पिकांचे होत्याचे नव्हते केले. दरम्यान, अवकाळी पावसाने तर यावर्षी शेतकºयांचे पुरते कंबरडेच मोडले आहे. या संकटातून सावरत पुन्हा शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. शेताची मशागत करणे, पेरणीसाठी शेत तयार करण्याची लगबग सुरु झाली आहे. जिल्ह्यात कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कपाशीचे पीक घेतल्या जाते. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे अद्यापही शेतकऱ्यांच्या घरात कापूस भरून आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
खरीप तसेच रब्बी हंगामही तोट्यात गेल्याने यावर्षी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित चुकले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची पुढील हंगामावार सर्व मदार आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामातील शेतीची मशागतीच्या कामाला लागले आहे.

आधुनिक पद्धतीला पसंती
दिवसेंदिवस शेती करणे कठिण झाले आहे. पारंपारिक पद्धतीने शेती केल्यास बैलजोडी,चारा, शेती साहित्य आदी घ्यावे लागते. त्यामुळे आता शेतकरी कमीत कमी त्रासामध्ये शेतकरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आधुनिक पद्धतीचा अवलंब करीत आहे. मात्र प्रत्येक शेतकºयांनाच आधुनिक पद्धतीने शेती करणे शक्य नसल्याने ते कमी पैशामध्ये पारंपारिक पद्धतीनेच शेतीची मशानगत करीत आहे.
लॉकडाऊन, अवकाळीने कंबरडे मोडले
यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा पिछा सोडला नाही. प्रथम खरीप आणि त्यानंतर रब्बीनेही होत्याचे नव्हते झाले. यातून कसेबसे सावरत नाही तोच लॉकडाऊन झाले आणि त्यांना जराशीही हालचाल करता आली नाही. परिणामी पुढील हंगाम कसा करायचा, हा प्रश्न सध्या शेतकºयांना पडला आहे. दुसरीकडे अनेक शेतकºयांना आपल्याकडील पीकविलेले धान्य तसेच कापूसही विकता आला नाही.

Web Title: Kharif cultivation has gained momentum in the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.