शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तुम्हालाही तिरळेपणा असेल तर असा करावा उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 14:52 IST

Chandrapur : लहान मुलांचं मोबाइल, टी. व्ही. जवळून पाहणं आजच करा बंद

परिमल डोहणे चंद्रपूर : दोन्ही डोळे समांतर कक्षात न राहण्याच्या दोषास तिरळेपणा म्हणतात. यामध्ये एक डोळा वरच्या दिशेने, खालच्या दिशेने, आतील किंवा बाहेरच्या दिशेने वळू शकतो. कुणाला जन्मजात तर कुणाला दृष्टीत अडथळा आल्याने ही समस्या उ‌द्भवते. परंतु, यावर वेळीच व योग्य उपचार तिरळेपणा दूर होऊ शकतो, असा सल्ला चंद्रपुरातील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. गुंजन इंगळे, कांबळे यांनी दिला आहे.

ग्रामीण भागात पाळण्यातील खेळण्याकडे बघून तिरळेपणा होतो, अशक्तपणामुळे तिरळेपणा होतो, दुसऱ्या तिरळ्या मुलाची नक्कल केल्याने तिरळेपणा होतो, अशा चुकीच्या कल्पना आहेत. गर्भधारणेदरम्यान झालेल्या काही व्यंगामुळे जन्मजात तिरळेपणा होण्याची शक्यता असते. त्यामुळे लहानपणातच जर तिरळेपणावर उपचार केल्यास योग्य वेळेत उपचार होत असतो. परंतु, त्याला विलंब लावल्यास वय वाढत गेल्यास ही समस्या वाढण्याची शक्यता असते. शस्त्रक्रियेने ही समस्या दूर होत असते. त्यामुळे अशा रुग्णांनी वेळीच तज्ज्ञांकडून उपचार घेणे गरजेचे आहे.

तिरळेपणाची लक्षणे

  • एक किंवा दोन्ही डोळे वेगवेगळ्या दिशेने पाहणे, दोन प्रतिमा दिसणे.
  • दृष्टिदोष : दृष्टिदोष असल्यास लहान वयात मुलं टीव्ही, मोबाइल, पुस्तक अगदी जवळून बघतात. मोठ्या मुलांना शाळेत मागील बाकावरून फळ्यावरचे दिसत नाही.
  • तीव्र प्रकाशाकडे बघताना तिरळेपणा असणारी मुले तिरळा डोळा हाताने झाकून घेतात. डोळ्यात पांढरी टीक दिसणे.

असा करावा उपचार

  • दृष्टिदोषामुळे तिरळेपणा असल्यास योग्य वयात चष्मा लावणे गरजेचे आहे.
  • डोळ्याचा व्यायाम : यात जो सामान्य डोळा आहे त्याला पट्टी करावी लागते आणि जो डोळा तिरळा (आळशी) झालेला आहे त्याची नजर वाढवता येते.
  • तिरळेपणावर शस्त्रक्रिया : 3 शस्त्रक्रिया ही लवकरात लवकर करणे गरजेचे राहते. प्रथम शस्त्रक्रिया झाल्यानंतर ८० टक्के तिरळेपणा दूर होतो. उर्वरित २० टक्के तिरळेपणा दूर करण्यासाठी कधी कधी २-३ शस्त्रक्रिया कराव्या लागू शकतात

 

तिरळेपणाची कारणेअनुवंशिकता, मोठ्या नंबरचा चष्मा असणे, असंतुलित स्नायूशक्ती, डोळ्यांचे आजार जसे मोतीबिंदू, बुबुळावरील व्रण, आंतर पटलाचे रोग, डोळ्यामध्ये गाठ असणे.

"तिरळेपणाबाबत अनेक चुकीचे गैरसमज आहेत. परंतु, तिरळेपणावर वेळीच उपचार झाला नाही, तर उपचार करणे कठीण होते. परिणामी कायमची दृष्टी जाऊ शकते. तिरळेपणावर वेळीच उपाय केल्याने दृष्टिहीनता व तिरळेपणावर मात करता येऊ शकते. त्यामुळे लक्षणे दिसताच नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा."- डॉ. गुंजन इंगळे, कांबळे, चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर