शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

कापसामुळे शेतकऱ्यांना सुटताहे खाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:22 PM

कापसाचे दर वाढेल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला आहे.

ठळक मुद्देबोंडअळी कारणीभूत : शेतकऱ्यांची रुग्णालयात धाव

आॅनलाईन लोकमतगोवरी : कापसाचे दर वाढेल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला आहे. बोंडअळीने कापूस पुर्णत: खराब झाला असून कापसाला लहान-लहान किड्यांनी वेढले आहे. त्यामुळे कापसाला हात लावल्यास मोठ्या प्रमाणात खाज सुटत असून त्वचेवर लालसर ठिपके पडत आहे. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागली.यावर्षी बोंडअळीने कापसाला खाऊन टाकल्यानंतर कापसावर किड्यांनी मोठ्या प्रमाणात आक्रमण केले आहे. यावर्षी कापसाला बऱ्यापैकी भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कापूस घरीच असल्याने आता कापसाला हात लावल्यास खाज सुटत आहे. याचा विपरित परिणाम शेतकºयांच्या शरिरावर व्हायला लागला आहे. कापसामुळे हातापायांवर, पाठीवर, पोटावर मोठ्या प्रमाणात खाज येत आहे.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खासगी दवाखान्यात उपचार घेतला आहे. गोवरी, पोवनी, चिंचोली व बहुतांश परिसरातील शेतकऱ्यांच्या घरी हीच परिस्थिती उद्भवली असून शेतकºयांना कापसाच्या खाजेने बेजार केले आहे.ज्यांच्या घरी कापूस, त्यांनाच होतेय अ‍ॅलर्जीकापूस ज्या शेतकऱ्यांच्या घरी भरून आहे, त्याच शेतकऱ्यांच्या घरातील सर्व सदस्यांना अंगावर खाज येण्याचा त्रास होत आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने काही शेतकºयांच्या घरी भेट दिल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. अनेक शेतकऱ्यांनी राजुरा येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू केला आहे.भीतीपोटी कवडीमोल भावात विक्रीकापसामुळे मोठ्या प्रमाणात खाज सुटत असल्याने शेतकऱ्यांनी त्वचेच्या आजाराच्या भीतीपोटी कवडीमोल भावात कापसाची विक्री करायला सुरूवात केली आहे. कोणत्याही आजाराला बळी पडण्यापेक्षा कापूस विकलेला बरा, अशी प्रतिक्रिया शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.कापसाला दर नसल्याने कापूस घरीच भरून ठेवला होता. मात्र कापसाला मोठ्या प्रमाणात खाज असल्याने शरीरावर त्याचा विपरित परिणाम होऊ लागला आहे. नाईलाजाने कापूस विकावा लागला.- सुधाकर जुनघरी,शेतकरी, गोवरी.