शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

वाढीव योजना पूर्णत्वास तर मग पाणी का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 14:16 IST

नागरिकांचा सवाल : शहरासाठी पुरेशी नाही तपाळ पाणीपुरवठा योजना

लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या नगरपरिषदेच्या ३१ कोटी रुपये किमतीच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पिण्याचे पाणी का नाही, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

नागभीड नगरपरिषदेची स्थापना ११ एप्रिल २०१६ रोजी झाली. नगरपरिषदेत परिसरातील ११ गावांचा समावेश करण्यात आला. उन्हाळ्यात या गावात दरवर्षी पाण्याची मोठी टंचाई असते. नागभीड शहरालाही तपाळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो. तपाळ पाणीपुरवठा योजना १९९९ मध्ये अस्तित्वात आली. वर्तमान परिस्थितीत नागभीडला पाणीपुरवठा करण्यास तपाळ योजना असमर्थ ठरत आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात शहरात आणि नगरपरिषदेत समावेश गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन नागभीड नगरपरिषदेने या नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार शासनाकडे सादर करण्यात आले.

गळतीने पाणीपुरवठा ठप्पउन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची पातळी खालावली. अशा परिस्थितीत नागभीडला पाणीपुरवठा करणारी तपाळ पाणीपुरवठा योजनाच मदतीला आहे. मात्र, भिकेश्वरजवळील गळतीने सोमवारपासून पुरवठा बंद झाला. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरू झाल्याचे दिसून येत आहे 

टंचाईच्या काळात भ्रमनिरासघोडाझरी तलावातून ही योजना कार्यान्वित होणार आहे. नगरपरिषद क्षेत्रातील सर्व गावांत २६ किमी पाइपलाइन आहे. योजनेत ९ पाण्याच्या टाकी आहेत. या टाक्यांचे काम पूर्ण झाले. जलशुद्धीकरण केंद्र व गावातील पाइपलाइन पूर्ण झाले. गावातील नळजोडण्यांचेही काम पूर्ण झाले. मग योजना कार्यान्वित करण्यास अडचण कोणती, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. उन्हाळ्यात नवीन योजनेचे पाणी मिळेल, अशी नागभीडकरांची अपेक्षा होती. मात्र, भ्रमनिरास झाला आहे.

तीन टँकरने पाणीपुरवठा गळतीमुळे तपाळ योजना बंद झाल्याने शहरात टंचाई निर्माण झाली. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे, म्हणून नगरपरिषदेने शहरात तीन टँकर लावले, पण अनेकांना पाणी मिळत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. 

नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचे काम जोमाने सुरू आहे. मात्र, राममंदिर चौक, रेल्वे क्रॉसिंग आणि पोलिस ठाण्याच्या जवळ काही बांधकाम अद्याप शिल्लक आहे. हे काम झाल्यानंतर योजना कार्यान्वित केली जाईल.- उमेश शेंडे, अभियंता, न.प. नागभीड. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातchandrapur-acचंद्रपूर