शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

वाढीव योजना पूर्णत्वास तर मग पाणी का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 14:16 IST

नागरिकांचा सवाल : शहरासाठी पुरेशी नाही तपाळ पाणीपुरवठा योजना

लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या नगरपरिषदेच्या ३१ कोटी रुपये किमतीच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पिण्याचे पाणी का नाही, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

नागभीड नगरपरिषदेची स्थापना ११ एप्रिल २०१६ रोजी झाली. नगरपरिषदेत परिसरातील ११ गावांचा समावेश करण्यात आला. उन्हाळ्यात या गावात दरवर्षी पाण्याची मोठी टंचाई असते. नागभीड शहरालाही तपाळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो. तपाळ पाणीपुरवठा योजना १९९९ मध्ये अस्तित्वात आली. वर्तमान परिस्थितीत नागभीडला पाणीपुरवठा करण्यास तपाळ योजना असमर्थ ठरत आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात शहरात आणि नगरपरिषदेत समावेश गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन नागभीड नगरपरिषदेने या नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार शासनाकडे सादर करण्यात आले.

गळतीने पाणीपुरवठा ठप्पउन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची पातळी खालावली. अशा परिस्थितीत नागभीडला पाणीपुरवठा करणारी तपाळ पाणीपुरवठा योजनाच मदतीला आहे. मात्र, भिकेश्वरजवळील गळतीने सोमवारपासून पुरवठा बंद झाला. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरू झाल्याचे दिसून येत आहे 

टंचाईच्या काळात भ्रमनिरासघोडाझरी तलावातून ही योजना कार्यान्वित होणार आहे. नगरपरिषद क्षेत्रातील सर्व गावांत २६ किमी पाइपलाइन आहे. योजनेत ९ पाण्याच्या टाकी आहेत. या टाक्यांचे काम पूर्ण झाले. जलशुद्धीकरण केंद्र व गावातील पाइपलाइन पूर्ण झाले. गावातील नळजोडण्यांचेही काम पूर्ण झाले. मग योजना कार्यान्वित करण्यास अडचण कोणती, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. उन्हाळ्यात नवीन योजनेचे पाणी मिळेल, अशी नागभीडकरांची अपेक्षा होती. मात्र, भ्रमनिरास झाला आहे.

तीन टँकरने पाणीपुरवठा गळतीमुळे तपाळ योजना बंद झाल्याने शहरात टंचाई निर्माण झाली. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे, म्हणून नगरपरिषदेने शहरात तीन टँकर लावले, पण अनेकांना पाणी मिळत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. 

नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचे काम जोमाने सुरू आहे. मात्र, राममंदिर चौक, रेल्वे क्रॉसिंग आणि पोलिस ठाण्याच्या जवळ काही बांधकाम अद्याप शिल्लक आहे. हे काम झाल्यानंतर योजना कार्यान्वित केली जाईल.- उमेश शेंडे, अभियंता, न.प. नागभीड. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातchandrapur-acचंद्रपूर