शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

तुम्हालाही तिरळेपणा असेल तर असा करावा उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 14:52 IST

Chandrapur : लहान मुलांचं मोबाइल, टी. व्ही. जवळून पाहणं आजच करा बंद

परिमल डोहणे चंद्रपूर : दोन्ही डोळे समांतर कक्षात न राहण्याच्या दोषास तिरळेपणा म्हणतात. यामध्ये एक डोळा वरच्या दिशेने, खालच्या दिशेने, आतील किंवा बाहेरच्या दिशेने वळू शकतो. कुणाला जन्मजात तर कुणाला दृष्टीत अडथळा आल्याने ही समस्या उ‌द्भवते. परंतु, यावर वेळीच व योग्य उपचार तिरळेपणा दूर होऊ शकतो, असा सल्ला चंद्रपुरातील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. गुंजन इंगळे, कांबळे यांनी दिला आहे.

ग्रामीण भागात पाळण्यातील खेळण्याकडे बघून तिरळेपणा होतो, अशक्तपणामुळे तिरळेपणा होतो, दुसऱ्या तिरळ्या मुलाची नक्कल केल्याने तिरळेपणा होतो, अशा चुकीच्या कल्पना आहेत. गर्भधारणेदरम्यान झालेल्या काही व्यंगामुळे जन्मजात तिरळेपणा होण्याची शक्यता असते. त्यामुळे लहानपणातच जर तिरळेपणावर उपचार केल्यास योग्य वेळेत उपचार होत असतो. परंतु, त्याला विलंब लावल्यास वय वाढत गेल्यास ही समस्या वाढण्याची शक्यता असते. शस्त्रक्रियेने ही समस्या दूर होत असते. त्यामुळे अशा रुग्णांनी वेळीच तज्ज्ञांकडून उपचार घेणे गरजेचे आहे.

तिरळेपणाची लक्षणे

  • एक किंवा दोन्ही डोळे वेगवेगळ्या दिशेने पाहणे, दोन प्रतिमा दिसणे.
  • दृष्टिदोष : दृष्टिदोष असल्यास लहान वयात मुलं टीव्ही, मोबाइल, पुस्तक अगदी जवळून बघतात. मोठ्या मुलांना शाळेत मागील बाकावरून फळ्यावरचे दिसत नाही.
  • तीव्र प्रकाशाकडे बघताना तिरळेपणा असणारी मुले तिरळा डोळा हाताने झाकून घेतात. डोळ्यात पांढरी टीक दिसणे.

असा करावा उपचार

  • दृष्टिदोषामुळे तिरळेपणा असल्यास योग्य वयात चष्मा लावणे गरजेचे आहे.
  • डोळ्याचा व्यायाम : यात जो सामान्य डोळा आहे त्याला पट्टी करावी लागते आणि जो डोळा तिरळा (आळशी) झालेला आहे त्याची नजर वाढवता येते.
  • तिरळेपणावर शस्त्रक्रिया : 3 शस्त्रक्रिया ही लवकरात लवकर करणे गरजेचे राहते. प्रथम शस्त्रक्रिया झाल्यानंतर ८० टक्के तिरळेपणा दूर होतो. उर्वरित २० टक्के तिरळेपणा दूर करण्यासाठी कधी कधी २-३ शस्त्रक्रिया कराव्या लागू शकतात

 

तिरळेपणाची कारणेअनुवंशिकता, मोठ्या नंबरचा चष्मा असणे, असंतुलित स्नायूशक्ती, डोळ्यांचे आजार जसे मोतीबिंदू, बुबुळावरील व्रण, आंतर पटलाचे रोग, डोळ्यामध्ये गाठ असणे.

"तिरळेपणाबाबत अनेक चुकीचे गैरसमज आहेत. परंतु, तिरळेपणावर वेळीच उपचार झाला नाही, तर उपचार करणे कठीण होते. परिणामी कायमची दृष्टी जाऊ शकते. तिरळेपणावर वेळीच उपाय केल्याने दृष्टिहीनता व तिरळेपणावर मात करता येऊ शकते. त्यामुळे लक्षणे दिसताच नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा."- डॉ. गुंजन इंगळे, कांबळे, चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर