शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

केवळ आठ महिन्यात रामनगर ठाण्यात बदलले सहा ठाणेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 05:00 IST

सर्वात मोठे ठाणे तसेच संवेदनशील ठाणे म्हणून रामनगर पोलीस स्टेशनची ओळख आहे. त्यामुळे या ठाण्यामध्ये पूर्णवेळ ठाणेदार असणे नितांत गरजेचे आहे. मात्र फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाश हाके यांची बदली झाल्यानंतर येथे रुजू होणारे एकही ठाणेदार तीन महिन्याच्या वर टिकले नाही. हाके यांच्यानंतर रामनगरची धुरा फेब्रुवारी २०२१ मध्ये रोशन यादव यांच्याकडे देण्यात आली. मात्र मे महिन्यात त्यांची ब्रह्मपुरी येथे बदली करून कमलेश जयस्वाल यांच्याकडे सूत्रे देण्यात आली.

परिमल डोहणे लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात सर्वात मोठे ठाणे म्हणून ओळख असलेल्या रामनगर ठाण्यात नव्याने रुजू झालेल्या ठाणेदाराला गुन्हेगारांची ओळखपरेड होण्यापूर्वीच बदली करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मागील आठ महिन्यांचा विचार केल्यास आठ महिन्यात रामनगर ठाण्यात चक्क सहा ठाणेदारांची बदली झाल्याचे वास्तव आहे. त्यामुळे गुन्हेगारीचा आलेख कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे दिसून येते. चंद्रपूर उपविभागांतर्गत चंद्रपूर शहर, रामनगर, घुग्घुस, दुर्गापूर, पडोली हे पोलीस स्टेशन येतात. यापैकी सर्वात मोठे ठाणे तसेच संवेदनशील ठाणे म्हणून रामनगर पोलीस स्टेशनची ओळख आहे. त्यामुळे या ठाण्यामध्ये पूर्णवेळ ठाणेदार असणे नितांत गरजेचे आहे. मात्र फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाश हाके यांची बदली झाल्यानंतर येथे रुजू होणारे एकही ठाणेदार तीन महिन्याच्या वर टिकले नाही. हाके यांच्यानंतर रामनगरची धुरा फेब्रुवारी २०२१ मध्ये रोशन यादव यांच्याकडे देण्यात आली. मात्र मे महिन्यात त्यांची ब्रह्मपुरी येथे बदली करून कमलेश जयस्वाल यांच्याकडे सूत्रे देण्यात आली. एक महिन्यातच जयस्वाल यांच्याकडून पदभार काढून त्यांना सायबर सेलमध्ये पाठवून प्रदीप शेवाळे यांच्याकडे धुरा सोपविण्यात आली. परंतु, शेवाळेही यांना दीड महिन्याचा कालावधी होताच त्याची सावली तालुक्यातील पाथरी येथे बदली करून मधुकर गीते यांची नेमणूक करण्यात आली. गीते यांनी साडेतीन महिने कारभार सांभाळल्यानंतर त्यांची बढती नागपूर येथील लाचलुचपत विभागात करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या जागी राजेश मुळे यांची नियुक्ती करण्यात आली  आहे. मात्र संवेदनशील ठाणे म्हणून ओळख असलेल्या ठाण्यात  ठाणेदार बदलत असल्याने गुन्हेगारी वाढत आहे.

ठाण्यात २५ च्यावर अधिकाऱ्यांची गरजचंद्रपूर उपविभागातील सर्वात मोठे ठाणे म्हणून रामनगरची ओळख आहे. तसेच हा संवेदनशील ठाणा म्हणून ओळखल्या जातो. सर्व शासकीय कार्यालय, रेल्वे स्टेशन, बसस्थानक याच ठाण्याच्या हद्दीत येतात. मंत्र्यांचे दौरे, बंदोबस्त आदी कामात पोलीस गुंतले असतात. या ठाण्यात २५ च्या जवळपास अधिकाऱ्यांची गरज असताना केवळ ८ ते १० अधिकारी कार्यरत असतात. त्यातही दोन ते तीन प्रोबिशनल पिरेडवर असल्याने उर्वरीत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडतो. त्यामुळे या ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. 

 ‘ते’ कर्मचारी वर्षानुवर्षे रामनगर ठाण्यातच- सर्वसाधारपणे एका ठाण्यात ठाणेदार दोन ते अडीच वर्षांचा कार्यकाळ काढत असताना दिसून येतात. परंतु, मागील काही महिन्यात रामनगर ठाण्यातील चित्र बघितले असता केवळ दोन ते तीन महिन्यातच ठाणेदारांची बदली झाली आहे. परंतु, येथील काही कॉन्स्टेबल वर्षानुवर्षे याच ठाण्यात काम करताना दिसून येतात. तसेच येणाऱ्या प्रत्येक ठाणेदारांच्या जवळचे व विश्वासातले म्हणून त्यांची ओळख पसरत आहे. ठाणेदार दोन महिन्याला एक बदलत असताना तो कॉन्स्टेबल तेथेच कार्यरत दिसून येतो हे न उलगडणारे कोडेच आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे