शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

केवळ आठ महिन्यात रामनगर ठाण्यात बदलले सहा ठाणेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 05:00 IST

सर्वात मोठे ठाणे तसेच संवेदनशील ठाणे म्हणून रामनगर पोलीस स्टेशनची ओळख आहे. त्यामुळे या ठाण्यामध्ये पूर्णवेळ ठाणेदार असणे नितांत गरजेचे आहे. मात्र फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाश हाके यांची बदली झाल्यानंतर येथे रुजू होणारे एकही ठाणेदार तीन महिन्याच्या वर टिकले नाही. हाके यांच्यानंतर रामनगरची धुरा फेब्रुवारी २०२१ मध्ये रोशन यादव यांच्याकडे देण्यात आली. मात्र मे महिन्यात त्यांची ब्रह्मपुरी येथे बदली करून कमलेश जयस्वाल यांच्याकडे सूत्रे देण्यात आली.

परिमल डोहणे लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात सर्वात मोठे ठाणे म्हणून ओळख असलेल्या रामनगर ठाण्यात नव्याने रुजू झालेल्या ठाणेदाराला गुन्हेगारांची ओळखपरेड होण्यापूर्वीच बदली करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मागील आठ महिन्यांचा विचार केल्यास आठ महिन्यात रामनगर ठाण्यात चक्क सहा ठाणेदारांची बदली झाल्याचे वास्तव आहे. त्यामुळे गुन्हेगारीचा आलेख कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे दिसून येते. चंद्रपूर उपविभागांतर्गत चंद्रपूर शहर, रामनगर, घुग्घुस, दुर्गापूर, पडोली हे पोलीस स्टेशन येतात. यापैकी सर्वात मोठे ठाणे तसेच संवेदनशील ठाणे म्हणून रामनगर पोलीस स्टेशनची ओळख आहे. त्यामुळे या ठाण्यामध्ये पूर्णवेळ ठाणेदार असणे नितांत गरजेचे आहे. मात्र फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाश हाके यांची बदली झाल्यानंतर येथे रुजू होणारे एकही ठाणेदार तीन महिन्याच्या वर टिकले नाही. हाके यांच्यानंतर रामनगरची धुरा फेब्रुवारी २०२१ मध्ये रोशन यादव यांच्याकडे देण्यात आली. मात्र मे महिन्यात त्यांची ब्रह्मपुरी येथे बदली करून कमलेश जयस्वाल यांच्याकडे सूत्रे देण्यात आली. एक महिन्यातच जयस्वाल यांच्याकडून पदभार काढून त्यांना सायबर सेलमध्ये पाठवून प्रदीप शेवाळे यांच्याकडे धुरा सोपविण्यात आली. परंतु, शेवाळेही यांना दीड महिन्याचा कालावधी होताच त्याची सावली तालुक्यातील पाथरी येथे बदली करून मधुकर गीते यांची नेमणूक करण्यात आली. गीते यांनी साडेतीन महिने कारभार सांभाळल्यानंतर त्यांची बढती नागपूर येथील लाचलुचपत विभागात करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या जागी राजेश मुळे यांची नियुक्ती करण्यात आली  आहे. मात्र संवेदनशील ठाणे म्हणून ओळख असलेल्या ठाण्यात  ठाणेदार बदलत असल्याने गुन्हेगारी वाढत आहे.

ठाण्यात २५ च्यावर अधिकाऱ्यांची गरजचंद्रपूर उपविभागातील सर्वात मोठे ठाणे म्हणून रामनगरची ओळख आहे. तसेच हा संवेदनशील ठाणा म्हणून ओळखल्या जातो. सर्व शासकीय कार्यालय, रेल्वे स्टेशन, बसस्थानक याच ठाण्याच्या हद्दीत येतात. मंत्र्यांचे दौरे, बंदोबस्त आदी कामात पोलीस गुंतले असतात. या ठाण्यात २५ च्या जवळपास अधिकाऱ्यांची गरज असताना केवळ ८ ते १० अधिकारी कार्यरत असतात. त्यातही दोन ते तीन प्रोबिशनल पिरेडवर असल्याने उर्वरीत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडतो. त्यामुळे या ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. 

 ‘ते’ कर्मचारी वर्षानुवर्षे रामनगर ठाण्यातच- सर्वसाधारपणे एका ठाण्यात ठाणेदार दोन ते अडीच वर्षांचा कार्यकाळ काढत असताना दिसून येतात. परंतु, मागील काही महिन्यात रामनगर ठाण्यातील चित्र बघितले असता केवळ दोन ते तीन महिन्यातच ठाणेदारांची बदली झाली आहे. परंतु, येथील काही कॉन्स्टेबल वर्षानुवर्षे याच ठाण्यात काम करताना दिसून येतात. तसेच येणाऱ्या प्रत्येक ठाणेदारांच्या जवळचे व विश्वासातले म्हणून त्यांची ओळख पसरत आहे. ठाणेदार दोन महिन्याला एक बदलत असताना तो कॉन्स्टेबल तेथेच कार्यरत दिसून येतो हे न उलगडणारे कोडेच आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे