शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
3
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
4
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
5
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
6
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
7
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
8
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
9
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
10
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
11
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
12
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
13
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
14
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
15
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
16
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
17
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
18
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

केवळ आठ महिन्यात रामनगर ठाण्यात बदलले सहा ठाणेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 05:00 IST

सर्वात मोठे ठाणे तसेच संवेदनशील ठाणे म्हणून रामनगर पोलीस स्टेशनची ओळख आहे. त्यामुळे या ठाण्यामध्ये पूर्णवेळ ठाणेदार असणे नितांत गरजेचे आहे. मात्र फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाश हाके यांची बदली झाल्यानंतर येथे रुजू होणारे एकही ठाणेदार तीन महिन्याच्या वर टिकले नाही. हाके यांच्यानंतर रामनगरची धुरा फेब्रुवारी २०२१ मध्ये रोशन यादव यांच्याकडे देण्यात आली. मात्र मे महिन्यात त्यांची ब्रह्मपुरी येथे बदली करून कमलेश जयस्वाल यांच्याकडे सूत्रे देण्यात आली.

परिमल डोहणे लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात सर्वात मोठे ठाणे म्हणून ओळख असलेल्या रामनगर ठाण्यात नव्याने रुजू झालेल्या ठाणेदाराला गुन्हेगारांची ओळखपरेड होण्यापूर्वीच बदली करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मागील आठ महिन्यांचा विचार केल्यास आठ महिन्यात रामनगर ठाण्यात चक्क सहा ठाणेदारांची बदली झाल्याचे वास्तव आहे. त्यामुळे गुन्हेगारीचा आलेख कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे दिसून येते. चंद्रपूर उपविभागांतर्गत चंद्रपूर शहर, रामनगर, घुग्घुस, दुर्गापूर, पडोली हे पोलीस स्टेशन येतात. यापैकी सर्वात मोठे ठाणे तसेच संवेदनशील ठाणे म्हणून रामनगर पोलीस स्टेशनची ओळख आहे. त्यामुळे या ठाण्यामध्ये पूर्णवेळ ठाणेदार असणे नितांत गरजेचे आहे. मात्र फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाश हाके यांची बदली झाल्यानंतर येथे रुजू होणारे एकही ठाणेदार तीन महिन्याच्या वर टिकले नाही. हाके यांच्यानंतर रामनगरची धुरा फेब्रुवारी २०२१ मध्ये रोशन यादव यांच्याकडे देण्यात आली. मात्र मे महिन्यात त्यांची ब्रह्मपुरी येथे बदली करून कमलेश जयस्वाल यांच्याकडे सूत्रे देण्यात आली. एक महिन्यातच जयस्वाल यांच्याकडून पदभार काढून त्यांना सायबर सेलमध्ये पाठवून प्रदीप शेवाळे यांच्याकडे धुरा सोपविण्यात आली. परंतु, शेवाळेही यांना दीड महिन्याचा कालावधी होताच त्याची सावली तालुक्यातील पाथरी येथे बदली करून मधुकर गीते यांची नेमणूक करण्यात आली. गीते यांनी साडेतीन महिने कारभार सांभाळल्यानंतर त्यांची बढती नागपूर येथील लाचलुचपत विभागात करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या जागी राजेश मुळे यांची नियुक्ती करण्यात आली  आहे. मात्र संवेदनशील ठाणे म्हणून ओळख असलेल्या ठाण्यात  ठाणेदार बदलत असल्याने गुन्हेगारी वाढत आहे.

ठाण्यात २५ च्यावर अधिकाऱ्यांची गरजचंद्रपूर उपविभागातील सर्वात मोठे ठाणे म्हणून रामनगरची ओळख आहे. तसेच हा संवेदनशील ठाणा म्हणून ओळखल्या जातो. सर्व शासकीय कार्यालय, रेल्वे स्टेशन, बसस्थानक याच ठाण्याच्या हद्दीत येतात. मंत्र्यांचे दौरे, बंदोबस्त आदी कामात पोलीस गुंतले असतात. या ठाण्यात २५ च्या जवळपास अधिकाऱ्यांची गरज असताना केवळ ८ ते १० अधिकारी कार्यरत असतात. त्यातही दोन ते तीन प्रोबिशनल पिरेडवर असल्याने उर्वरीत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडतो. त्यामुळे या ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. 

 ‘ते’ कर्मचारी वर्षानुवर्षे रामनगर ठाण्यातच- सर्वसाधारपणे एका ठाण्यात ठाणेदार दोन ते अडीच वर्षांचा कार्यकाळ काढत असताना दिसून येतात. परंतु, मागील काही महिन्यात रामनगर ठाण्यातील चित्र बघितले असता केवळ दोन ते तीन महिन्यातच ठाणेदारांची बदली झाली आहे. परंतु, येथील काही कॉन्स्टेबल वर्षानुवर्षे याच ठाण्यात काम करताना दिसून येतात. तसेच येणाऱ्या प्रत्येक ठाणेदारांच्या जवळचे व विश्वासातले म्हणून त्यांची ओळख पसरत आहे. ठाणेदार दोन महिन्याला एक बदलत असताना तो कॉन्स्टेबल तेथेच कार्यरत दिसून येतो हे न उलगडणारे कोडेच आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे