शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

तातडीने पंचनामे करा अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

यंदाच्या खरीप हंगामात सुरूवातीला पावसाने दगा दिला होता. परंतु नंतरच्या कालावधीत पावसाने सरासरी गाठल्याने पिकांना जीवदान मिळाले. शेतात धान डोलू लागले. दिवाळीपूर्वी कमी कालावधीच्या धानाची कापणी करण्यात आली. पुंजणे तयार करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो. याच सुमारास पाऊस झाल्याने कडपा भिजल्या. जड धान अजूनही शेतात उभे आहे.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: अवकाळी पावसामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारीसह विविध पिके संकटात सापडले. सरकारने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित असताना अद्याप पंचनामे सुरू करण्यात आले नाही. परतीच्या पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व आधार देण्याचे सोडून हे सरकार फक्त सतेच्या खुर्चीसाठी दंग आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.यंदाच्या खरीप हंगामात सुरूवातीला पावसाने दगा दिला होता. परंतु नंतरच्या कालावधीत पावसाने सरासरी गाठल्याने पिकांना जीवदान मिळाले. शेतात धान डोलू लागले. दिवाळीपूर्वी कमी कालावधीच्या धानाची कापणी करण्यात आली. पुंजणे तयार करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो. याच सुमारास पाऊस झाल्याने कडपा भिजल्या. जड धान अजूनही शेतात उभे आहे.२९ ऑक्टोबर रोजी झालेल्या परतीच्या पावसामुळे धान पीक आडवे पडून नष्ट होत आहे. दरवर्षी दुष्काळाचा सामना करणाºया शेतकऱ्यांना अधिक पीक येणार असल्याने धीर आला होता. परंतु, अवकाळी व परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा धीर खचू लागला आहे.धान, सोयाबीन, कापूस, ज्वारीसह अनेक पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. शेतकरी संकटात सापडला असून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. मात्र, सरकारच्या वतीने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत न देता वाऱ्यावर सोडत आहे. अवकाळी पावसामुळे विदर्भासह राज्यातील खरीप हंगामातील सर्व पिके नष्ट होत असल्याने तातडीने पंचनामे करणे आवश्यक होते. प्रशासनातील अनेक अधिकारी व कर्मचारी दिवाळीनिमित्त सुट्टीवर असल्याने पंचनामे कोण करणार, असा प्रश्नही आमदार वडेट्टीवार यांनी विचारला आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार