शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

तुम्हालाही तिरळेपणा असेल तर असा करावा उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 14:52 IST

Chandrapur : लहान मुलांचं मोबाइल, टी. व्ही. जवळून पाहणं आजच करा बंद

परिमल डोहणे चंद्रपूर : दोन्ही डोळे समांतर कक्षात न राहण्याच्या दोषास तिरळेपणा म्हणतात. यामध्ये एक डोळा वरच्या दिशेने, खालच्या दिशेने, आतील किंवा बाहेरच्या दिशेने वळू शकतो. कुणाला जन्मजात तर कुणाला दृष्टीत अडथळा आल्याने ही समस्या उ‌द्भवते. परंतु, यावर वेळीच व योग्य उपचार तिरळेपणा दूर होऊ शकतो, असा सल्ला चंद्रपुरातील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. गुंजन इंगळे, कांबळे यांनी दिला आहे.

ग्रामीण भागात पाळण्यातील खेळण्याकडे बघून तिरळेपणा होतो, अशक्तपणामुळे तिरळेपणा होतो, दुसऱ्या तिरळ्या मुलाची नक्कल केल्याने तिरळेपणा होतो, अशा चुकीच्या कल्पना आहेत. गर्भधारणेदरम्यान झालेल्या काही व्यंगामुळे जन्मजात तिरळेपणा होण्याची शक्यता असते. त्यामुळे लहानपणातच जर तिरळेपणावर उपचार केल्यास योग्य वेळेत उपचार होत असतो. परंतु, त्याला विलंब लावल्यास वय वाढत गेल्यास ही समस्या वाढण्याची शक्यता असते. शस्त्रक्रियेने ही समस्या दूर होत असते. त्यामुळे अशा रुग्णांनी वेळीच तज्ज्ञांकडून उपचार घेणे गरजेचे आहे.

तिरळेपणाची लक्षणे

  • एक किंवा दोन्ही डोळे वेगवेगळ्या दिशेने पाहणे, दोन प्रतिमा दिसणे.
  • दृष्टिदोष : दृष्टिदोष असल्यास लहान वयात मुलं टीव्ही, मोबाइल, पुस्तक अगदी जवळून बघतात. मोठ्या मुलांना शाळेत मागील बाकावरून फळ्यावरचे दिसत नाही.
  • तीव्र प्रकाशाकडे बघताना तिरळेपणा असणारी मुले तिरळा डोळा हाताने झाकून घेतात. डोळ्यात पांढरी टीक दिसणे.

असा करावा उपचार

  • दृष्टिदोषामुळे तिरळेपणा असल्यास योग्य वयात चष्मा लावणे गरजेचे आहे.
  • डोळ्याचा व्यायाम : यात जो सामान्य डोळा आहे त्याला पट्टी करावी लागते आणि जो डोळा तिरळा (आळशी) झालेला आहे त्याची नजर वाढवता येते.
  • तिरळेपणावर शस्त्रक्रिया : 3 शस्त्रक्रिया ही लवकरात लवकर करणे गरजेचे राहते. प्रथम शस्त्रक्रिया झाल्यानंतर ८० टक्के तिरळेपणा दूर होतो. उर्वरित २० टक्के तिरळेपणा दूर करण्यासाठी कधी कधी २-३ शस्त्रक्रिया कराव्या लागू शकतात

 

तिरळेपणाची कारणेअनुवंशिकता, मोठ्या नंबरचा चष्मा असणे, असंतुलित स्नायूशक्ती, डोळ्यांचे आजार जसे मोतीबिंदू, बुबुळावरील व्रण, आंतर पटलाचे रोग, डोळ्यामध्ये गाठ असणे.

"तिरळेपणाबाबत अनेक चुकीचे गैरसमज आहेत. परंतु, तिरळेपणावर वेळीच उपचार झाला नाही, तर उपचार करणे कठीण होते. परिणामी कायमची दृष्टी जाऊ शकते. तिरळेपणावर वेळीच उपाय केल्याने दृष्टिहीनता व तिरळेपणावर मात करता येऊ शकते. त्यामुळे लक्षणे दिसताच नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा."- डॉ. गुंजन इंगळे, कांबळे, चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर