शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

तातडीने पंचनामे करा अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

यंदाच्या खरीप हंगामात सुरूवातीला पावसाने दगा दिला होता. परंतु नंतरच्या कालावधीत पावसाने सरासरी गाठल्याने पिकांना जीवदान मिळाले. शेतात धान डोलू लागले. दिवाळीपूर्वी कमी कालावधीच्या धानाची कापणी करण्यात आली. पुंजणे तयार करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो. याच सुमारास पाऊस झाल्याने कडपा भिजल्या. जड धान अजूनही शेतात उभे आहे.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: अवकाळी पावसामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारीसह विविध पिके संकटात सापडले. सरकारने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित असताना अद्याप पंचनामे सुरू करण्यात आले नाही. परतीच्या पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व आधार देण्याचे सोडून हे सरकार फक्त सतेच्या खुर्चीसाठी दंग आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.यंदाच्या खरीप हंगामात सुरूवातीला पावसाने दगा दिला होता. परंतु नंतरच्या कालावधीत पावसाने सरासरी गाठल्याने पिकांना जीवदान मिळाले. शेतात धान डोलू लागले. दिवाळीपूर्वी कमी कालावधीच्या धानाची कापणी करण्यात आली. पुंजणे तयार करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो. याच सुमारास पाऊस झाल्याने कडपा भिजल्या. जड धान अजूनही शेतात उभे आहे.२९ ऑक्टोबर रोजी झालेल्या परतीच्या पावसामुळे धान पीक आडवे पडून नष्ट होत आहे. दरवर्षी दुष्काळाचा सामना करणाºया शेतकऱ्यांना अधिक पीक येणार असल्याने धीर आला होता. परंतु, अवकाळी व परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा धीर खचू लागला आहे.धान, सोयाबीन, कापूस, ज्वारीसह अनेक पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. शेतकरी संकटात सापडला असून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. मात्र, सरकारच्या वतीने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत न देता वाऱ्यावर सोडत आहे. अवकाळी पावसामुळे विदर्भासह राज्यातील खरीप हंगामातील सर्व पिके नष्ट होत असल्याने तातडीने पंचनामे करणे आवश्यक होते. प्रशासनातील अनेक अधिकारी व कर्मचारी दिवाळीनिमित्त सुट्टीवर असल्याने पंचनामे कोण करणार, असा प्रश्नही आमदार वडेट्टीवार यांनी विचारला आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार